शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीचा सूर : सांगलीत पहिली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:14 PM

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पहिल्या बैठकीला अखेर शुक्रवारी मुहूर्त मिळाला. वसंत बंगल्यावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांत आघाडीबाबत बैठक झाली. यावेळी

ठळक मुद्देकाँग्रेसकडून ४३-३३ चा फॉर्म्युला महापालिका निवडणूक

 सांगली : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पहिल्या बैठकीला अखेर शुक्रवारी मुहूर्त मिळाला. वसंत बंगल्यावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांत आघाडीबाबत बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने निम्म्या म्हणजे ३९ जागांची मागणी केली. पण काँग्रेसने निम्म्या जागा देण्याबाबत राष्ट्रवादीला नकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. सध्या दोन्ही पक्षांमध्ये प्राथमिक स्तरावर चर्चा झाली असून आता वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर चर्चेच्या फेऱ्या सुरू होणार आहेत.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होणार असल्याची चर्चा गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. पण प्रत्यक्षात आघाडीबाबत दोन्ही पक्षांची एकत्रित बैठक झालेली नव्हती. यापूर्वी जिल्ह्यातील सर्वच निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीतच प्रामुख्याने लढती होत. पण लोकसभा ते जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत जिल्ह्यात भाजप एक नंबरचा पक्ष बनला आहे. भाजपचा विजयी रथ महापालिका निवडणुकीत रोखण्यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी हात पुढे केला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगली-मिरजेतील पक्षीय बैठकांतून आघाडीचे संकेत दिले होते. माळ बंगला येथे सत्तर एमएलडी जलशुध्दीकरण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील एकत्र आले होते. त्यावेळी आ. जयंत पाटील व खा. चव्हाण यांनी आघाडीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. गुरूवारी सांगलीवाडीतील कार्यक्रमात देखील जयंत पाटील यांनी आघाडीबाबत जयश्रीताई पाटील यांच्याशी चर्चा केली.

त्यानंतर शुक्रवारी काँग्रेस-राष्ट्रवादीची प्राथमिक बैठक कॉंग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या विजय बंगल्यावर पार पडल्याचे वृत्त आहे. या बैठकीला काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, गटनेते किशोर जामदार, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, सांगली विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील उपस्थित होते. आघाडीच्या चर्चेवेळी राष्ट्रवादीने काँग्रेससमोर ३९-३९ जागांचा प्रस्ताव ठेवला. निवडणुकीच्या तोंडावर अनेकजण राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या उमेदवारीचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी निम्म्या जागांचा प्रस्ताव काँग्रेसला देण्यात आला. पण महापालिका क्षेत्रात काँग्रेसची ताकद मोठी आहे. त्यात आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुकांची संख्या मोठी असल्याने निम्म्या जागांच्या प्रस्तावाला नकार देण्यात आला. काँग्रेसने ४३-३३ जागांचा फॉर्म्युला राष्ट्रवादीला दिला आहे.

आघाडीबाबत पहिलीच बैठक असल्याने दोन्ही बाजूंनी फार ताणाताणी करण्यात आली नाही. जागा वाटप व आघाडीचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेणार आहेत. काही जागांवर पेच निर्माण होणार असल्याने यावर देखील चर्चा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात प्राथमिक चर्चा झाल्याचे वृत्त आहे. महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरच आघाडीबाबतच्या बैठका व जागावाटपाचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे एका पदाधिकाºयाने सांगितले.दहा जागांवर पेचआघाडीच्या पहिल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यात दोन्ही पक्षांकडे दहा जागांवर मातब्बर उमेदवार असल्याने या जागांचा तिढा कसा सोडावायचा, यावरही प्राथमिक चर्चा करण्यात आली. त्यात सांगलीवाडीतून काँग्रेसकडून दिलीप पाटील, राष्ट्रवादीतून हरिदास पाटील इच्छुक आहे. धनपाल खोत यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने कुपवाड प्रभाग एकमध्ये विद्यमान नगरसेवक प्रशांत पाटील यांच्या उमेदवारीचे काय करायचे?, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मिरजेतून माजी महापौर इद्रिस नायकवडी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. ते राष्ट्रवादीत आल्यास त्यांनाही काही जागा सोडाव्या लागतील. विशेषत: प्रभाग पाचमधील काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार यांचे पुत्र करण यांच्याविरोधात नायकवडींनी लढाईची तयारी चालविली आहे. अशा आठ ते दहा जागांचा गुंता भविष्यातही वाढणार आहे. 

पुढील आठवड्यात आचारसंहिता?महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेची उत्सुकता साºयांनाच लागली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आचारसंहिेतेबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही प्रभागात बैठका, सभा घेत वातावरण तापविण्यास सुरूवात केली आहे. पक्षपवेशासाठीही इच्छुक मंडळी राजकीय पक्षांकडे पाठपुरावा करताना नेत्यांच्या मागे-पुढे मिरवताना दिसत आहेत. पण आचारसंहिता लांबणीवर जात असल्याने वेगवेगळ्या अफवांनाही ऊत आला आहे. निवडणुका लांबणीवर जाणार असल्याची अफवाही पसरली आहे. त्यात महापालिका प्रशासनाने मात्र आपल्या पातळीवर निवडणुकीची तयारी चालविली आहे. सोमवारी राज्य निवडणूक आयोगाकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे सोमवारनंतर केव्हाही आचारसंहिता लागू होईल, असे प्रशासनाचे मत आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणElectionनिवडणूक