शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

Sangli: तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात अस्तित्वासाठी रक्तरंजित संघर्षाची वाट; नागरिकांच्या प्रश्नांना बगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 17:31 IST

दत्ता पाटील तासगाव : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीवरून आबा-काका गट एकमेकांना भिडले. दुसऱ्या दिवशी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न ...

दत्ता पाटीलतासगाव : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीवरून आबा-काका गट एकमेकांना भिडले. दुसऱ्या दिवशी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला. तूर्तास पडदा पडला असला, तरी खरे नाट्य विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात पाहायला मिळणार आहे. आबा, काका गटाच्या नेत्यांकडून अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी पुन्हा एकदा रक्तरंजित संघर्षाची वाटचाल सुरू झाल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळाले. जनतेच्या प्रश्नांना बेदखल करणाऱ्या नेतेमंडळींनी खुर्चीसाठी सुरू केलेला संघर्ष सामान्य जनतेच्या पचनी पडणारा नाही, तरीही येणाऱ्या काळात हा संघर्ष आणखी तीव्र केला जाईल, हे मात्र निश्चित.कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी यापूर्वीही अनेक वेळा सत्तानाट्य पाहायला मिळाले. मात्र यावेळी आबा, काका गटातील राजकीय संघर्ष मुद्द्यावरून गुद्यावर आला. राजकीय आखाड्यात शब्दांचा राडा नवा नाही. मात्र, शब्दावरून हातघाईवर येत आबा, काका गटाने पुन्हा राडा घातला. दुसऱ्याच दिवशी यु टर्न घेत दोन्ही गटांनी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही मारामारी येणाऱ्या काळातील रक्तरंजित राजकीय संघर्षाची नांदी ठरणार आहे.आबा-काका घराण्यातील नवी पिढी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आखाड्यात उतरण्याची तयारी करत आहे. दोन्ही घराण्यांच्या नव्या पिढीसाठी ही विधानसभा निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. त्यामुळे अंजनी, चिंचणीच्या दोन्ही घराण्यांनी ही लढाई आर या पारची केली आहे. मात्र, हे करत असताना जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देत, केवळ खुर्चीच्या अट्टाहासासाठी कार्यकर्ते आणि जनतेचा बळी देण्याचे काम या रक्तरंजित संघर्षातून होत आहे.

गुद्दे नकोत; मुद्दे हवेत

  • तासगाव तालुक्याला संघर्ष नवा नाही. तालुक्यातील जनतेने आबा-काका ऐक्य एक्सप्रेसही पाहिली. आर. आर. पाटील यांच्या पश्चात दोन्ही गटाच्या नेत्यांची अप्रत्यक्ष सेटलमेंटही पाहिली. दोन्ही गटांकडून संघर्षाचा ‘पुनश्च हरिओम’ केला आहे. मात्र मतदारसंघातील जनतेची गुद्दे नकोत मुद्दे हवेत, अशी भावना आहे.
  • तालुक्यातील खरीप वाया गेला आहे. द्राक्ष बागांची अवस्था त्याहीपेक्षा बिकट आहे. शेतकरी कोलमडलेला असताना, नेते जनतेच्या प्रश्नावर शासन दरबारी राडा करण्याऐवजी स्वतःच्या वर्चस्वासाठी गोंधळ घालताना दिसत आहेत. हीच गोष्ट जनतेच्या पचनी पडली नाही.
टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळRohit Patilरोहित पाटिलsanjaykaka patilसंजयकाका पाटील