शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
4
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
5
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
6
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
7
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
8
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
9
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
10
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
11
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
12
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
13
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
14
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
15
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
16
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
17
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
18
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
19
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
20
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या फसवणुकीमुळेच हर्षल पाटील यांची आत्महत्या - शशिकांत शिंदे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 19:38 IST

सरकार आर्थिक संकटात, तांदूळवाडीत पाटील कुटुंबीयांची भेट

सांगली : आमचा तो कंत्राटदारच नाही, असे सांगून सरकारने हात झटकले. मात्र, सरकारच्या चुकीच्या धोरणाने, बिले न देण्याच्या भूमिकेने कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली. याला सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे, असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यासह शिंदे यांनी सोमवारी तांदूळवाडी (ता. वाळवा) येथील हर्षल पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतर आजतागायत जिल्ह्यातील एकही शासकीय अधिकारी पाटील कुटुंबीयांच्या घरी फिरकला नाही. यावरून या सरकारची किती बेफिकिरी सुरू आहे, हे स्पष्ट होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही सुरूच आहेत.आता कंत्राटदार आत्महत्या करीत आहेत. सरकारने वेळेत कामाची बिले दिली असती तर हर्षल पाटील यांच्या आत्महत्येची घटना घडलीच नसती. पाटील यांच्या कुटुंबाला आधार देणे, मदत देण्याची भूमिका सरकारची असायला हवी होती. मात्र, त्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले. या घटनेला सर्वस्वी सरकार व त्यांच्या संबंधित खात्याचे मंत्रीच जबाबदार आहेत.

कंत्राटदारांना सतर्क केले होते : जयंत पाटीलसरकारने सर्व फसव्या योजना जाहीर केल्या होत्या. त्यामुळे त्याचे परिणाम सर्व घटकांवर होणार होते. कंत्राटदारांना जेवढी बिले मिळतील तेवढीच कामे करण्याबाबत सतर्क केले होते. मात्र, अनेक कंत्राटदारांनी मोठ्या प्रमाणावर कामे घेतली. सरकारने बिले न देता त्यांची फसवणूक केली, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

सरकार आर्थिक संकटातजयंत पाटील म्हणाले की, राज्यात पाच लाख कंत्राटदारांची बिले थकीत आहेत. सरकारने अनेक भूलथापा दिल्या, फसव्या घोषणा केल्या. अनेक कामांची उद्घाटने केली. आर्थिक अडचणीमुळे आता सरकार पैसे देत नाही. या सर्वांचा परिणाम शेतकरी, कंत्राटदार, उद्योजक यांच्यावर होत आहे. हर्षल पाटील हे उपकंत्राटदार होते. त्यांनी ज्या सरकारी कंत्राटदाराकडून काम घेतले त्यालाही सरकारने दाद दिली नाही.