शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

सांगलीत आघाडीचा सूर जुळता जुळेना... : काँग्रेस-राष्ट्रवादीत धुसफूस-महापालिका निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 23:44 IST

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास दोन दिवसांचा कालावधी उरला असताना, राजकीय पक्षांच्या आघाडीवर धावपळ सुरू आहे.

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास दोन दिवसांचा कालावधी उरला असताना, राजकीय पक्षांच्या आघाडीवर धावपळ सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीत आघाडीवरून पुन्हा धुसफूस सुरू झाली आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीला ३० पेक्षा अधिक जागा देण्यास नकार दिला आहे, तर राष्ट्रवादीने ३३ ते ३५ जागांची मागणी कायम ठेवली आहे. त्यामुळे सोमवारी रात्रीपर्यंत जागा वाटपावरून आघाडीचा सूर जुळलेला नव्हता.

काँग्रेसच्या उमेदवारीबाबत सकाळी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या बंगल्यावर गोपनीय बैठक सुरू होती. या बैठकीला महापौर हारूण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, माजी महापौर किशोर शहा उपस्थित होते. त्यानंतर पुन्हा सायंकाळी आमदार विश्वजित कदम, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासोबत ‘विजय’ बंगल्यावर बैठक झाली. काँग्रेसने आघाडी व स्वतंत्र अशा दोन याद्या तयार केल्या आहेत. आघाडी न झाल्यास स्वबळावर ७८ जागा लढविण्याची तयारीही केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोमवारी दुपारी सांगलीत दाखल झाले. त्यानंतर रतनशीनगर येथील शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या बंगल्यात त्यांनी बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. अनेक इच्छुकांनी जयंत पाटील यांची भेट घेऊन उमेदवारीचे साकडे घातले. त्यानंतर जयंत पाटील यांनी कोअर कमिटीच्या सदस्यांसोबत गोपनीय बैठक घेतली. यात उमेदवार यादी, तसेच आघाडीच्या समीकरणावर चर्चा झाल्याचे समजते.

दोन्ही पक्षांकडून प्रमुख पदाधिकाऱ्यांत जागा वाटपावरून बैठकांवर बैठका सुरू होत्या. राष्ट्रवादीकडून ४३-३३ चा नवा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. त्यात दोन जागा जनता दलालाही सोडण्याची तयारी दर्शविण्यात आली. पण काँग्रेसचे नेते ३० पेक्षा अधिक जागा देण्यास तयार नाहीत. एखादी जागा वाढवून देऊ, पण ३३ ते ३५ जागा राष्ट्रवादीला देणार नाही, असा पवित्रा काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे आघाडीचे घोडे जागा वाटपावर अडले आहे.जागावाटप निश्चित झाल्यानंतर उमेदवारांची निश्चिती केली जाणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या सूत्रांनी सांगितले. 

संख्येवर अडले घोडेकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची चर्चा दोन महिन्यापासून सुरू आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांना प्रस्तावही देण्यात आले. हे प्रस्ताव नंतर फेटाळलेही गेले. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोन दिवसांचा अवधी उरला असतानाही, आघाडीचे घोडे संख्येवर येऊन अडले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने किती जागा लढवायच्या, यावरून खल रंगला आहे. काँग्रेस ३० पेक्षा अधिक जागा देण्यास तयार नाही, तर राष्ट्रवादी किमान ३५ जागांची मागणी करीत आहे. सोमवारी रात्री पुन्हा दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. पण त्यातही तोडगा निघाला नाही.इद्रिस नायकवडींची उपस्थितीराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या बंगल्यावर बैठक सुरू होती. या बैठकीत माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनीही भाग घेतला होता. त्यांनी जयंत पाटील यांची भेट घेऊन मिरजेतील जागा वाटपाबाबत चर्चा केल्याचे समजते. याशिवाय राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकांसह दिग्गज इच्छुकांनीही यावेळी जयंत पाटील यांची भेट घेऊन उमेदवारीचे साकडे घातले.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस