शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

दामदुप्पटचे आमिष: सांगलीतील कंपनीकडे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी अडकले, तक्रारीनंतर पैसे अडकण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 16:02 IST

पोलिसांत तक्रार केल्यास गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळणार नाहीत. न्यायालयीन प्रक्रियेनंतरच त्यांच्या पैशाचा फैसला होईल, त्यात अनेक वर्षे जातील, अशी भीती दाखविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक तक्रारदार फसवणूक होऊनही शांत आहेत.

सांगली : सहा वर्षांत दामदुप्पट परताव्याच्या आमिषाने सांगलीतील एका कृषी उद्देशीय कंपनीत सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. विश्रामबागस्थित या कंपनीच्या कार्यालयाकडे हेलपाटे मारून गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.

येथील पर्ल्स कंपनीने काही वर्षांपूर्वी हजारो लोकांना गंडा घातला होता. सांगलीतील ‘पर्ल्स’चे कार्यालय बंद झाल्यानंतर व गुंतवणूकदारांचे पैसे अडकल्यानंतर त्यातील काही कारभाऱ्यांनी सांगलीत सात वर्षांपूर्वी कृषी उद्देशीय कंपनीची स्थापना केली. ‘पर्ल्स’च्याच एजंटांना त्यांनी या कंपनीकडे वळविले व व्यवसाय सुरू केला. सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसह कर्नाटकातही त्यांनी जाळे टाकले. गुंतवणूकदारांनी अल्पावधीतच कोट्यवधी रुपये कंपनीकडे जमा केले. जादा व्याजाच्या योजनेला लोक बळी पडले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून एजंट व गुंतवणूकदारांनी पैशासाठी तगादा लावल्यानंतर सोसायटीच्या काही संचालकांनी फोन बंद केले आहेत. त्यामुळे पैसे मिळविण्यासाठी सध्या गुंतवणूकदारांचे सांगलीत हेलपाटे सुरू आहेत.

तक्रारदारांच्या इशाऱ्यानंतर तडजोडी

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर पैशासाठी तडजोडी करण्यात आल्या. कंपनीचे अध्यक्ष व संचालकांनी तक्रारदार पोलिसांपर्यंत जाऊ नयेत म्हणून एकूण गुंतवणुकीतील ५० ते ७० टक्के रक्कम काही लोकांना दिली. त्याचवेळी हजारो गुंतवणूकदारांवर दबाव आणून त्यांना शांत केले आहे.

तक्रारीनंतर पैसे अडकण्याची भीती

पोलिसांत तक्रार केल्यास गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळणार नाहीत. न्यायालयीन प्रक्रियेनंतरच त्यांच्या पैशाचा फैसला होईल, त्यात अनेक वर्षे जातील, अशी भीती दाखविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक तक्रारदार फसवणूक होऊनही शांत आहेत.

अध्यक्षांचा फोन बंद

कंपनीच्या अध्यक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाइल बंद होता. कंपनीने गुंतवणूकदारांचे ८० टक्के पैसे दिल्याचे व संपूर्ण रकमेचा परतावा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कंपनीच्या कायदेविषयक सल्लागारांनी सांगितले.

कंपनीची दोनच कार्यालये सुरू

कंपनीची राज्यात एकूण सात कार्यालये होती. त्यापैकी आता पुणे व सांगली येथील दोनच कार्यालये सुरू आहेत. तक्रारदारांनी सांगितले की, मुख्य कार्यालयही काहीवेळा बंद असते. त्यामुळे संपर्क साधताना अडचणी येत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस