शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाच जिल्ह्यांत पेट्रोल व डिझेलची मागणी केवळ निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : लाॅकडाऊन शिथील झाल्यानंतरही मर्यादित प्रवासी वाहतूक व मालवाहतूक, इंधन दरवाढ या कारणांमुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मिरज : लाॅकडाऊन शिथील झाल्यानंतरही मर्यादित प्रवासी वाहतूक व मालवाहतूक, इंधन दरवाढ या कारणांमुळे मिरजेतील इंधन डेपाेतून पाच जिल्ह्यात होणारे पेट्रोल व डिझेलचे वितरण ५० टक्क्यांवर आले आहे. सलग दोन वर्षे सुटीचा हंगाम वाया गेला असून, इंधनाला मागणी नसल्याने इंधन कंपन्यांसह पेट्रोलपंप चालकांना आर्थिक फटका बसला आहे.

मिरजेतील भारत पेट्रोलियम व इंडियन ऑईलच्या इंधन डेपोतून सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील पेट्रोलपंपाना इंधनाचे वितरण होते. पाच जिल्ह्यांत भारत पेट्रोलियमचे २३० व इंडियन ऑईलचे २४० पेट्रोलपंप आहेत. या पेट्रोल पंपांना भारत पेट्रोलियम व इंडियन ऑईलकडून दररोज सुमारे २५ लाख लीटर इंधनाचा पुरवठा करण्यात येतो. भारत पेट्रोलियम व इंडियन ऑईल या दोन्ही इंधन डेपोत सुमारे ५५ लाख लीटर पेट्रोल व १८० लाख लीटर डिझेल इंधनसाठ्याची क्षमता आहे. कोरोना प्रतिबंधासाठी सलग दोन वर्षे मार्च एप्रिलपासून लाॅकडाऊन काळात इंधन विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली. अत्यावश्यक सेवांसाठीच मर्यादित इंधन वितरणाची परवानगी असल्याने इंधन विक्री ३० टक्क्यांवर होती. लाॅकडाऊन काळात मागणी नसल्याने इंधन डेपोतून एक दिवसआड वितरण सुरु होते. लाॅकडाऊन शिथील झाल्यानंतर प्रशासनाने इंधन विक्रीवरील निर्बंध उठवले. एस. टी., रिक्षा सुरु झाल्याने इंधनाच्या खपात वाढ होण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, रेल्वे व एस. टी.च्या मर्यादित फेऱ्या, सर्व व्यवसायांवर निर्बंध असल्याने इंधनाचा खप अनलाॅक काळातही ५० टक्क्यांवरच आहे. इंडियन ऑईल डेपोत पुणे येथून व भारत पेट्रोलियम डेपोत मनमाड येथून रेल्वे टॅकरने इंधन पुरवठा होतो. मात्र, आता मागणी नसल्याने आठवड्यातून एकदा रेल्वे टॅकर मिरजेत येत आहेत. मार्च ते जून या सुटीच्या हंगामात पेट्रोल व डिझेलचा वापर व मागणी वाढते. मात्र, सलग दोन वर्षे सुटीच्या हंगामातच मोठे नुकसान सोसावे लागले आहे. डिझेलच्या तुलनेत पेट्रोलचा खप तर केवळ ४० टक्के आहे. प्रवासी व मालवाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु होईपर्यंत इंधनाचा वापर कमी असल्याने इंधन कंपन्या व पेट्रोलपंपचालक नुकसानात आहेत. दोन महिन्यानंतर लाॅकडाऊन शिथील होत असताना पुन्हा कोरोना प्रतिबंधासाठी निर्बंध लागू केल्याने इंधनाच्या खपावर त्याचा परिणाम होणार आहे.

चाैकट

दरवाढीचाही परिणाम

गेल्या चार महिन्यात इंधन दरात तब्बल २० ते ३० रुपये दरवाढ झाल्यानेही खपावर परिणाम झाला आहे. दररोज दर वाढत असल्याने पंपचालकांकडून इंधन खरेदी कमी होत आहे. भारत पेट्रोलियमचे खासगीकरण होण्याची शक्यता असल्याने पेट्रोलपंप चालकांना उधारीवर इंधन विक्री बंद आहे. या सर्वाचा परिणाम पुरवठ्यावर झाला आहे. मिरजेतील इंधन डेपोबाहेर नेहमी असणारी टॅकरच्या रांगा आता कमी झाल्याचे चित्र आहे.