शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
6
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
7
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
8
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
9
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
10
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
11
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
12
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
13
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
14
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
15
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
16
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
17
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
18
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
19
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
20
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला

जयंत पाटील, राजू शेट्टी यांच्या श्रेयवादानेच ऊस दराची कोंडी!, शेतकऱ्यांना आर्थिक फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 13:17 IST

कारखान्यांच्या गळीत हंगामावरही परिणाम

सांगली : माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर पॅटर्ननुसार सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी ऊस दर जाहीर करण्याची मागणी केली. कारखानदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यावरून शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ताब्यात असलेल्या राजारामबापू कारखान्यावर ठिय्या मारला. येथे जयंतराव आणि शेट्टी यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्यामुळे ऊस दराची कोंडी फुटण्याऐवजी शेतकऱ्यांचीच आर्थिक कोंडी निर्माण झाली.जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यापैकी १८ कारखाने गळीत हंगाम घेत आहेत. या कारखान्यांसाठी एक लाख ३५ हजार ६८८.८ हेक्टर क्षेत्रावरील ऊस गळीतासाठी मिळणार आहे. गतवर्षीपेक्षा पाच हजार हेक्टरने उसाचे क्षेत्र घटले आहे. दुष्काळामुळेही उसाच्या उताऱ्यात घट येणार आहे. या सर्व समस्या कारखाना व्यवस्थापनासमोर आहेत. दुसऱ्या बाजूला उसाचे क्षेत्र कमी आणि साखरेला बाजारात जादा दर असतानाही कारखानदार जादा दर देण्यासाठी तयार नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार एफआरपीवर प्रति टन ५० आणि १०० रुपये देण्यास तयार आहेत. पण, सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी कोल्हापूर जिल्ह्याचा पॅटर्न मान्य नसल्याचे जाहीर केले आहे. शेजारच्या जिल्ह्यातील कारखानदारांना जमत असेल तर सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनाच अडचण काय, असा सवालही शेतकरी करत आहेत. ऊस दराची कोंडी फोडण्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकाही कारणीभूत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. हातकणंगले लोकसभेच्या मैदानात राजू शेट्टी यांनी उतरणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. याच मैदानात जयंत पाटील यांचे चिरंजीव आणि राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांची चाचपणी चालू आहे. कोल्हापूर पॅटर्न सांगली जिल्ह्याने स्वीकारला तर राजू शेट्टी यांना श्रेय जाणार आहे. म्हणूनच जयंत पाटील आणि सांगली जिल्ह्यातील कारखानदार कोल्हापूर पॅटर्न मान्य करण्यास तयार नाहीत, असा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. एकंदरीत काय तर जयंतराव आणि शेट्टी वादात शेतकऱ्यांची मात्र आर्थिक कोंडी होत आहे. नेत्यांनी राजकीय वाद बाजूला ठेवून ऊस दराची कोंडी फोडावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

काँग्रेस नेत्यांचीही गोचीकाँग्रेसचे नेते माजीमंत्री डॉ. विश्वजित कदम, काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांची राजू शेट्टी यांची चांगली गट्टी आहे. कदम, पाटील यांना कोल्हापूर पॅटर्न मान्य आहे. पण, शेट्टी यांना दुखवायचे नाही आणि जयंत पाटील यांच्याशी वैर घ्यायचे नाही, अशा मनस्थितीमध्ये कदम आणि पाटील आहेत. नेत्यांच्या या राजकारणात शेतकऱ्यांचे आर्थिक दिवाळे निघत असल्याच्या चर्चा सध्या शेतकऱ्यांमध्ये सुरू आहेत.

टॅग्स :SangliसांगलीsugarcaneऊसJayant Patilजयंत पाटीलRaju Shettyराजू शेट्टी