शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत राष्ट्रवादीची संवाद नव्हे, विसंवाद यात्रा, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 16:24 IST

पक्षात वाद आहेत याची कल्पना प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना काही कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर ‘थोडे वाद असायला हवेत’, अशा शब्दांत गटबाजीच्या प्रकारावर जयंत पाटील यांनी पडदा टाकला.

सांगली : राज्यभर फिरून सांगलीत आलेल्या राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेत स्थानिक नेत्यांमध्येच विसंवादाचे व गटबाजीचे दर्शन घडले. पक्षात वाद आहेत याची कल्पना प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना काही कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर ‘थोडे वाद असायला हवेत’, अशा शब्दांत गटबाजीच्या प्रकारावर जयंत पाटील यांनी पडदा टाकला.

माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात मंगळवारी दुपारी राष्ट्रवादीचा संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आ. अरुण लाड, युवा नेते प्रतीक पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष पद्माकर जगदाळे, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शरद लाड, युवती आघाडीच्या सुलक्षणा सलगर, सुनील गव्हाणे, रविकांत वरपे, मेहबूब शेख, आदी उपस्थित हाेते.

कार्यक्रमाच्या ठिकाणी जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी दोन ठिकाणी दोन वेगवेगळे गट थांबून होेते. संवाद यात्रेच्या नियोजनातच गोंधळ दिसून आला. सांगली विधानसभा क्षेत्रासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, शहर जिल्हाध्यक्ष बजाज यांनी आढावा मांडण्यास सुरुवात केली. बजाज यांना त्यांनी मध्येच थांबवून हा विधानसभा क्षेत्राचा कार्यक्रम असल्याचे स्पष्ट करीत, या क्षेत्राचे पक्षाचे अध्यक्ष पद्माकर जगदाळे यांना आढावा मांडण्याची सूचना त्यांनी केली.

जयंत पाटील यांना स्थानिक पातळीवर गटांमध्ये वाद असल्याचे पक्षात नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले. त्याचा उल्लेख करीत जयंत पाटील म्हणाले की, पक्षात सर्व काही चांगले असेल तर दृष्ट लागते. त्यामुळे थोडे वाद असायला हवेत. त्यामुळे काळजी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

प्रदेश उपाध्यक्ष मागच्या रांगेत

पक्षीय शिष्टाचाराप्रमाणे व्यासपीठावर बैठक व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले सुरेश पाटील मागच्या रांगेत व युवक शहरचे पदाधिकारी पुढील रांगेत बसले होते. त्याचीही चर्चा उपस्थितांत रंगली होती.

सांगलीत मुक्कामास येतो

जयंत पाटील यांच्याशी थेट संवाद साधता येत नाही, त्यांची भेट होत नाही, अशी तक्रार काहींनी केली होती. त्याचा उल्लेख करीत जयंत पाटील म्हणाले, संवाद यात्रा संपल्यानंतर मी सांगलीला मुक्कामालाच येणार आहे. तेव्हा आपण चर्चा करू.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटील