शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
3
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
4
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
5
₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
6
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
7
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
8
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
9
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
10
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
11
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
12
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
13
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
14
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
15
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
16
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
17
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
18
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
19
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
20
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी

द्राक्षावर ‘भुरी’चा धोका वाढला : जत तालुक्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:10 IST

जत तालुक्यात सध्या वातावरणात बदल होत आहे. याचा परिणाम द्राक्षांवर होत असून, भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच द्राक्षाचा गोडवा कमी झाला आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले

ठळक मुद्देवातावरण बदलाचा परिणाम; शेतकऱ्यांची चिंता वाढली

गजानन पाटील ।संख : जत तालुक्यात सध्या वातावरणात बदल होत आहे. याचा परिणाम द्राक्षांवर होत असून, भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच द्राक्षाचा गोडवा कमी झाला आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.

यातच व्यापारी पाऊस पडण्याची भीती दाखवून द्राक्षे कमी दरात घेत आहेत. यामुळे ‘दुष्काळात धोंडा महिना’ अशी अवस्था झाली आहे. द्राक्ष बागायतदार दुहेरी संकटात सापडला आहे.जत तालुक्यामध्ये ६ हजार ६७० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. प्रतिकूल परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. कृषी विभागाच्या अनुदानावर व स्वत: लाखो लिटरची शेततळी बांधली आहेत. पाण्याचा नियोजनबध्द वापर करून दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी पाऊसच नसल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

१४४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पूर्व व दक्षिण भागातील २६ पैकी १७ तलाव व दोन मध्यम प्रकल्प मे-जून महिन्यापासून पाण्याअभावी कोरडे पडलेले आहेत. विहिरी, तलाव कोरडे पडल्याने शेतकºयांनी टॅँकरने पाणी घालून बागा जगविल्या आहेत. पाण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. सध्या दाक्षे विक्रीला आली आहेत.

यंदाच्या द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीलाच बागा फुलोºयात असताना, अवकाळी पावसाचा फटका बसला होता. परतीच्या मान्सून पावसाने दडी दिली होती. शेतकºयांनी दुष्काळाच्या अस्मानी संकटाचा सामना करून द्राक्षबागा फुलवल्या आहेत. जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत वातावरण चांगले होते. मात्र गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने द्राक्ष उत्पादन शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

काय होत आहेत परिणाम...सध्या द्राक्षे विक्रीला सुरुवात झालेली आहे. वातावरणातील बदलांमुळे विक्रीला आलेल्या द्राक्षातील गोडवा उतरू लागला आहे.कमी वजन भरत आहे. बेदाणा उत्पादन घटणार आहे. गोडी कमी होणार आहे. बेदाणा चपटा होणार आहे.कच्च्या द्राक्षाच्या मण्यांवर आणि विक्रीला आलेल्या द्राक्षांच्या देठावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.बागायतदार शेतकऱ्यांनी औषध फवारणी सुरू केली असल्याचे चित्र आहे. 

व्यापाºयांनी दर पाडलासध्या ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे व्यापारी शेतकºयांना सांगू लागले आहेत. याचा फायदा घेऊन कमी दरात द्राक्षांची खरेदी करण्याचा घाट व्यापाºयांनी घातला आहे. १८ जानेवारीपर्यंत ३८ रुपये किलो दर होता. सध्या ३२ ते ३४ रुपये आहे. त्यामुळे बागायतदार शेतकरी चिंतातूर झाला आहे.भूलथापांना बळी पडू नकाव्यापारी पावसाची भीती घालत आहेत. व्यापाºयांच्या भूलथापांना बळी पडू नका. कमी दरात द्राक्षाची विक्री करू नका, असे आवाहन द्राक्ष संघाच्यावतीने केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी