शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

काँग्रेसला मित्रपक्ष सांभाळता येत नाहीत, सुजात आंबेडकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 15:34 IST

राज्यात, देशात जातीय, धार्मिक तेढ निर्माण होईल, असे वातावरण तयार होण्यास भाजप जबाबदार

सांगली : वंचित बहुजन आघाडीने ‘इंडिया’ आघाडीत सहभागासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना प्रस्ताव दिला होता. त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे काँग्रेसला मित्रपक्ष सांभाळता येत नाहीत व नवे पक्ष जोडता येत नाहीत हे पुन्हा दिसून आले, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.ते म्हणाले की, भाजपचा पराभव करायचा असेल तर सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे. आम्हालाही त्यांचा पराभव करायचा आहे. त्यामुळेच आमच्या नेत्यांनी केंद्रातील व राज्यातील आघाडीत सहभागासाठी प्रस्ताव दिला आहे. निवडणुका जाहीर होईपर्यंत त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही, तर राज्यातील सर्व विधानसभा व लोकसभेच्या जागा आम्ही लढवू.देशात भाजप सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मोडीत काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांना पुन्हा मनुस्मृती आणायची आहे. त्यादृष्टीने त्यांची पावले पडत आहेत. दंगली घडवून मुस्लिमांबाबत द्वेषभावना पसरविली जात आहे. त्यांच्या सत्ताकाळात महिलांवरील राजकीय हल्ले, अत्याचार वाढले आहेत. विज्ञानाची, लोकशाहीची दडपशाही त्यांच्या काळात दिसत आहे.दंगलीला भाजप जबाबदारराज्यात, देशात जातीय, धार्मिक तेढ निर्माण होईल, असे वातावरण तयार होण्यास भाजप जबाबदार आहे. दंगली घडवून मतांचे राजकारण ते करीत आहेत. त्यामुळे प्रार्थनास्थळांची सुरक्षा राज्याच्या पोलिसांकडून काढून घेऊन ती बीएसएफ किंवा एनएसडीकडे द्यावी, अशी आमची मागणी आहे.

टॅग्स :SangliसांगलीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीcongressकाँग्रेस