शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दामदुप्पटचे आमिष: सांगलीतील कंपनीकडे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी अडकले, तक्रारीनंतर पैसे अडकण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 16:02 IST

पोलिसांत तक्रार केल्यास गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळणार नाहीत. न्यायालयीन प्रक्रियेनंतरच त्यांच्या पैशाचा फैसला होईल, त्यात अनेक वर्षे जातील, अशी भीती दाखविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक तक्रारदार फसवणूक होऊनही शांत आहेत.

सांगली : सहा वर्षांत दामदुप्पट परताव्याच्या आमिषाने सांगलीतील एका कृषी उद्देशीय कंपनीत सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. विश्रामबागस्थित या कंपनीच्या कार्यालयाकडे हेलपाटे मारून गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.

येथील पर्ल्स कंपनीने काही वर्षांपूर्वी हजारो लोकांना गंडा घातला होता. सांगलीतील ‘पर्ल्स’चे कार्यालय बंद झाल्यानंतर व गुंतवणूकदारांचे पैसे अडकल्यानंतर त्यातील काही कारभाऱ्यांनी सांगलीत सात वर्षांपूर्वी कृषी उद्देशीय कंपनीची स्थापना केली. ‘पर्ल्स’च्याच एजंटांना त्यांनी या कंपनीकडे वळविले व व्यवसाय सुरू केला. सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसह कर्नाटकातही त्यांनी जाळे टाकले. गुंतवणूकदारांनी अल्पावधीतच कोट्यवधी रुपये कंपनीकडे जमा केले. जादा व्याजाच्या योजनेला लोक बळी पडले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून एजंट व गुंतवणूकदारांनी पैशासाठी तगादा लावल्यानंतर सोसायटीच्या काही संचालकांनी फोन बंद केले आहेत. त्यामुळे पैसे मिळविण्यासाठी सध्या गुंतवणूकदारांचे सांगलीत हेलपाटे सुरू आहेत.

तक्रारदारांच्या इशाऱ्यानंतर तडजोडी

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर पैशासाठी तडजोडी करण्यात आल्या. कंपनीचे अध्यक्ष व संचालकांनी तक्रारदार पोलिसांपर्यंत जाऊ नयेत म्हणून एकूण गुंतवणुकीतील ५० ते ७० टक्के रक्कम काही लोकांना दिली. त्याचवेळी हजारो गुंतवणूकदारांवर दबाव आणून त्यांना शांत केले आहे.

तक्रारीनंतर पैसे अडकण्याची भीती

पोलिसांत तक्रार केल्यास गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळणार नाहीत. न्यायालयीन प्रक्रियेनंतरच त्यांच्या पैशाचा फैसला होईल, त्यात अनेक वर्षे जातील, अशी भीती दाखविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक तक्रारदार फसवणूक होऊनही शांत आहेत.

अध्यक्षांचा फोन बंद

कंपनीच्या अध्यक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाइल बंद होता. कंपनीने गुंतवणूकदारांचे ८० टक्के पैसे दिल्याचे व संपूर्ण रकमेचा परतावा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कंपनीच्या कायदेविषयक सल्लागारांनी सांगितले.

कंपनीची दोनच कार्यालये सुरू

कंपनीची राज्यात एकूण सात कार्यालये होती. त्यापैकी आता पुणे व सांगली येथील दोनच कार्यालये सुरू आहेत. तक्रारदारांनी सांगितले की, मुख्य कार्यालयही काहीवेळा बंद असते. त्यामुळे संपर्क साधताना अडचणी येत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस