शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

देशात संविधान आणि मनुस्मृतीत संघर्ष -: बाबूराव गुरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:36 IST

देशात संविधान विरुद्ध मनुस्मृती असा संघर्ष सुरू आहे. छुप्या पद्धतीने ‘मनुस्मृती’ची धोरणे राबविली जात आहेत. यातील अनेक गोष्टी काल्पनिक व खोट्या आहेत. जातीव्यवस्था मोडल्याशिवाय मनुस्मृतीचा पराभव होऊ शकत नाही.

ठळक मुद्देसंग्राम संस्थेच्या अध्यक्षा मीना शेषू प्रास्ताविकात म्हणाल्या की, समाजात जातीव्यवस्था घट्ट झाली आहे. त्यातून ‘सैराट’सारख्या घटना घडत असतात. त्यामागे मनुस्मृतीचा विचार आहे. हा विचार मोडून काढू.सांगलीत आ. ह. साळुंखे यांच्या पुस्तकावर संग्राम संस्थेच्यावतीने चर्चा

सांगली : देशात संविधान विरुद्ध मनुस्मृती असा संघर्ष सुरू आहे. छुप्या पद्धतीने ‘मनुस्मृती’ची धोरणे राबविली जात आहेत. यातील अनेक गोष्टी काल्पनिक व खोट्या आहेत. जातीव्यवस्था मोडल्याशिवाय मनुस्मृतीचा पराभव होऊ शकत नाही. त्यासाठी सर्वांनी संघटित झाले पाहिजे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांनी सोमवारी व्यक्त केले.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सांगलीत ३० जूनला सत्कार होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुस्तकांवर जिल्हाभरात चर्चा आयोजित केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांगलीतील संपदा ग्रामीण महिला संस्था (संग्राम) यांच्यावतीने मराठा समाज भवनात ‘मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती’ या पुस्तकावर प्रा. डॉ. गुरव यांनी विचार मांडणी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टी. डी. लाड, तर प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. के. डी. शिंदे उपस्थित होते.

प्रा. डॉ. गुरव म्हणाले की, मनुस्मृतीत स्त्रियांना स्वातंत्र्य नाकारले आहे. त्यांना मानसिक गुलामगिरीत ढकलले होते. पुरुषप्रधान संस्कृती वाढविण्यास हीच संस्कृती कारणीभूत ठरली. समाजातील विशिष्ट वर्गच श्रेष्ठ व इतर शुद्र असा भेद निर्माण केला गेला. हा ग्रंथ बहुजन समाजाला टाचेखाली तुडविणारा आहे. त्यात अनेक खोट्या, काल्पनिक गोष्टी आहेत. या ग्रंथाशी मनूचा काहीच संबंध नाही. पाच हजार वर्षांपूर्वी मनूचा जन्म झाला होता. हा ग्रंथ दोन हजार वर्षांपूर्वी लिहिला गेला. या संस्कृतीचा छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनाही त्रास सहन करावा लागला. पण त्या साऱ्याला शिवाजी महाराज पुरून उरले.

विशिष्ट वर्गाची मक्तेदारी निर्माण करणाºया या मनुस्मृतीविरोधात महात्मा फुले यांनी पहिल्यांदा आवाज उठविला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळून त्याचा निषेध केला होता. त्यामुळे देशात मनुस्मृतीचे नव्हे, तर भीमस्मृतीचे राज्य येऊ शकले.

संग्राम संस्थेच्या अध्यक्षा मीना शेषू प्रास्ताविकात म्हणाल्या की, समाजात जातीव्यवस्था घट्ट झाली आहे. त्यातून ‘सैराट’सारख्या घटना घडत असतात. त्यामागे मनुस्मृतीचा विचार आहे. हा विचार मोडून काढू.समाजाची पिळवणूक करणारी ही संस्कृती असून, त्याविरोधात संघटितपणे उभे राहिले पाहिजे, असे मत टी. डी. लाड यांनी व्यक्त केले. सुलभा होवाळे यांनी आभार मानले. यावेळी संग्राम संस्थेच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.चळवळ सुरू व्हावीदारिद्र्य, अज्ञान, विषमता, अंधश्रद्धा याचा फायदा उठवित आजही मनुस्मृतीतील धोरणे राबविण्याचा प्रयत्न केला जातो. त्याविरुध्द संघटितरित्या चळवळ सुरू केली पाहिजे, असे डॉ. गुरव म्हणाले. 

टॅग्स :SangliसांगलीSocialसामाजिक