शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

देशात संविधान आणि मनुस्मृतीत संघर्ष -: बाबूराव गुरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:36 IST

देशात संविधान विरुद्ध मनुस्मृती असा संघर्ष सुरू आहे. छुप्या पद्धतीने ‘मनुस्मृती’ची धोरणे राबविली जात आहेत. यातील अनेक गोष्टी काल्पनिक व खोट्या आहेत. जातीव्यवस्था मोडल्याशिवाय मनुस्मृतीचा पराभव होऊ शकत नाही.

ठळक मुद्देसंग्राम संस्थेच्या अध्यक्षा मीना शेषू प्रास्ताविकात म्हणाल्या की, समाजात जातीव्यवस्था घट्ट झाली आहे. त्यातून ‘सैराट’सारख्या घटना घडत असतात. त्यामागे मनुस्मृतीचा विचार आहे. हा विचार मोडून काढू.सांगलीत आ. ह. साळुंखे यांच्या पुस्तकावर संग्राम संस्थेच्यावतीने चर्चा

सांगली : देशात संविधान विरुद्ध मनुस्मृती असा संघर्ष सुरू आहे. छुप्या पद्धतीने ‘मनुस्मृती’ची धोरणे राबविली जात आहेत. यातील अनेक गोष्टी काल्पनिक व खोट्या आहेत. जातीव्यवस्था मोडल्याशिवाय मनुस्मृतीचा पराभव होऊ शकत नाही. त्यासाठी सर्वांनी संघटित झाले पाहिजे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांनी सोमवारी व्यक्त केले.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सांगलीत ३० जूनला सत्कार होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुस्तकांवर जिल्हाभरात चर्चा आयोजित केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांगलीतील संपदा ग्रामीण महिला संस्था (संग्राम) यांच्यावतीने मराठा समाज भवनात ‘मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती’ या पुस्तकावर प्रा. डॉ. गुरव यांनी विचार मांडणी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टी. डी. लाड, तर प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. के. डी. शिंदे उपस्थित होते.

प्रा. डॉ. गुरव म्हणाले की, मनुस्मृतीत स्त्रियांना स्वातंत्र्य नाकारले आहे. त्यांना मानसिक गुलामगिरीत ढकलले होते. पुरुषप्रधान संस्कृती वाढविण्यास हीच संस्कृती कारणीभूत ठरली. समाजातील विशिष्ट वर्गच श्रेष्ठ व इतर शुद्र असा भेद निर्माण केला गेला. हा ग्रंथ बहुजन समाजाला टाचेखाली तुडविणारा आहे. त्यात अनेक खोट्या, काल्पनिक गोष्टी आहेत. या ग्रंथाशी मनूचा काहीच संबंध नाही. पाच हजार वर्षांपूर्वी मनूचा जन्म झाला होता. हा ग्रंथ दोन हजार वर्षांपूर्वी लिहिला गेला. या संस्कृतीचा छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनाही त्रास सहन करावा लागला. पण त्या साऱ्याला शिवाजी महाराज पुरून उरले.

विशिष्ट वर्गाची मक्तेदारी निर्माण करणाºया या मनुस्मृतीविरोधात महात्मा फुले यांनी पहिल्यांदा आवाज उठविला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळून त्याचा निषेध केला होता. त्यामुळे देशात मनुस्मृतीचे नव्हे, तर भीमस्मृतीचे राज्य येऊ शकले.

संग्राम संस्थेच्या अध्यक्षा मीना शेषू प्रास्ताविकात म्हणाल्या की, समाजात जातीव्यवस्था घट्ट झाली आहे. त्यातून ‘सैराट’सारख्या घटना घडत असतात. त्यामागे मनुस्मृतीचा विचार आहे. हा विचार मोडून काढू.समाजाची पिळवणूक करणारी ही संस्कृती असून, त्याविरोधात संघटितपणे उभे राहिले पाहिजे, असे मत टी. डी. लाड यांनी व्यक्त केले. सुलभा होवाळे यांनी आभार मानले. यावेळी संग्राम संस्थेच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.चळवळ सुरू व्हावीदारिद्र्य, अज्ञान, विषमता, अंधश्रद्धा याचा फायदा उठवित आजही मनुस्मृतीतील धोरणे राबविण्याचा प्रयत्न केला जातो. त्याविरुध्द संघटितरित्या चळवळ सुरू केली पाहिजे, असे डॉ. गुरव म्हणाले. 

टॅग्स :SangliसांगलीSocialसामाजिक