शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात अस्तित्वासाठी रक्तरंजित संघर्षाची वाट; नागरिकांच्या प्रश्नांना बगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 17:31 IST

दत्ता पाटील तासगाव : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीवरून आबा-काका गट एकमेकांना भिडले. दुसऱ्या दिवशी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न ...

दत्ता पाटीलतासगाव : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीवरून आबा-काका गट एकमेकांना भिडले. दुसऱ्या दिवशी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला. तूर्तास पडदा पडला असला, तरी खरे नाट्य विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात पाहायला मिळणार आहे. आबा, काका गटाच्या नेत्यांकडून अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी पुन्हा एकदा रक्तरंजित संघर्षाची वाटचाल सुरू झाल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळाले. जनतेच्या प्रश्नांना बेदखल करणाऱ्या नेतेमंडळींनी खुर्चीसाठी सुरू केलेला संघर्ष सामान्य जनतेच्या पचनी पडणारा नाही, तरीही येणाऱ्या काळात हा संघर्ष आणखी तीव्र केला जाईल, हे मात्र निश्चित.कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी यापूर्वीही अनेक वेळा सत्तानाट्य पाहायला मिळाले. मात्र यावेळी आबा, काका गटातील राजकीय संघर्ष मुद्द्यावरून गुद्यावर आला. राजकीय आखाड्यात शब्दांचा राडा नवा नाही. मात्र, शब्दावरून हातघाईवर येत आबा, काका गटाने पुन्हा राडा घातला. दुसऱ्याच दिवशी यु टर्न घेत दोन्ही गटांनी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही मारामारी येणाऱ्या काळातील रक्तरंजित राजकीय संघर्षाची नांदी ठरणार आहे.आबा-काका घराण्यातील नवी पिढी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आखाड्यात उतरण्याची तयारी करत आहे. दोन्ही घराण्यांच्या नव्या पिढीसाठी ही विधानसभा निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. त्यामुळे अंजनी, चिंचणीच्या दोन्ही घराण्यांनी ही लढाई आर या पारची केली आहे. मात्र, हे करत असताना जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देत, केवळ खुर्चीच्या अट्टाहासासाठी कार्यकर्ते आणि जनतेचा बळी देण्याचे काम या रक्तरंजित संघर्षातून होत आहे.

गुद्दे नकोत; मुद्दे हवेत

  • तासगाव तालुक्याला संघर्ष नवा नाही. तालुक्यातील जनतेने आबा-काका ऐक्य एक्सप्रेसही पाहिली. आर. आर. पाटील यांच्या पश्चात दोन्ही गटाच्या नेत्यांची अप्रत्यक्ष सेटलमेंटही पाहिली. दोन्ही गटांकडून संघर्षाचा ‘पुनश्च हरिओम’ केला आहे. मात्र मतदारसंघातील जनतेची गुद्दे नकोत मुद्दे हवेत, अशी भावना आहे.
  • तालुक्यातील खरीप वाया गेला आहे. द्राक्ष बागांची अवस्था त्याहीपेक्षा बिकट आहे. शेतकरी कोलमडलेला असताना, नेते जनतेच्या प्रश्नावर शासन दरबारी राडा करण्याऐवजी स्वतःच्या वर्चस्वासाठी गोंधळ घालताना दिसत आहेत. हीच गोष्ट जनतेच्या पचनी पडली नाही.
टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळRohit Patilरोहित पाटिलsanjaykaka patilसंजयकाका पाटील