शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

सांगली महापालिकेच्या पोटनिवडणुकीत महाआघाडीत फूट, भाजपकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 12:52 IST

ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू असून त्याला सोमवारी सुरूंग लागला. आता माघारी दिवशीच निवडणूक बिनविरोध होणार का, याचा फैसला होईल.

सांगली : महापालिकेच्या प्रभाग १६ मधील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वतीने अर्ज दाखल केल्याने महाआघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले. विरोधी भाजपकडूनही दोन अर्ज दाखल झाले आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू असून त्याला सोमवारी सुरूंग लागला. आता माघारी दिवशीच निवडणूक बिनविरोध होणार का, याचा फैसला होईल.

काँग्रेसचे माजी महापौर हारुण शिकलगार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. सोमवारी शेवटच्या दिवशी आठ जणांनी उमेदवारी अर्ज भरले. काँग्रेसकडून तौफिक शिकलगार, इरफान शिकलगार यांनी अर्ज भरला. यावेळी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, नगरसेवक उत्तम साखळकर, फिरोज पठाण, मयूर पाटील, अमर निंबाळकर आदी उपस्थित होते.

भाजपकडून अमोल गवळी, बालाजी काटकर यांचे अर्ज दाखल झाले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हैसाळकर, शेखर इनामदार, माजी आमदार नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार, गटनेते विनायक सिंहासने, स्थायी सभापती निरंजन आवटी, युवराज बावडेकर, धीरज सूर्यवंशी, नगरसेविका भारती दिगडे उपस्थित होते.

राष्ट्रवादीतून उमर गवंडी, बादशहा पाथरवट यांचा अर्ज दाखल करताना महापौर दिग्विजय सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे, आरिफ बावा, ज्योती आदाटे उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीकडून याकुब जहाँगीर बागवान, तर अपक्ष अमित नंदकुमार पवार यांचाही अर्ज भरणाऱ्यात समावेश आहे.

काँग्रेसने ही निवडणूक बिनविरोधसाठी भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतली होती. मागील निवडणुका काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र लढल्या. तरीही पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज भरून काँग्रेसला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीच्या भूमिकेने महाआघाडीत फूट पडल्याचे दिसून येते. शिवसेनेनेही निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. पण त्यांनी अर्ज दाखल केला नाही.

बिनविरोधचा ९ रोजी निर्णय

- भाजपच्या प्रदेश नेत्यांनी अर्ज भरण्याचे आदेश दिले आहेत. बिनविरोधचा निर्णयही प्रदेशस्तरावरून होईल, असे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी सांगितले.- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्ज भरण्याची सूचना केल्याने उमेदवार दिले आहेत. माघारीचा निर्णय जयंतरावच घेतील, असे महापौर सूर्यवंशींनी स्पष्ट केले. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस