शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
3
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
4
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
5
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
6
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
7
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
8
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
9
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
10
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
11
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
12
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
13
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
14
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
15
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
16
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
17
एटीएसमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले, शेख यांची खंत; ना वडिलांच्या दफनविधीला, ना मुलीच्या लग्नाला आलाे !
18
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
19
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
20
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी एक; तानसा तलाव भरून वाहू लागला!

Sangli: अवकाळीच्या फटक्याने ११७ गावांतील पिके आडवी, कोणत्या तालुक्यांत सर्वाधिक नुकसान.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:52 IST

सहाशे शेतकऱ्यांचे नुकसान 

सांगली : आठवड्यापूर्वी झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील ११७ गावांतील ६०४ शेतकऱ्यांच्या दोनशे हेक्टर फळ आणि बागायती पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने काढला आहे. कृषी आणि महसूलने पंचनामेही सुरू केले आहेत.यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. वादळी वारे आणि मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने अनेक भागात नुकसान झाले. यावर्षी प्रथमच मे महिन्यातील १४ दिवस पावसाचे ठरले. या महिन्यात जिल्ह्यात सरासरी २३८ मिलिमीटर एवढा विक्रमी पाऊस झाला. शेतशिवारांमध्ये जिरायती पिके नसली तरी अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भाजीपाला, फळबागांसह अन्य पिके घेतली होती. बागायती पिकेही आहेत. उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा सामना करीत शेतकऱ्यांनी बागा जगविल्या होत्या. मात्र, मागच्या दोन आठवड्यात झालेल्या पावसाने बागायती आणि फळपिकांची नासाडी केली आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची मदत मिळते की नाही, अशी शंका शेतकऱ्यांतून व्यक्त होत होती. मात्र शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नुकसानभरपाई मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार ११७ गावे बाधित असून, ६०४ शेतकऱ्यांचे २१० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.

अवकाळी पिकांचे नुकसान (क्षेत्र हेक्टरमध्ये)तालुका - शेतकरी - गावे - क्षेत्रमिरज - ४४ - १० -१९तासगाव - २६ - ०७ - ०९क.महांकाळ - ४४ - १५ - २३वाळवा - ७० - १६ - १७शिराळा - २६४ - २२ - ४४पलूस - ६३ - १५ - २७कडेगाव - ५५ - १७ - २३खानापूर - ०६ - ०३ - ०६आटपाडी - १७ - ०५ - १६जत - १५ - ०७ - ०९

शिराळा, वाळवा तालुक्यांत सर्वाधिक नुकसानशिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यांत बागायती पिकांचे क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचा फटका याच तालुक्यांना सर्वाधिक बसतो. शिराळा तालुक्यातील २६४ शेतकऱ्यांचे २२ गावांतील ४३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच वाळवा तालुक्यातील ७० शेतकऱ्यांचे १७ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसFarmerशेतकरी