शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

सांगलीत राष्ट्रवादीची संवाद नव्हे, विसंवाद यात्रा, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 16:24 IST

पक्षात वाद आहेत याची कल्पना प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना काही कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर ‘थोडे वाद असायला हवेत’, अशा शब्दांत गटबाजीच्या प्रकारावर जयंत पाटील यांनी पडदा टाकला.

सांगली : राज्यभर फिरून सांगलीत आलेल्या राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेत स्थानिक नेत्यांमध्येच विसंवादाचे व गटबाजीचे दर्शन घडले. पक्षात वाद आहेत याची कल्पना प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना काही कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर ‘थोडे वाद असायला हवेत’, अशा शब्दांत गटबाजीच्या प्रकारावर जयंत पाटील यांनी पडदा टाकला.

माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात मंगळवारी दुपारी राष्ट्रवादीचा संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आ. अरुण लाड, युवा नेते प्रतीक पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष पद्माकर जगदाळे, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शरद लाड, युवती आघाडीच्या सुलक्षणा सलगर, सुनील गव्हाणे, रविकांत वरपे, मेहबूब शेख, आदी उपस्थित हाेते.

कार्यक्रमाच्या ठिकाणी जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी दोन ठिकाणी दोन वेगवेगळे गट थांबून होेते. संवाद यात्रेच्या नियोजनातच गोंधळ दिसून आला. सांगली विधानसभा क्षेत्रासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, शहर जिल्हाध्यक्ष बजाज यांनी आढावा मांडण्यास सुरुवात केली. बजाज यांना त्यांनी मध्येच थांबवून हा विधानसभा क्षेत्राचा कार्यक्रम असल्याचे स्पष्ट करीत, या क्षेत्राचे पक्षाचे अध्यक्ष पद्माकर जगदाळे यांना आढावा मांडण्याची सूचना त्यांनी केली.

जयंत पाटील यांना स्थानिक पातळीवर गटांमध्ये वाद असल्याचे पक्षात नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले. त्याचा उल्लेख करीत जयंत पाटील म्हणाले की, पक्षात सर्व काही चांगले असेल तर दृष्ट लागते. त्यामुळे थोडे वाद असायला हवेत. त्यामुळे काळजी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

प्रदेश उपाध्यक्ष मागच्या रांगेत

पक्षीय शिष्टाचाराप्रमाणे व्यासपीठावर बैठक व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले सुरेश पाटील मागच्या रांगेत व युवक शहरचे पदाधिकारी पुढील रांगेत बसले होते. त्याचीही चर्चा उपस्थितांत रंगली होती.

सांगलीत मुक्कामास येतो

जयंत पाटील यांच्याशी थेट संवाद साधता येत नाही, त्यांची भेट होत नाही, अशी तक्रार काहींनी केली होती. त्याचा उल्लेख करीत जयंत पाटील म्हणाले, संवाद यात्रा संपल्यानंतर मी सांगलीला मुक्कामालाच येणार आहे. तेव्हा आपण चर्चा करू.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटील