शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

वाळवा-शिराळ्यामध्ये दावे-प्रतिदाव्यांना ऊत-- : लोकसभा निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:21 AM

हातकणंगले लोकसभा मतदार संघात महाआघाडीतील ‘स्वाभिमानी’चे उमेदवार राजू शेट्टी यांच्याविरोधात शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्या उमेदवारीने रंगत वाढली होती. आता या दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू झाले

ठळक मुद्देकार्यकर्त्यांत चर्चा; मताधिक्याबद्दल संभ्रमावस्था

- अशोक पाटील ।इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदार संघात महाआघाडीतील ‘स्वाभिमानी’चे उमेदवार राजू शेट्टी यांच्याविरोधात शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्या उमेदवारीने रंगत वाढली होती. आता या दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.

वाळवा-शिराळ्यात स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचे प्रमुख कार्यकर्ते असलेल्या सयाजी मोरे, भागवत जाधव यांनी, शेट्टी किमान लाखाहून अधिक मतांनी विजयी होतील, असा दावा केला आहे. दुसरीकडे महायुतीच्या बाजूने दावा करताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दोघांचा दावा खोडून काढत, धैर्यशील माने किमान ७५ हजार मतांनी विजयी होतील, असे सांगितले.

खोत यांच्याकडे मंत्रीपद असले तरी, त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा अभाव आहे. त्यांनी शिवसेनेचे आनंदराव पवार आणि भाजपचे विक्रम पाटील यांची मदत घेतली आहे. भाजपमध्ये दुफळी असून विक्रम पाटील व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यात मतभिन्नता आहे. मात्र त्या दोघांंनीही माने हेच विजयी होतील, असे सांगितले आहे. शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी जरी माने यांच्या विजयाचा दावा केला असला तरी, त्यामध्ये ठोसपणा दिसून येत नाही. महाडिक व हुतात्मा गटाचीही भूमिका तशीच आहे. त्यांच्यातील काही कार्यकर्ते आणि एकाच घरातील दोन नेते शेट्टी आणि माने या दोघांच्याही विजयाचा दावा करत आहेत.

ज्यांनी खासदार शेट्टींच्या फंडातून स्वत:च्या मिलसमोरील रस्ता करुन घेतला, त्या पवार बंधूंची भूमिका मात्र गुलदस्त्यात आहे. हे काँग्रेसचे पाईक म्हणवून घेत असले तरी, शेट्टींच्या प्रचारात ते कोठेही दिसले नाहीत.वाळवा-शिराळ्यात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यात आ. जयंत पाटील हे राजू शेट्टी यांना चांगले मताधिक्य मिळवून देतील, असा विश्वास पहिल्यापासूनच व्यक्त होत होता. परंतु मतदानानंतर मात्र या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, ५०:५० टक्के मतदान होईल, असे राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते बोलू लागले आहेत.पैजा लागल्या : चर्चा रंगलीआमदार जयंत पाटील यांना विधानसभेचे वेध लागले असून त्यांनी जनसंपर्क वाढवला आहे, तर खासदार राजू शेट्टी हे मतदार संघात भेटीगाठी घेऊन आभार मानत आहेत. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना यांच्यातील लोकसभा निवडणुकीच्या संघर्षाचा निकाल काय लागणार, याची गोळाबेरीज करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या रकमेच्या पैजा लागल्या आहेत. त्यामुळे शेट्टी की माने, यापैकी कोण निवडून येणार, याची चर्चा रंगली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकSangliसांगलीPoliticsराजकारण