शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

वाळूअभावी कोट्यवधींची विकास कामे ठप्प

By admin | Updated: January 30, 2015 23:18 IST

खानापूर तालुक्यातील चित्र : शासकीय कामांसह खासगी बांधकामेही रेंगाळली

दिलीप मोहिते - विटा खानापूर तालुक्यात वाळूअभावी अनेक शासकीय कामांना ब्रेक लागला असून, वाळू मिळत नसल्याने कोट्यवधी रुपयांची विकास कामे ठप्प झाली आहेत. परिणामी, विटा शहरासह खानापूर तालुक्यातील खासगी बांधकामेही रेंगाळली असल्याने बांधकाम मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यात वाळू ठेक्यांचा लिलाव झाला नसल्याने वाळू उपसा व वाहतुकीस बंदी असल्याने तालुक्यात अनेक ठिकाणी खासगीसह शासकीय कामेही संबंधित ठेकेदारांनी बंद ठेवल्याने कामे मुदतीत पूर्ण न झाल्यास मार्च एंडच्या तोंडावर ठेकेदारही अडचणीत येण्याचे संकेत आहेत.  खानापूर तालुक्यात येरळा नदीपात्रातून वाळू उपसा केला जातो. सध्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश नसल्याने वाळू उपसा बंद आहे. जो वाळूची तस्करी करून वाळू वाहतूक करीत असेल, तो मात्र यातून मोठ्या प्रमाणात मालामाल होत असल्याची चर्चा आहे. येरळा नदीपात्राच्या कार्यक्षेत्रातील हिंगणगादे, कान्हरवाडी, चिखलहोळ, माहुली, भाळवणी, कमळापूर, बलवडी (भा.) यासह अन्य ठिकाणांहून वाळू उपशासाठी महसूल प्रशासनाच्यावतीने रितसर परवाना दिला जातो. परंतु, परवाना बंद होऊन आठ ते नऊ महिने झाले तरी वाळू उपसा सुरू झाला नाही. त्यामुळे ठेकेदारांसह खासगी बांधकामधारकांना वाळू मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर कामे ठप्प झाली आहेत. खानापूर तालुक्यात तालुका कृषी विभागाच्यावतीने मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून आरसीसी सिमेंट बंधाऱ्यांची कामे सुरू आहेत. परंतु, या कामांनाही वाळू मिळत नसल्याने ही कोट्यवधी रुपयांची विकास कामे पैसे असूनही ठप्प आहेत, तर विटा शहरातील सेंट्रिंग व परप्रांतीय मजुरांवर सरकारी व खासगी बांधकामे थांबल्याने उपासमारीची वेळ आली आहे.जिल्हा प्रशासनाने कृष्णा नदीपात्रातील वाळूचा लिलाव ९ फेब्रुवारीला करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा लिलाव होण्यापूर्वी येरळा नदीपात्रातून वाळू उपसा सुरू झाल्यास त्याचा परिणाम लिलाव प्रक्रियेवर होऊ शकतो. त्यामुळे दि. ९ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच तालुक्यातील वाळू उपशासाठी रितसर परवानगी मिळेल, असा अंदाज एका महसूल कर्मचाऱ्याने व्यक्त केला.मजुरांवर उपासमारीची वेळ...खानापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय बांधकाम मजूर स्थायिक झाले आहेत. त्यात सर्वाधिक ७० ते ७५ टक्के बांधकाम मजूर एकट्या विटा शहरात आहेत. नेवरी नाका, शिवाजी चौक, चौंडेश्वरी मंदिर चौक, तासगाव नाका, विवेकानंदनगर, शाहूनगर, डॉक्टर कॉलनी यासह शहराच्या अन्य भागात हे मजूर सध्या राहात आहेत. परंतु, वाळूअभावी गेल्या अनेक महिन्यांपासून या मजुरांना काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे; तर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी शासकीय विकासकामेही सुरू आहेत. पण वाळू मिळत नसल्याने कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांनाही ‘ब्रेक’ लागला आहे.