शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

‘ताकारी’च्या चौथ्या आवर्तनास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 23:35 IST

प्रताप महाडिक । कडेगाव : ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ या तिन्ही योजना सुरू ठेवण्याकरिता कृष्णा नदीत आवश्यक ती पाणी ...

ठळक मुद्देपिके धोक्यात : सिंचन योजनांसाठी कोयनेतून विसर्ग वाढविण्याची गरज

प्रताप महाडिक ।कडेगाव : ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ या तिन्ही योजना सुरू ठेवण्याकरिता कृष्णा नदीत आवश्यक ती पाणी पातळी मिळण्यासाठी कोयना धरणातून विसर्ग वाढविणे गरजेचे आहे. ३० एप्रिलरोजी तिसरे आवर्तन संपले आणि ताकारी योजना बंद झाली. आता मे महिन्यातील चौथे आवर्तन तातडीने मिळणे गरजेचे आहे. ऐन उन्हाळ्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे व शेतीपिके करपून चालली आहेत.

जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये मोठ्याप्रमाणात दुष्काळ पडला असून याची गंभीर दखल घेऊन शासनाने सिंचन योजना चालू ठेवण्याची गरज आहे. वीज बिलांच्या शुल्कामध्ये टंचाईचा कोट्यवधी रुपयांचा खर्च बचत होण्यास मदत होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची पाणीपट्टी विहित वेळेत वसूल होते. त्यामुळे योजना सक्षमपणे व अविरतपणे कार्यरत राहिली. वीजबिलाच्या ८१-१९ फॉर्म्युल्यामुळे तर ही योजना अधिक सक्षम झाली. सध्या ताकारी योजनेची ९ कोटी ५० लाख रुपये वीजबिल थकबाकी आहे. परंतु साखर कारखान्यांकडून ७ कोटी रुपयांची वसूल झालेली पाणीपट्टी येणेबाकी आहे. राज्य शासनाकडून टंचाई काळात दिलेल्या आवर्तनाची मागील आणि चालू वर्षाची ५ कोटी ८८ लाख इतकी येणेबाकी आहे. याशिवाय चालूवर्षी दिलेल्या आवर्तनाची ८१ टक्के याप्रमाणे २ कोटी इतकी वीजबिलाची रक्कम येणेबाकी आहे. यामुळे योजना सक्षम असताना, आवर्तन बंद का, असा सवाल शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

ताकारी योजनेचे आवर्तन सुरू होण्यास होणाºया विलंबाचे खापर कालवा अस्तरीकरणाच्या सुरू असलेल्या कामावर फोडले जात आहे. परंतु आवर्तन कालावधित अस्तरीकरणाचे काम बंद ठेवण्याची तयारी संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी केली आहे.

चौथे आवर्तन शिल्लकचालूवर्षी ताकारी योजनेची रब्बी हंगामात दोन, तर उन्हाळी हंगामात एक अशी तीन आवर्तने पूर्ण झाली आहेत. अद्यापही उन्हाळी हंगामातील एक आवर्तन बाकी आहे. हे आवर्तनही तातडीने द्यावे, अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे. 

अजूनही साडेतीन टीएमसी पाणी हक्काचेताकारी योजनेला ९ टीएमसी पाणी मंजूर आहे. यापैकी पहिल्या तीन आवर्तनांसाठी साडेपाच टीएमसी पाणीवापर झाला आहे. योजनेच्या वाट्याचे व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे अजूनही साडेतीन टीएमसी पाणी शिल्लक आहे.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणी