शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेसाठी ग्रामस्तरीय समितीशी संपर्क साधावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 15:48 IST

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कमाल जमीन धारणेची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित खातेदारांनी बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, भ्रमण ध्वनी क्रमांक इत्यादि माहितीसह ग्रामस्तरीय समितीकडे ३० जूनपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. ​

ठळक मुद्देप्रधान मंत्री किसान सन्मान योजनेसाठी ग्रामस्तरीय समितीशी संपर्क साधावाकमाल जमीन धारणेची अट रद्द, बँक खाते, आधार क्रमांक देणे आवश्यक

सांगली : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कमाल जमीन धारणेची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित खातेदारांनी बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, भ्रमण ध्वनी क्रमांक इत्यादि माहितीसह ग्रामस्तरीय समितीकडे ३० जूनपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.जिल्हा प्रशासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना मोहीम स्वरूपात राबवण्यात येत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, या योजनेतून प्रति शेतकरी कुटुंबाला वर्षाला ६ हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यापूर्वी एकूण कमाल जमीन धारणा २ हेक्टर पर्यंत असेल, त्याच शेतकऱ्यांना ही योजना लागू होती. त्यामध्ये केंद्र शासनाने ७ जून २०१९ रोजी सुधारणा करून कमाल जमीन धारणेची अट काढून टाकली आहे. त्यामुळे अधिकाधिक खातेदारांना याचा लाभ घेता येईल, असे ते म्हणाले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत ग्राम स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. तलाठी हे या समितीचे प्रमुख असतील. त्याशिवाय ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी, कृषि सहाय्यक, विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव हे या समितीचे सदस्य आहेत.

या समितीने संबंधित पात्र खातेदारांची संख्या निश्चित करायची आहे. त्यासाठी संबंधित खातेदारांनी बँक खाते पासबुकची छायांकित प्रत, आधार क्रमांक, भ्रमण ध्वनी क्रमांक इत्यादि माहिती या समितीकडे जमा करावयाची आहे. ज्या शेतकरी खातेदारांचे सामाईक खाते असेल व खात्यामध्ये आणेवारी निश्चित झाली नसेल, अशा बाबतीत सदरच्या खात्यातील व्यक्तिंनी ग्रामस्तरीय समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, या योजनेंतर्गत पात्र लाभार्थींच्या याद्या ग्रामस्तरीय समितीने ग्रामपातळीवर प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्यावर काही हरकती असल्यास त्यावर ग्रामस्तरीय समितीने निर्णय घ्यावा. हा निर्णय मान्य नसल्यास संबंधित खातेदाराला तालुकास्तरीय समितीकडे दाद मागता येईल, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जमीन धारण करणारी संस्था, संवैधानिक पद धारण करणारी आजी - माजी व्यक्ती, आजी झ्र माजी मंत्री, खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष केंद्र व राज्य शासन, शासन अंगिकृत निमशासकीय संस्था, स्वायत्त संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांचे कार्यरत व निवृत्त कर्मचारी, गत आर्थिक वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती, १० हजार पेक्षा जास्त कायम निवृत्तीवेतन असलेल्या व्यक्ती, नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक, वकील, अभियंता, सनदी लेखापाल, वास्तुशास्त्रज्ञ इत्यादि हे या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.

टॅग्स :Farmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली