शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
2
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
3
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
4
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
5
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
6
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
7
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
8
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
9
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
10
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
11
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
12
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
13
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
14
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
15
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
16
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
17
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
18
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
19
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
20
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल

देशात संविधान आणि मनुस्मृतीत संघर्ष -: बाबूराव गुरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:36 IST

देशात संविधान विरुद्ध मनुस्मृती असा संघर्ष सुरू आहे. छुप्या पद्धतीने ‘मनुस्मृती’ची धोरणे राबविली जात आहेत. यातील अनेक गोष्टी काल्पनिक व खोट्या आहेत. जातीव्यवस्था मोडल्याशिवाय मनुस्मृतीचा पराभव होऊ शकत नाही.

ठळक मुद्देसंग्राम संस्थेच्या अध्यक्षा मीना शेषू प्रास्ताविकात म्हणाल्या की, समाजात जातीव्यवस्था घट्ट झाली आहे. त्यातून ‘सैराट’सारख्या घटना घडत असतात. त्यामागे मनुस्मृतीचा विचार आहे. हा विचार मोडून काढू.सांगलीत आ. ह. साळुंखे यांच्या पुस्तकावर संग्राम संस्थेच्यावतीने चर्चा

सांगली : देशात संविधान विरुद्ध मनुस्मृती असा संघर्ष सुरू आहे. छुप्या पद्धतीने ‘मनुस्मृती’ची धोरणे राबविली जात आहेत. यातील अनेक गोष्टी काल्पनिक व खोट्या आहेत. जातीव्यवस्था मोडल्याशिवाय मनुस्मृतीचा पराभव होऊ शकत नाही. त्यासाठी सर्वांनी संघटित झाले पाहिजे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांनी सोमवारी व्यक्त केले.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सांगलीत ३० जूनला सत्कार होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुस्तकांवर जिल्हाभरात चर्चा आयोजित केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांगलीतील संपदा ग्रामीण महिला संस्था (संग्राम) यांच्यावतीने मराठा समाज भवनात ‘मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती’ या पुस्तकावर प्रा. डॉ. गुरव यांनी विचार मांडणी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टी. डी. लाड, तर प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. के. डी. शिंदे उपस्थित होते.

प्रा. डॉ. गुरव म्हणाले की, मनुस्मृतीत स्त्रियांना स्वातंत्र्य नाकारले आहे. त्यांना मानसिक गुलामगिरीत ढकलले होते. पुरुषप्रधान संस्कृती वाढविण्यास हीच संस्कृती कारणीभूत ठरली. समाजातील विशिष्ट वर्गच श्रेष्ठ व इतर शुद्र असा भेद निर्माण केला गेला. हा ग्रंथ बहुजन समाजाला टाचेखाली तुडविणारा आहे. त्यात अनेक खोट्या, काल्पनिक गोष्टी आहेत. या ग्रंथाशी मनूचा काहीच संबंध नाही. पाच हजार वर्षांपूर्वी मनूचा जन्म झाला होता. हा ग्रंथ दोन हजार वर्षांपूर्वी लिहिला गेला. या संस्कृतीचा छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनाही त्रास सहन करावा लागला. पण त्या साऱ्याला शिवाजी महाराज पुरून उरले.

विशिष्ट वर्गाची मक्तेदारी निर्माण करणाºया या मनुस्मृतीविरोधात महात्मा फुले यांनी पहिल्यांदा आवाज उठविला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळून त्याचा निषेध केला होता. त्यामुळे देशात मनुस्मृतीचे नव्हे, तर भीमस्मृतीचे राज्य येऊ शकले.

संग्राम संस्थेच्या अध्यक्षा मीना शेषू प्रास्ताविकात म्हणाल्या की, समाजात जातीव्यवस्था घट्ट झाली आहे. त्यातून ‘सैराट’सारख्या घटना घडत असतात. त्यामागे मनुस्मृतीचा विचार आहे. हा विचार मोडून काढू.समाजाची पिळवणूक करणारी ही संस्कृती असून, त्याविरोधात संघटितपणे उभे राहिले पाहिजे, असे मत टी. डी. लाड यांनी व्यक्त केले. सुलभा होवाळे यांनी आभार मानले. यावेळी संग्राम संस्थेच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.चळवळ सुरू व्हावीदारिद्र्य, अज्ञान, विषमता, अंधश्रद्धा याचा फायदा उठवित आजही मनुस्मृतीतील धोरणे राबविण्याचा प्रयत्न केला जातो. त्याविरुध्द संघटितरित्या चळवळ सुरू केली पाहिजे, असे डॉ. गुरव म्हणाले. 

टॅग्स :SangliसांगलीSocialसामाजिक