शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

coronavirus: सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन गरजेचा, अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 06:38 IST

सध्या उपलब्ध असलेली साधनसाम्रगी, व्यवस्था पाहता, रुग्णसंख्या आवाक्याबाहेर जात आहे. रुग्णांना बेड न मिळणे, आॅक्सिजन व व्हेंटिलेटर न मिळणे अशा गोष्टी होत आहेत. साधनसामग्रीच्या तुटवड्यामुळे नियोजन करताना अडचणी येत आहेत.

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ही साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनची आवश्यकता आहे. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे मत पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत जयंत पाटील यांनी सांगलीतील पत्रकारांशी आॅनलाईन संवाद साधला. जयंत पाटील म्हणाले, सध्या उपलब्ध असलेली साधनसाम्रगी, व्यवस्था पाहता, रुग्णसंख्या आवाक्याबाहेर जात आहे. रुग्णांना बेड न मिळणे, आॅक्सिजन व व्हेंटिलेटर न मिळणे अशा गोष्टी होत आहेत. साधनसामग्रीच्या तुटवड्यामुळे नियोजन करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे संसर्ग साखळी तुटणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी केलेल्या लॉकडाऊनचा फारसा उपयोग झाला नाही. लोक कोरोनाबद्दल गाफील आहेत. सुरक्षित अंतराचे पालन करण्यास ते टाळाटाळ करीत आहेत.ते म्हणाले, प्रशासनाने खासगी रुग्णालये ताब्यात घेतली आहेत. पण, अनेक  रुग्णालयांमधील रुग्णांना मिळणाºया वागणुकीबद्दल तक्रारी येत आहेत. रुग्ण व नातेवाईकांत त्याबद्दल नाराजी आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी अशा तक्रारींची शहानिशा करूनच संबंधितांवर कारवाई करावी. यासाठी जिल्ह्याची सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टिम तयार करावी. रुग्णांनी बेड शोधत फिरण्यापेक्षा त्यांना या सिस्टिममधून रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था होणे आवश्यक आहे.मुंबईतील डॉक्टर्स, कर्मचारी बोलावणारजयंत पाटील म्हणाले, कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने सांगलीत मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे मुंबईतील डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी यांना सांगलीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर आॅक्सिजन, व्हेंटिलेटर्स यांचीही पुरेशी उपलब्धता व्हावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत.सामूहिक प्रयत्नातून कोरोनावर मात शक्यजयंत पाटील म्हणाले, सामूहिक प्रयत्नातून कोरोनावर मात करता येते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी याकामी सहकार्य करावे. जिल्हाधिकाºयांसोबत फिरून मी परिस्थितीचा आढावा घेणार आहे. त्याचबरोबर संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास प्राधान्य देणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSangliसांगलीJayant Patilजयंत पाटील