शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

शेट्टी-खोत यांच्या भूमिकेवर कार्यकर्त्यांत संशयाचे धुके, संघटनेच्या अस्तित्वाचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 17:38 IST

जयंत पाटील आणि शेट्टी यांच्यात दरी निर्माण झाली आहे. याचाच फायदा सदाभाऊ खोत उठविण्याचा प्रयत्न करत आहेत.

अशोक पाटील

इस्लामपूर : गत लोकसभा निवडणुकीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था निर्माण होऊ लागली आहे. सध्या रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनीही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी जवळीक साधली आहे. त्यामुळे खोत व शेट्टी यांच्या भूमिकेवर कार्यकर्त्यांमध्ये संशय निर्माण होऊ लागला आहे.

मागील लोकसभा निवडणूक हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राजू शेट्टी यांनी साखरसम्राटांचे नेते जयंत पाटील यांच्याशी समझौता करून लढविली होती. त्यानंतर महाआघाडीशी सलोख्याचे संबंध निर्माण केले होते. त्यामुळे विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या कोट्यातून एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी यांना आमदारकी मिळणार होती. परंतु, राज्यपालांनी यादीकडे शेवटपर्यंत टाळाटाळ केल्याने आमदारकी गळ्यात पडू शकली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या शेट्टी यांनी आपली भूमिका बदलत ऐन ऊस हंगामात एफआरपीच्या विषयावरून सरकारविरोधातच आघाडी उघडली. त्यातही त्यांना पूर्णत: यश मिळाले नाही.

सरकारने एफआरपीचे दोन तुकडे केल्याने शेट्टी तोंडघशी पडले. यावरही त्यांनी आपली भूमिका मवाळ केली. सध्या विजेच्या प्रश्नावर आक्रमक झाले आहेत. यामुळेच आता जयंत पाटील आणि शेट्टी यांच्यात दरी निर्माण झाली आहे. याचाच फायदा सदाभाऊ खोत उठविण्याचा प्रयत्न करत आहेत. इस्लामपूर येथील पालिकेच्या प्रशासकीय कार्यक्रमात जयंत पाटील व खोत एकत्र आल्याचे इस्लामपुरकरांनी पाहिले. दोघांनी परस्परांची वारेमाप स्तुती केली. गेल्या पाच वर्षांत सदाभाऊंनी स्वत:च्याच नेतृत्वाखालील पालिकेतील तत्कालीन सत्ताधारी विकास आघाडीच्या कामाचा जाहीर पंचनामा केला. जयंत पाटील यांच्या साक्षीने बोभाटे काढले. एकंदरीत, जयंत पाटील व सदाभाऊ यांची वाढती जवळीक आणि शेट्टी यांच्याशी दुरावा या दुटप्पी भूमिकेवर कार्यकर्त्यांत मात्र संशयाचे धुके निर्माण झाले आहे.

आमची जवळीक पूर्वीपासूनची

जयंत पाटील आणि माझी जवळीक पूर्वीपासून आहे. राजारामबापू पाटील यांच्या आशीर्वादासह आमचे घराणे यापूर्वी कार्यरत होते. मरळनाथपूर येथे दूध संस्था सुरू केली होती. जनता पक्षात गेल्यानंतर त्यांच्याच विचाराने आम्ही राजकीय वाटचाल केली होती. सध्या जयंत पाटील व आमची विचारधारा पूर्णत: वेगळी आहे. त्यामुळे जवळ आलो म्हणून बिघडले कोठे, त्यांच्याशी लगेच हातमिळवणी केली असा अर्थ काढू नये.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSadabhau Khotसदाभाउ खोत Jayant Patilजयंत पाटील