शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

‘शक्तिपीठ’विरोधात मुख्यमंत्र्यांची भूमिका संभ्रम निर्माण करणारी - उमेश देशमुख 

By अशोक डोंबाळे | Updated: September 16, 2024 16:35 IST

सांगलीचे शेतकरी मुख्यमंत्र्यांना त्यांची जागा दाखवतील

सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शक्तिपीठ महामार्गाला विरोध फक्त नांदेड आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा आहे. त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांशी चर्चा करून रेखांकन बदलण्यात येईल, असे वक्तव्य केले आहे. त्यांचे हे विधान अत्यंत चुकीचे असून, शक्तिपीठ महामार्गाला राज्यातील सर्वच जिल्ह्यांतून विरोध आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगलीचे शेतकरी त्यांची जागा दाखवतील, असा इशारा शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचे उमेश देशमुख यांनी दिला आहे.शक्तिपीठ महामार्ग बचाव कृती समितीचे उमेश देशमुख म्हणाले, राज्यातील सर्व जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांनी महामार्ग रद्द करण्यात यावा, हीच मागणी घेऊन आंदोलन केले आहे. शक्तिपीठ महामार्गाचे भूमी अधिग्रहण थांबवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्यामुळे आंदोलन स्थगित केले होते; पण शेतकऱ्यांच्या बैठका चालूच आहेत. सांगली जिल्ह्यातील १९ गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सांगलवाडी येथे मेळावा घेऊन आंदोलनाची सुरुवात केली. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन जिल्हाधिकारी कचेरीसमोर तीव्र निदर्शने केली. धरणे आंदोलन केले.कोल्हापूर येथे झालेल्या मोर्चात सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. तुळजापूर येथे झालेल्या साखळी उपोषणात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग होता. तरीसुद्धा येथील शेतकऱ्यांचा विरोध त्यांना दिसत नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उलट-सुलट विधाने करीत असतील तर बाधित शेतकरी त्यांना त्यांची जागा नक्की दाखवतील, असा इशाराही त्यांनी दिला.यावेळी सतीश साखळकर, प्रभाकर तोडकर, उमेश एडके, प्रवीण पाटील, यशवंत हारूगडे, सुधाकर पाटील, सुनील पवार, ॲड. प्रदीप पोळ, विष्णू पाटील आदी उपस्थित होते.

आंदोलनाची ठिणगी सांगलीतूनचशक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलनाची ठिणगी सांगलीतूनच पडली होती. या आंदोलनाची किंमत महायुती सरकारला लोकसभा निवडणुकीत भोगावी लागली होती. तरीही मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, केवळ नांदेड आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचाच विरोध आहे. अन्य जिल्ह्यांत विरोध नाही, त्यांचे हे विधान चुकीचे आहे. पुन्हा राज्यभर शक्तिपीठ मार्गाविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही उमेश देशमुख यांनी दिला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीFarmerशेतकरी