आष्ट्यात ‘निराधार’चे मंजुरी पत्रवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:25 IST2021-02-14T04:25:02+5:302021-02-14T04:25:02+5:30
आष्टा : आष्टा शहर व परिसरातील नागरिकांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यावा. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ...

आष्ट्यात ‘निराधार’चे मंजुरी पत्रवाटप
आष्टा : आष्टा शहर व परिसरातील नागरिकांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यावा. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील गोरगरिबांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मदतीचा हात देण्यात येत आहे. सुहास रुगे यांनी अल्पावधीतच आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे, असे प्रतिपादन संजय गांधी निराधार योजनेचे वाळवा तालुका अध्यक्ष संजय पाटील यांनी केले.
आष्टा येथे ५१ लाभार्थांना संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदान मंजुरीचे पत्र संजय पाटील, संचालक सुहास रुगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दिलीप वग्यानी, बबन थोटे, विराज शिंदे, झुंजारराव पाटील, अनिल पाटील, संग्राम फडतरे, उज्वला पाटील, कौशिक वग्यानी, अनिल पाटील, व्ही. डी. पाटील, उपनगराध्यक्ष प्रतिभा पेटारे, तेजश्री बोंडे आदी उपस्थित होते. अनिल पाटील यांनी स्वागत केले. जयदीप थोटे यांनी आभार मानले.
फोटो-१३आष्टा२