शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

हवामान बदलाचा द्राक्ष बागांना फटका, उत्पादन घटणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 12:40 IST

द्राक्ष बागांच्या उशिरा छाटण्या : रोगांचा प्रादुर्भाव वाढला

जालिंदर शिंदेघाटनांद्रे : नगदी पीक व पोषक वातावरण म्हणून कवठेमहांकाळ तालुक्यातील बळीराजाने इतर पिकांना फाटा देत द्राक्ष शेतीला मोठी पसंती दिली. त्यामुळे कवठेमहांकाळ तालुक्यात द्राक्ष लागवड क्षेत्रही वाढले आहे. परंतु कधी अवकाळी,कधी दुष्काळ,कधी रोगांचा प्रादुर्भाव तर कधी पडता बाजारभाव यांचा फटका सहन करावा लागत आहे.चालू वर्षी तर लांबलेल्या पावसाने कवठेमहांकाळ तालुक्यात द्राक्ष बागांच्या उशिरा छाटण्या घेतल्यामुळे सध्या द्राक्षबागा या काही ठिकाणी फाऊरिंग स्टेजला तर काही ठिकाणी फळधारणा अवस्थेत आहेत. परंतु सध्या दिवसभर कडाक्याचे ऊन,रात्री कडाक्याची थंडी तर पहाटे धुके यामुळे द्राक्ष बागांना डाऊनी,भुरी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे बळीराजाला औषध फवारणी यंत्रासह बागेत थांबावे लागत आहे.काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाने द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अगाप छाटणी घेतलेल्या बागांत फळकुज झाली आहे. त्यामुळे त्यापासून द्राक्ष बागा वाचविण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. चालूवर्षी मार्च,एप्रिल मध्ये खरड छाटणीच्या वेळी पाणी कमी पडल्याने व मे महिन्यात ऊन ऐवजी अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्ष बागेसाठी लागणारे पाणी व ऊन समप्रमाणात न मिळाल्याने चालू वर्षी फळधारणा ही चांगली झाली नाही. त्याचाही फटका द्राक्ष उत्पादनास बसणार आहे.चालूवर्षी द्राक्ष बागेत कमी प्रमाणात द्राक्ष घड असल्याने आपसूकच द्राक्ष उत्पादनही घटणार आहे. त्याचा फटका द्राक्ष उत्पादनास व बेदाणा निर्मितीस ही होणार आहे. त्याची झळ आपसुकच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.

आगाप छाटणी घेतलेली माझ्या द्राक्ष बागेस परतीच्या पावसाचा मोठा फटाका बसला असून फळकुज जादा झाल्याने त्याचा परिणाम द्राक्ष उत्पादनावर झाला आहे. त्याचा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. -प्रशांत शिंदे, द्राक्ष बागायतदार, घाटनांद्रे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीweatherहवामान