दोन दिवसात २९७ जणांना कोरोना; १२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:30 IST2021-09-21T04:30:04+5:302021-09-21T04:30:04+5:30

रविवारी जिल्ह्यात नवीन १५५ रुग्ण आढळले, तर दोघांचा मृत्यू झाला. यात आटपाडी व खानापूर प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दिवसभरात ...

Corona to 297 people in two days; 12 killed | दोन दिवसात २९७ जणांना कोरोना; १२ जणांचा मृत्यू

दोन दिवसात २९७ जणांना कोरोना; १२ जणांचा मृत्यू

रविवारी जिल्ह्यात नवीन १५५ रुग्ण आढळले, तर दोघांचा मृत्यू झाला. यात आटपाडी व खानापूर प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दिवसभरात २०३ जण कोरोनामुक्त झाले. परजिल्ह्यातील दोघे उपचारास दाखल झाले.

सोमवारी दिवसभरात नवीन १४२ जण बाधित आढळले. मृत्यूसंख्या मात्र वाढत १० जणांचा मृत्यू झाला. यात सांगली १, आटपाडी, तासगाव आणि मिरज तालुक्यातील प्रत्येकी २, खानापूर, कवठेमहांकाळ आणि वाळवा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

उपचार घेत असलेल्या ११०६ जणांपैकी ३९७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३०९ जण ऑक्सिजनवर, तर ८८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

सोमवारी आरोग्य विभागाने आरटीपीसीआर अंतर्गत २३३३ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ८७ जण बाधित आढळले, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ३८३९ जणांच्या नमुने तपासणीतून ५७ जण पॉझिटिव्ह आढळले.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १९७१६०

उपचार घेत असलेले ११०६

कोरोनामुक्त झालेले १९०८३९

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ५२१५

सोमवारी दिवसभरात

सांगली १०

मिरज ३

आटपाडी २१

कडेगाव १३

खानापूर ३०

पलूस ८

तासगाव २४

जत ८

कवठेमहांकाळ ३

मिरज तालुका ९

शिराळा ४

वाळवा ९

Web Title: Corona to 297 people in two days; 12 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.