शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
3
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
4
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
5
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
6
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
7
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
8
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
9
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
10
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
11
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
12
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
13
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
14
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
15
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
16
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
18
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
19
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
20
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

जिल्'ातील सहकारी बॅँकांचा पहिल्यांदाच दहा हजार कोटींवर व्यवसाय-: दहा बॅँकांचा एनपीए शून्य टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 9:58 PM

जिल्'ातील सहकारी बॅँकांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षात प्रथमच १० हजार कोटीच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. त्यांनी तब्बल १० हजार २३८ कोटी ६७ लाख रुपयांचा विक्रमी व्यवसाय केला आहे. शून्य टक्के एनपीए हे अशक्यप्राय साध्य १० बॅँकांनी साध्य करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे

ठळक मुद्देवर्षात विक्रमी कामगिरी -एनपीए कमी झाल्याने बॅँकांचा नफा वाढला आहे. त्यामुळे बॅँकांचा स्वनिधी वाढला.

अविनाश बाडआटपाडी : जिल्'ातील सहकारी बॅँकांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षात प्रथमच १० हजार कोटीच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. त्यांनी तब्बल १० हजार २३८ कोटी ६७ लाख रुपयांचा विक्रमी व्यवसाय केला आहे. शून्य टक्के एनपीए हे अशक्यप्राय साध्य १० बॅँकांनी साध्य करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे. जिल्'ातील सहकारी बॅँका सशक्त होत असल्याने आर्थिक विकासाला चालना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.गरजूंना तातडीने कर्जपुरवठा करून त्यांना सक्षम बनविण्यात जिल्'ातील सहकारी बॅँकांचा वाटा मोठा आहे. जिल्'ात सहकारी बॅँकांचे जाळेही मोठे आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेशिवाय सहकारी बॅँकांच्या २५९ शाखा आहेत. त्यांची सभासद संख्या २५ लाख ५४ हजार ४९९ आहे. गेल्या आर्थिक वर्षात या बॅँकांनी ४ हजार १७५ कोटी ८३ लाख रुपयांचे कर्जाचे वाटप केले आहे.

विशेष म्हणजे कर्जाची वसुली खूप चांगली करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा शून्य टक्के एनपीए असलेल्या बॅँकांच्या संख्येत यंदा दुपटीने वाढ झाली आहे. सर्व सहकारी बॅँकांचा सरासरी नेट एनपीए फक्त २.२४ टक्के, तर ग्रॉस एनपीए ५.९४ टक्के एवढा आहे. सरकारी बॅँकांचा सरासरी ग्रॉस एनपीए १५ टक्क्यांवर आहे. त्यामुळे सरकारी बॅँकांच्या तुलनेत जिल्'ातील सहकारी बॅँकांची कामगिरी अतिशय चांगली ठरली आहे. एनपीए कमी झाल्याने बॅँकांचा नफा वाढला आहे. त्यामुळे बॅँकांचा स्वनिधी वाढला. त्यामुळे सभासदांच्या लाभांशामध्ये वाढ होणार आहे. 

शून्य टक्के एनपीएच्या विक्रमी बॅँकाराजारामबापू बॅँक, हुतात्मा बॅँक, पलूस बॅँक, दि आष्टा पीपल्स बॅँक, दि बाबासाहेब देशमुख बॅँक, मानसिंग को-आॅप. बॅँक, तासगाव अर्बन बॅँक, आप्पासाहेब बिरनाळे बॅँक, श्री लक्ष्मी महिला बॅँक आणि श्री लक्ष्मी म्हैसाळ बॅँक या बॅँकांनी यंदा शून्य टक्के एनपीएचा विक्रम केला आहे.जिल्'ातील बॅँकांची गरुडझेपजिल्'ातील सहकारी बॅँकांनी ९६ कोटी ३७ लाख एवढा ढोबळ नफा मिळविला आहे, तर २८ कोटी ६९ लाख एवढा आगाऊ आयकर भरला आहे. ४० कोटी ४७ लाख निव्वळ नफा कमावला आहे. १९५८ कोटी २० लाखांची गुंतवणूक केली आहे. बॅँकांकडे ४६७ कोटी ८४ लाखांचा स्वनिधी असून, ठेवींमध्ये वाढ होऊन ६ हजार ६२ कोटी ८४ लाखांच्या ठेवी झाल्या आहेत. सर्व बॅँकांमध्ये आॅनलाईन सीबीएस प्रणाली कार्यरत आहे. आरटीजीएस, एनईएफटी, एटीएम सुविधा उपलब्ध आहेत.

जिल्'ातील सहकारी बॅँका आता सक्षम झाल्या आहेत. सहकारी बॅँकांवर लोकांचा विश्वास वाढला आहे. रिझर्व्ह बॅँकेला ५ टक्केच्या आत नेट एनपीए अपेक्षित आहे. त्यापेक्षा शून्य यक्के नेट एनपीए करून खूप चांगल्या पद्धतीने बॅँका काम करीत आहेत. रिझर्व्ह बॅँकेने आता नवीन शाखांना मंजुरी द्यायला पाहिजे. शासकीय अनुदानाची खाती सहकारी बॅँकांमध्ये सुरू करण्यास परवानगी देण्यात द्यावी.- भगवंत आडमुठे, मुख्य कार्यकारी अधिकारी

 

जिल्'ातील सहकारी बॅँकांसमोर अनेक आव्हाने असताना बॅँकांनी अतिशय चांगली कामगिरी केली आहे. विशेषत: यंदा दुष्काळी परिस्थिती असूनही विक्रमी वसुली झाली आहे. ज्यांची कुठे पत नाही, त्यांची पत निर्माण करून ताठ मानेने समाजासमोर त्यांना उभा करणाऱ्या सहकारी बॅँका जिल्'ाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवतील. २० पैकी १८ बॅँकांना ‘अ’आॅडिट वर्ग आहे.- यु. टी. जाधव, माजी अध्यक्ष, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँक

 

टॅग्स :bankबँकMONEYपैसाSangliसांगली