शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

सरकारच्या फसवणुकीमुळेच हर्षल पाटील यांची आत्महत्या - शशिकांत शिंदे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 19:38 IST

सरकार आर्थिक संकटात, तांदूळवाडीत पाटील कुटुंबीयांची भेट

सांगली : आमचा तो कंत्राटदारच नाही, असे सांगून सरकारने हात झटकले. मात्र, सरकारच्या चुकीच्या धोरणाने, बिले न देण्याच्या भूमिकेने कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली. याला सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे, असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यासह शिंदे यांनी सोमवारी तांदूळवाडी (ता. वाळवा) येथील हर्षल पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतर आजतागायत जिल्ह्यातील एकही शासकीय अधिकारी पाटील कुटुंबीयांच्या घरी फिरकला नाही. यावरून या सरकारची किती बेफिकिरी सुरू आहे, हे स्पष्ट होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही सुरूच आहेत.आता कंत्राटदार आत्महत्या करीत आहेत. सरकारने वेळेत कामाची बिले दिली असती तर हर्षल पाटील यांच्या आत्महत्येची घटना घडलीच नसती. पाटील यांच्या कुटुंबाला आधार देणे, मदत देण्याची भूमिका सरकारची असायला हवी होती. मात्र, त्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले. या घटनेला सर्वस्वी सरकार व त्यांच्या संबंधित खात्याचे मंत्रीच जबाबदार आहेत.

कंत्राटदारांना सतर्क केले होते : जयंत पाटीलसरकारने सर्व फसव्या योजना जाहीर केल्या होत्या. त्यामुळे त्याचे परिणाम सर्व घटकांवर होणार होते. कंत्राटदारांना जेवढी बिले मिळतील तेवढीच कामे करण्याबाबत सतर्क केले होते. मात्र, अनेक कंत्राटदारांनी मोठ्या प्रमाणावर कामे घेतली. सरकारने बिले न देता त्यांची फसवणूक केली, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

सरकार आर्थिक संकटातजयंत पाटील म्हणाले की, राज्यात पाच लाख कंत्राटदारांची बिले थकीत आहेत. सरकारने अनेक भूलथापा दिल्या, फसव्या घोषणा केल्या. अनेक कामांची उद्घाटने केली. आर्थिक अडचणीमुळे आता सरकार पैसे देत नाही. या सर्वांचा परिणाम शेतकरी, कंत्राटदार, उद्योजक यांच्यावर होत आहे. हर्षल पाटील हे उपकंत्राटदार होते. त्यांनी ज्या सरकारी कंत्राटदाराकडून काम घेतले त्यालाही सरकारने दाद दिली नाही.