शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत राष्ट्रवादीची संवाद नव्हे, विसंवाद यात्रा, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 16:24 IST

पक्षात वाद आहेत याची कल्पना प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना काही कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर ‘थोडे वाद असायला हवेत’, अशा शब्दांत गटबाजीच्या प्रकारावर जयंत पाटील यांनी पडदा टाकला.

सांगली : राज्यभर फिरून सांगलीत आलेल्या राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेत स्थानिक नेत्यांमध्येच विसंवादाचे व गटबाजीचे दर्शन घडले. पक्षात वाद आहेत याची कल्पना प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना काही कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर ‘थोडे वाद असायला हवेत’, अशा शब्दांत गटबाजीच्या प्रकारावर जयंत पाटील यांनी पडदा टाकला.

माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात मंगळवारी दुपारी राष्ट्रवादीचा संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आ. अरुण लाड, युवा नेते प्रतीक पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष पद्माकर जगदाळे, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शरद लाड, युवती आघाडीच्या सुलक्षणा सलगर, सुनील गव्हाणे, रविकांत वरपे, मेहबूब शेख, आदी उपस्थित हाेते.

कार्यक्रमाच्या ठिकाणी जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी दोन ठिकाणी दोन वेगवेगळे गट थांबून होेते. संवाद यात्रेच्या नियोजनातच गोंधळ दिसून आला. सांगली विधानसभा क्षेत्रासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, शहर जिल्हाध्यक्ष बजाज यांनी आढावा मांडण्यास सुरुवात केली. बजाज यांना त्यांनी मध्येच थांबवून हा विधानसभा क्षेत्राचा कार्यक्रम असल्याचे स्पष्ट करीत, या क्षेत्राचे पक्षाचे अध्यक्ष पद्माकर जगदाळे यांना आढावा मांडण्याची सूचना त्यांनी केली.

जयंत पाटील यांना स्थानिक पातळीवर गटांमध्ये वाद असल्याचे पक्षात नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले. त्याचा उल्लेख करीत जयंत पाटील म्हणाले की, पक्षात सर्व काही चांगले असेल तर दृष्ट लागते. त्यामुळे थोडे वाद असायला हवेत. त्यामुळे काळजी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

प्रदेश उपाध्यक्ष मागच्या रांगेत

पक्षीय शिष्टाचाराप्रमाणे व्यासपीठावर बैठक व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले सुरेश पाटील मागच्या रांगेत व युवक शहरचे पदाधिकारी पुढील रांगेत बसले होते. त्याचीही चर्चा उपस्थितांत रंगली होती.

सांगलीत मुक्कामास येतो

जयंत पाटील यांच्याशी थेट संवाद साधता येत नाही, त्यांची भेट होत नाही, अशी तक्रार काहींनी केली होती. त्याचा उल्लेख करीत जयंत पाटील म्हणाले, संवाद यात्रा संपल्यानंतर मी सांगलीला मुक्कामालाच येणार आहे. तेव्हा आपण चर्चा करू.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटील