शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेच्या पोटनिवडणुकीत महाआघाडीत फूट, भाजपकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 12:52 IST

ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू असून त्याला सोमवारी सुरूंग लागला. आता माघारी दिवशीच निवडणूक बिनविरोध होणार का, याचा फैसला होईल.

सांगली : महापालिकेच्या प्रभाग १६ मधील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वतीने अर्ज दाखल केल्याने महाआघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले. विरोधी भाजपकडूनही दोन अर्ज दाखल झाले आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू असून त्याला सोमवारी सुरूंग लागला. आता माघारी दिवशीच निवडणूक बिनविरोध होणार का, याचा फैसला होईल.

काँग्रेसचे माजी महापौर हारुण शिकलगार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. सोमवारी शेवटच्या दिवशी आठ जणांनी उमेदवारी अर्ज भरले. काँग्रेसकडून तौफिक शिकलगार, इरफान शिकलगार यांनी अर्ज भरला. यावेळी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, नगरसेवक उत्तम साखळकर, फिरोज पठाण, मयूर पाटील, अमर निंबाळकर आदी उपस्थित होते.

भाजपकडून अमोल गवळी, बालाजी काटकर यांचे अर्ज दाखल झाले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हैसाळकर, शेखर इनामदार, माजी आमदार नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार, गटनेते विनायक सिंहासने, स्थायी सभापती निरंजन आवटी, युवराज बावडेकर, धीरज सूर्यवंशी, नगरसेविका भारती दिगडे उपस्थित होते.

राष्ट्रवादीतून उमर गवंडी, बादशहा पाथरवट यांचा अर्ज दाखल करताना महापौर दिग्विजय सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे, आरिफ बावा, ज्योती आदाटे उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीकडून याकुब जहाँगीर बागवान, तर अपक्ष अमित नंदकुमार पवार यांचाही अर्ज भरणाऱ्यात समावेश आहे.

काँग्रेसने ही निवडणूक बिनविरोधसाठी भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतली होती. मागील निवडणुका काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र लढल्या. तरीही पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज भरून काँग्रेसला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीच्या भूमिकेने महाआघाडीत फूट पडल्याचे दिसून येते. शिवसेनेनेही निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. पण त्यांनी अर्ज दाखल केला नाही.

बिनविरोधचा ९ रोजी निर्णय

- भाजपच्या प्रदेश नेत्यांनी अर्ज भरण्याचे आदेश दिले आहेत. बिनविरोधचा निर्णयही प्रदेशस्तरावरून होईल, असे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी सांगितले.- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्ज भरण्याची सूचना केल्याने उमेदवार दिले आहेत. माघारीचा निर्णय जयंतरावच घेतील, असे महापौर सूर्यवंशींनी स्पष्ट केले. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस