शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
3
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
4
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
5
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
6
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
7
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
8
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
9
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
10
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
11
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
12
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
13
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
14
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
15
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
16
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
17
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
18
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
19
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
20
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक

Sangli: तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात अस्तित्वासाठी रक्तरंजित संघर्षाची वाट; नागरिकांच्या प्रश्नांना बगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 17:31 IST

दत्ता पाटील तासगाव : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीवरून आबा-काका गट एकमेकांना भिडले. दुसऱ्या दिवशी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न ...

दत्ता पाटीलतासगाव : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीवरून आबा-काका गट एकमेकांना भिडले. दुसऱ्या दिवशी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला. तूर्तास पडदा पडला असला, तरी खरे नाट्य विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात पाहायला मिळणार आहे. आबा, काका गटाच्या नेत्यांकडून अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी पुन्हा एकदा रक्तरंजित संघर्षाची वाटचाल सुरू झाल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळाले. जनतेच्या प्रश्नांना बेदखल करणाऱ्या नेतेमंडळींनी खुर्चीसाठी सुरू केलेला संघर्ष सामान्य जनतेच्या पचनी पडणारा नाही, तरीही येणाऱ्या काळात हा संघर्ष आणखी तीव्र केला जाईल, हे मात्र निश्चित.कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी यापूर्वीही अनेक वेळा सत्तानाट्य पाहायला मिळाले. मात्र यावेळी आबा, काका गटातील राजकीय संघर्ष मुद्द्यावरून गुद्यावर आला. राजकीय आखाड्यात शब्दांचा राडा नवा नाही. मात्र, शब्दावरून हातघाईवर येत आबा, काका गटाने पुन्हा राडा घातला. दुसऱ्याच दिवशी यु टर्न घेत दोन्ही गटांनी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही मारामारी येणाऱ्या काळातील रक्तरंजित राजकीय संघर्षाची नांदी ठरणार आहे.आबा-काका घराण्यातील नवी पिढी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आखाड्यात उतरण्याची तयारी करत आहे. दोन्ही घराण्यांच्या नव्या पिढीसाठी ही विधानसभा निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. त्यामुळे अंजनी, चिंचणीच्या दोन्ही घराण्यांनी ही लढाई आर या पारची केली आहे. मात्र, हे करत असताना जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देत, केवळ खुर्चीच्या अट्टाहासासाठी कार्यकर्ते आणि जनतेचा बळी देण्याचे काम या रक्तरंजित संघर्षातून होत आहे.

गुद्दे नकोत; मुद्दे हवेत

  • तासगाव तालुक्याला संघर्ष नवा नाही. तालुक्यातील जनतेने आबा-काका ऐक्य एक्सप्रेसही पाहिली. आर. आर. पाटील यांच्या पश्चात दोन्ही गटाच्या नेत्यांची अप्रत्यक्ष सेटलमेंटही पाहिली. दोन्ही गटांकडून संघर्षाचा ‘पुनश्च हरिओम’ केला आहे. मात्र मतदारसंघातील जनतेची गुद्दे नकोत मुद्दे हवेत, अशी भावना आहे.
  • तालुक्यातील खरीप वाया गेला आहे. द्राक्ष बागांची अवस्था त्याहीपेक्षा बिकट आहे. शेतकरी कोलमडलेला असताना, नेते जनतेच्या प्रश्नावर शासन दरबारी राडा करण्याऐवजी स्वतःच्या वर्चस्वासाठी गोंधळ घालताना दिसत आहेत. हीच गोष्ट जनतेच्या पचनी पडली नाही.
टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळRohit Patilरोहित पाटिलsanjaykaka patilसंजयकाका पाटील