शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

दामदुप्पटचे आमिष: सांगलीतील कंपनीकडे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी अडकले, तक्रारीनंतर पैसे अडकण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 16:02 IST

पोलिसांत तक्रार केल्यास गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळणार नाहीत. न्यायालयीन प्रक्रियेनंतरच त्यांच्या पैशाचा फैसला होईल, त्यात अनेक वर्षे जातील, अशी भीती दाखविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक तक्रारदार फसवणूक होऊनही शांत आहेत.

सांगली : सहा वर्षांत दामदुप्पट परताव्याच्या आमिषाने सांगलीतील एका कृषी उद्देशीय कंपनीत सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. विश्रामबागस्थित या कंपनीच्या कार्यालयाकडे हेलपाटे मारून गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.

येथील पर्ल्स कंपनीने काही वर्षांपूर्वी हजारो लोकांना गंडा घातला होता. सांगलीतील ‘पर्ल्स’चे कार्यालय बंद झाल्यानंतर व गुंतवणूकदारांचे पैसे अडकल्यानंतर त्यातील काही कारभाऱ्यांनी सांगलीत सात वर्षांपूर्वी कृषी उद्देशीय कंपनीची स्थापना केली. ‘पर्ल्स’च्याच एजंटांना त्यांनी या कंपनीकडे वळविले व व्यवसाय सुरू केला. सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसह कर्नाटकातही त्यांनी जाळे टाकले. गुंतवणूकदारांनी अल्पावधीतच कोट्यवधी रुपये कंपनीकडे जमा केले. जादा व्याजाच्या योजनेला लोक बळी पडले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून एजंट व गुंतवणूकदारांनी पैशासाठी तगादा लावल्यानंतर सोसायटीच्या काही संचालकांनी फोन बंद केले आहेत. त्यामुळे पैसे मिळविण्यासाठी सध्या गुंतवणूकदारांचे सांगलीत हेलपाटे सुरू आहेत.

तक्रारदारांच्या इशाऱ्यानंतर तडजोडी

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर पैशासाठी तडजोडी करण्यात आल्या. कंपनीचे अध्यक्ष व संचालकांनी तक्रारदार पोलिसांपर्यंत जाऊ नयेत म्हणून एकूण गुंतवणुकीतील ५० ते ७० टक्के रक्कम काही लोकांना दिली. त्याचवेळी हजारो गुंतवणूकदारांवर दबाव आणून त्यांना शांत केले आहे.

तक्रारीनंतर पैसे अडकण्याची भीती

पोलिसांत तक्रार केल्यास गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळणार नाहीत. न्यायालयीन प्रक्रियेनंतरच त्यांच्या पैशाचा फैसला होईल, त्यात अनेक वर्षे जातील, अशी भीती दाखविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक तक्रारदार फसवणूक होऊनही शांत आहेत.

अध्यक्षांचा फोन बंद

कंपनीच्या अध्यक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाइल बंद होता. कंपनीने गुंतवणूकदारांचे ८० टक्के पैसे दिल्याचे व संपूर्ण रकमेचा परतावा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कंपनीच्या कायदेविषयक सल्लागारांनी सांगितले.

कंपनीची दोनच कार्यालये सुरू

कंपनीची राज्यात एकूण सात कार्यालये होती. त्यापैकी आता पुणे व सांगली येथील दोनच कार्यालये सुरू आहेत. तक्रारदारांनी सांगितले की, मुख्य कार्यालयही काहीवेळा बंद असते. त्यामुळे संपर्क साधताना अडचणी येत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस