शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

स्वच्छता ठेक्यात गुंतले पदाधिकाऱ्यांचेच हात ! तासगाव नगरसेवकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 22:43 IST

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव शहराच्या स्वच्छतेचा ठेका कायम ठेवण्यात पदाधिकाºयांचे हात गुंतले असल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे. सत्ताधारी भाजप च्या पक्षीय बैठकीत नगरसेवक जाफर मुजावर यांनीच असा आरोप केल्याने या चर्चेला उधाण आले आहे.गुरुवारी झालेल्या सभेत भाजप आणि राष्टवादी कडून या ठेक्याच्या विषयाला बगल देत, ठेका कायम ठेवण्यासाठी ...

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव शहराच्या स्वच्छतेचा ठेका कायम ठेवण्यात पदाधिकाºयांचे हात गुंतले असल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे. सत्ताधारी भाजपच्या पक्षीय बैठकीत नगरसेवक जाफर मुजावर यांनीच असा आरोप केल्याने या चर्चेला उधाण आले आहे.

गुरुवारी झालेल्या सभेत भाजप आणि राष्टवादीकडून या ठेक्याच्या विषयाला बगल देत, ठेका कायम ठेवण्यासाठी एकमत केल्याचे चित्रही पाहायला मिळाले असून ठेक्याला मिळालेल्या अभयाचे गौडबंगाल काय? असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तासगाव नगरपालिकेने कोट्यवधी रुपयांचा स्वच्छतेचा ठेका शहरातीलच राष्टÑवादीच्या पदाधिकाºयाला दिला. हा ठेका देताना बहुतांश नियमांची पायमल्ली करण्यात आली. इतके करूनदेखील शहरात स्वच्छतेचा बोजवारा कायम आहे. काही महिन्यांपासून भाजप आणि राष्टÑवादीच्या बहुतांश नगरसेवकांनी या ठेक्याविरोधात आवाज उठवला. त्यावेळी नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत यांनी स्वच्छ भारत अभियान संपल्यानंतर होणाºया सभेत हा विषय अजेंड्यावर घेण्याचे आश्वासन देऊन विषय लांबणीवर टाकला होता.

नगराध्यक्षांच्या आश्वासनानुसार गुरुवारच्या सभेत हा विषय अजेंड्यावर येईल, अशी अपेक्षा होती. मात्र हा विषय अजेंड्यावर नसल्याने भाजपच्याच काही नगरसेवकांनी मोठा रोष व्यक्त केला होता. ठेका रद्द करण्याचा विषय अजेंड्यावर घेण्याची मागणी करूनदेखील विषय ऐरणीवर येत नसल्याने नगरसेवक जाफर मुजावर यांनी पक्षीय बैठकीत, यामागे ठेकेदाराशी लागेबांधे आहेत काय? असा गंभीर आरोप केला होता.

गुरुवारी झालेल्या सभेत स्वच्छता आणि ठेका या विषयावर पदाधिकाऱ्यांसह कोणत्याच नगरसेवकाने चर्चा केली नाही. त्यामुळे ठेक्याला मिळणारे अभय आणि ठेकेदाराची पाठराखण चांगलीच चर्चेत आली आहे.ठेकेदार हा राष्टवादीचा पदाधिकारी असल्याने राष्टवादीकडून होणारी पाठराखण राजकीय असू शकते. मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून ठेकेदाराची पाठराखण का केली जात आहे? हा प्रश्न कायम असून, पदाधिकाऱ्यांच्या सोयीमुळे शहरातील नागरिकांना मात्र स्वच्छतेबाबत गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.जॅकवेलचाही ठेकापाणी पुरवठ्याचे जॅकवेल ठेका पध्दतीने चालविण्यास देण्याचा ठरावही सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. राष्टÑवादीने या ठरावाला विरोध केला. त्यानंतर ठराव मताला टाकून बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर झाला. यावेळी घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाकडून मंजूर झालेला ३ कोटी ५४ लाखांचा निधी खर्च करण्याचा विषयही मंजूर करण्यात आला.

टॅग्स :SangliसांगलीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान