शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Sangli: खासदारकीचे विमान टेकऑफ होण्याआधीच पेटला वाद, आगामी विधानसभेसाठी 'महायुती'मध्ये नेत्यांच्यात स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 16:00 IST

लोकसभेवर टार्गेट अन् विधानसभेवर डोळा..

अशोक पाटीलइस्लामपूर : एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजीत पाटील यांनी मतदारांसाठी आभार मेळावा घेतला. दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील माने यांचे दिल्ली विमान टेकऑफ होण्याअगोदरच इस्लामपुरातील नेत्यांच्यात श्रेयवाद आणि निष्ठेवरून वादाला तोंड फुटले आहे. आगामी विधानसभेच्या उमेदवारीची स्पर्धा ही यामागील राजकीय खेळी असल्याचे बोलले जात आहे.गत विधानसभा निवडणुकीत इस्लामपूरचे तत्कालीन नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात भाजपकडून उमेदवारी मागितली होती. परंतु मतदारसंघ शिवसेनेला गेला. त्यामुळे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राहुल महाडिक, आनंदराव पवार, भीमराव माने यांनी हुतात्मा संकुलातील गौरव नायकवडी यांना ताकद देऊन शिवसेनेत घेतले. तेव्हाच निशिकांत पाटील यांनी बंडखोरी करून इस्लामपूर मतदारसंघात आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाजपमध्येच स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून विधानसभेची तयारीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

हातकणंगलेतून लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपमधूनही युद्धपातळीवर प्रयत्न झाले. परंतु मतदारसंघ शिवसेनेला गेला. तेव्हापासून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराची सूत्रे हाती घेतली. भाजपमधील नेत्यांत पूर्वीपासूनच अंतर्गत वाद आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सवतासुबा मांडून भाजपचाच प्रचार करत असल्याचा दावा केला.

लोकसभेवर टार्गेट अन् विधानसभेवर डोळा..महायुतीतील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, भाजपचे विक्रम पाटील, राहुल महाडिक, अमित ओसवाल, गजानन फल्ले, मनसेचे सनी खराडे यांनी भाजपवरील पक्षनिष्ठेवरून थेट जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनाच टार्गेट केले. यामध्ये निशिकांत पाटील, राहुल महाडिक, आनंदराव पवार, भीमराव माने आणि गौरव नायकवडी आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेकडून सदाभाऊ खोत यांना लोकसभेची उमेदवारी मागितली. पण ती न मिळाल्याने त्यांनी विधानसभेवर डोळा ठेवून आरोपप्रत्यारोप केल्याची चर्चा आहे. त्यानिमित्ताने महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

भाजपची सत्ता येते, त्यावेळी नेत्यांची मोठ्या प्रमाणात आयात होते. हेच नेते सत्तेचा पूर्णपणे फायदा उठवतात आणि पक्षात दुफळी करतात. इस्लामपूर मतदारसंघात आमच्या महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करण्याचे प्रयत्न होतात, याला आयात आणि सत्तेचे लाभ घेतलेले नेतेच कारणीभूत आहेत. हेच नेते गटबाजी करून विरोधकांना निवडणूक सोपी करून देतात. -विक्रम पाटील, ज्येष्ठ नेते (भाजप)

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभा