शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

CoronaVirus : लॉकडाऊनमुळे ८१ दिवसांनी घडली बाप-लेकींची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 5:11 PM

कामधंद्यासाठी भटकणाऱ्या स्थलांतरित कुटुंबातील दोन मुली लॉकडाऊनमुळे राजापूर तालुक्यात अडकल्या. या मुलींना परत आणण्यासाठी बापाने प्रयत्न सुरू केले. त्याला नगरसेवक अभिजित भोसले यांची साथ मिळाली. मित्रांच्या मदतीने या मुलींना कोल्हापूर आणि नंतर सांगलीच्या सीमेवर आणण्यात आले. तेथून पोलिसांना विनंती करून या मुलींना सांगलीत आणण्यात आले. या बाप-लेकींची तब्बल ८१ दिवसांनंतर भेट झाली आणि त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे ८१ दिवसांनी घडली बाप-लेकींची भेटआणि त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या

सांगली : कामधंद्यासाठी भटकणाऱ्या स्थलांतरित कुटुंबातील दोन मुली लॉकडाऊनमुळे राजापूर तालुक्यात अडकल्या. या मुलींना परत आणण्यासाठी बापाने प्रयत्न सुरू केले. त्याला नगरसेवक अभिजित भोसले यांची साथ मिळाली. मित्रांच्या मदतीने या मुलींना कोल्हापूर आणि नंतर सांगलीच्या सीमेवर आणण्यात आले. तेथून पोलिसांना विनंती करून या मुलींना सांगलीत आणण्यात आले. या बाप-लेकींची तब्बल ८१ दिवसांनंतर भेट झाली आणि त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.मंगळवेढा तालुक्यातील धुळाप्पा केंगार हे कुटुंबासह काही महिन्यांपूर्वी राजापूर तालुक्यात रस्त्याच्या कामावर होते. तेथे जावडे गावातील माध्यमिक आश्रमशाळेत त्यांच्या दोन मुली शिक्षण घेत होत्या. वर्षा व सुवर्णा या दोन मुली सातवी व तिसरीच्या वर्गात होत्या. लॉकडाऊनपूर्वी धुळाप्पा हे सांगलीत हनुमाननगरमध्ये राहण्यास आले, पण मुली शिक्षणासाठी राजापूरलाच राहिल्या.

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाला अन् मुलींची भेट या कुटुंबाला दुर्मिळ झाली. तिकडे मुलींनाही घरची आठवण होत होती. त्याही दररोज दूरध्वनी करून परत नेण्याची मागणी करीत होत्या. त्यांच्या आर्त हाकेने बापाच्या हृदयाची घालमेल होत होती. मुलींना परत आणण्यासाठी शासकीय पास काढावा लागतो, वाहनांची व्यवस्था करावी लागते. त्यासाठी येणाऱ्या खर्चाची तजवीज केंगार यांच्याकडे नव्हती. त्यामुळे मुलींचंी कधी भेट होणार, याचीच चिंता त्यांना होती.केंगार यांनी नगरसेवक अभिजित भोसले यांची भेट घेतली व मुलींना परत आणा, अशी साद घातली. भोसले यांनी राजापूर, रत्नागिरी, कोल्हापूर परिसरातील मित्रांशी संपर्क साधला. राजापूरहून कोल्हापूर अथवा सांगलीला कोण येणार आहे का, याची चौकशी केली. अखेर चार दिवसांच्या प्रयत्नानंतर राजापूर येथील मेहबूब मठद हे कोल्हापूरला कामानिमित्त येणार होते. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या वाहनातून या दोन्ही मुलींना कोल्हापूरपर्यंत आणण्याची विनंती केली. मठद यांनीही सहमती दर्शविली.

दोन्ही मुली त्यांच्या वाहनातून कोल्हापूरपर्यंत आल्या. तेथून भोसले यांचे मित्र सुमित पाटील यांनी या मुलींना कोल्हापुरातून सांगलीच्या सीमेपर्यंत म्हणजे अंकलीपर्यंत आणले. पण सीमेवर पोलिसांनी मुलींना अडविले. नगरसेवक भोसले, केंगार हेही सीमेवर होते. त्यांनी कोल्हापूर पोलिसांना विनंती केली.

अखेर माजी खासदार राजू शेट्टी यांनी दूरध्वनी करून पोलिसांना सूचना दिल्या. त्यानंतर या मुलींची तपासणी करून त्यांना वडिलांच्या ताब्यात दिले. सांगली पोलिसांनीही मुलींची रजिस्टरवर नोंद करून होम क्वारंटाईनच्या सूचना दिल्या. अखेर ८१ दिवसांनंतर मुलींशी भेट झाल्याने बापाचे डोळेही पाणावले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली