शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

कडधान्ये-तृणधान्ये, तेलबिया नियमनमुक्तीचा विचार : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 7:25 PM

भाजीपाला नियमनमुक्तीनंतर आता कडधान्ये, तृणधान्ये आणि तेलबियाही नियमनमुक्त करण्याचा विचार आहे. शासनाने यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. ही समिती लवकरच आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देयवतमाळ घटनेबाबत शासन गंभीर

इस्लामपूर, 8 : भाजीपाला नियमनमुक्तीनंतर आता कडधान्ये, तृणधान्ये आणि तेलबियाही नियमनमुक्त करण्याचा विचार आहे. शासनाने यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. ही समिती लवकरच आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

खोत म्हणाले, भाजीपाला नियमनमुक्तीचा निर्णय घेतल्यावर शेतकºयांची अडत, हमाली, तोलाई आणि बाजार समित्यांचा सेस अशा सगळ्या जाचातून मुक्तता झाली. त्यामुळे शेतकरी आपला भाजीपाला कोठेही विकू शकतो. नियमनमुक्तीच्या या लाभानंतर आता शेतकºयांनी कडधान्य, तृणधान्य आणि तेलबियासुध्दा नियमनमुक्त करा, अशी मागणी केली आहे.

ते म्हणाले, शेतकºयांच्या या मागणीचा विचार करुन मुख्यमंत्र्यांनी माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. शेतकºयांच्या मागणीनुसार कडधान्य, तृणधान्य व तेलबिया नियमनमुक्त करण्याचा शासनाचा सकारात्मक विचार आहे. नियमनमुक्तीचा हा निर्णय झाल्यावर शेतकºयांना बाजारभावापेक्षा १०० रुपयांचा जादा दर मिळेल. त्यामुळे समिती आपला अहवाल लवकरच मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहे.

यवतमाळ घटनेबाबत शासन गंभीरखोत म्हणाले, यवतमाळ येथील शेतकरी मृत्यूप्रकरणी सरकार गंभीर आहे. या घटनेत दोषी असणारे अधिकारी, औषध विक्रेते आणि कंपन्यांविरुध्द फौजदारी गुन्हे दाखल करुन मृत शेतकºयांच्या वारसांना नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न आहे.

यवतमाळ येथे जाऊन आपण स्वत: पाहणी केली आहे. सर्व वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर या शेतकरी मृत्यूप्रकरणी दोषी असणाºयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केल्याचेही कृषी राज्यमंत्री खोत यांनी स्पष्ट केले.