शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

शेट्टी-खोत यांच्या भूमिकेवर कार्यकर्त्यांत संशयाचे धुके, संघटनेच्या अस्तित्वाचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 17:38 IST

जयंत पाटील आणि शेट्टी यांच्यात दरी निर्माण झाली आहे. याचाच फायदा सदाभाऊ खोत उठविण्याचा प्रयत्न करत आहेत.

अशोक पाटील

इस्लामपूर : गत लोकसभा निवडणुकीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था निर्माण होऊ लागली आहे. सध्या रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनीही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी जवळीक साधली आहे. त्यामुळे खोत व शेट्टी यांच्या भूमिकेवर कार्यकर्त्यांमध्ये संशय निर्माण होऊ लागला आहे.

मागील लोकसभा निवडणूक हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राजू शेट्टी यांनी साखरसम्राटांचे नेते जयंत पाटील यांच्याशी समझौता करून लढविली होती. त्यानंतर महाआघाडीशी सलोख्याचे संबंध निर्माण केले होते. त्यामुळे विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या कोट्यातून एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी यांना आमदारकी मिळणार होती. परंतु, राज्यपालांनी यादीकडे शेवटपर्यंत टाळाटाळ केल्याने आमदारकी गळ्यात पडू शकली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या शेट्टी यांनी आपली भूमिका बदलत ऐन ऊस हंगामात एफआरपीच्या विषयावरून सरकारविरोधातच आघाडी उघडली. त्यातही त्यांना पूर्णत: यश मिळाले नाही.

सरकारने एफआरपीचे दोन तुकडे केल्याने शेट्टी तोंडघशी पडले. यावरही त्यांनी आपली भूमिका मवाळ केली. सध्या विजेच्या प्रश्नावर आक्रमक झाले आहेत. यामुळेच आता जयंत पाटील आणि शेट्टी यांच्यात दरी निर्माण झाली आहे. याचाच फायदा सदाभाऊ खोत उठविण्याचा प्रयत्न करत आहेत. इस्लामपूर येथील पालिकेच्या प्रशासकीय कार्यक्रमात जयंत पाटील व खोत एकत्र आल्याचे इस्लामपुरकरांनी पाहिले. दोघांनी परस्परांची वारेमाप स्तुती केली. गेल्या पाच वर्षांत सदाभाऊंनी स्वत:च्याच नेतृत्वाखालील पालिकेतील तत्कालीन सत्ताधारी विकास आघाडीच्या कामाचा जाहीर पंचनामा केला. जयंत पाटील यांच्या साक्षीने बोभाटे काढले. एकंदरीत, जयंत पाटील व सदाभाऊ यांची वाढती जवळीक आणि शेट्टी यांच्याशी दुरावा या दुटप्पी भूमिकेवर कार्यकर्त्यांत मात्र संशयाचे धुके निर्माण झाले आहे.

आमची जवळीक पूर्वीपासूनची

जयंत पाटील आणि माझी जवळीक पूर्वीपासून आहे. राजारामबापू पाटील यांच्या आशीर्वादासह आमचे घराणे यापूर्वी कार्यरत होते. मरळनाथपूर येथे दूध संस्था सुरू केली होती. जनता पक्षात गेल्यानंतर त्यांच्याच विचाराने आम्ही राजकीय वाटचाल केली होती. सध्या जयंत पाटील व आमची विचारधारा पूर्णत: वेगळी आहे. त्यामुळे जवळ आलो म्हणून बिघडले कोठे, त्यांच्याशी लगेच हातमिळवणी केली असा अर्थ काढू नये.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSadabhau Khotसदाभाउ खोत Jayant Patilजयंत पाटील