शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

फेरतपासणीत ९२ टक्के विद्यार्थ्यांच्या गुणांत बदल, शिवाजी विद्यापीठाबद्दल असंतोष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 12:50 IST

राज्यपालांसह, विद्यापीठ अनुदान आयोगाकडे तक्रार

सांगली : गत वर्षात उन्हाळी आणि हिवाळी सत्रात विविध परीक्षा पार पडल्या. यातील ३८ अभ्यासक्रमांच्या एकूण १५ हजार ७९७ विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणांच्या फेरतपासणीकरिता शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ९२ टक्के म्हणजेच १४ हजार ६२६ विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीच्या कारभाराबाबत रिपब्लिकन स्टुडंटस् युनियनने राज्यपाल तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.युनियनचे प्रमुख अमोल वेटम यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, फेरतपासणीत एकूण अर्जाच्या ९२ टक्के विद्यार्थ्यांच्या गुणात बदल (कमी अथवा ज्यादा) होत असेल तर उत्तरपत्रिकेच्या तपासणीच्या पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेतील शिक्षकांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. शासन निर्णय २०१८नुसार सीएचबी (तासिका तत्त्वावरील) शिक्षकांना पेपर तपासणी व यासंबंधित कोणतीही कामे देता येणार नाही, असा स्पष्ट आदेश असताना प्रत्यक्षात याच शिक्षकांना पेपर तपासणी, फेरतपासणीबाबत कामे दिली जातात. हे पेपर तपासणी तसेच शिक्षकांच्या नियुक्तीबाबतची माहिती ‘माहिती अधिकार कायद्याखाली’ जाणीवपूर्वक देण्यात येत नाही.पहिल्या परीक्षकाने उत्तरपत्रिका तपासल्यानंतर पुन्हा दुसऱ्या परीक्षकाकडून तपासणी होते. या दोन्ही परीक्षकांमधील गुणदानात फरक असतो. जर फेरतपासणीत मार्क्स वाढले तर याचा फायदा विद्यार्थ्यांना दिला जातो. मात्र, मार्क्स कमी झाले तर विद्यार्थ्यांचे नुकसान केले जाते. हा अन्याय आहे. विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी झाले असल्यास फेरतपासणीच्या आधी दिलेले गुण ग्राह्य धरून त्याचा फायदा देण्याची गरज आहे. काही प्रकरणांत एक-दोन गुणांमुळे विद्यार्थ्यांना नापास केले आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

विद्यार्थ्यांना कोट्यवधीचा भुर्दंडकोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील २६ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी स्वत:च्या उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीची परीक्षा मंडळाकडे मागणी केली होती.फोटोकॉपीकरिता १५० रुपये, तर फेरतपासणीसाठी ५०० रुपये प्रति पेपर आकारणी केली जाते. यातून जवळपास पावणेदोन कोटी रुपयांचा भुर्दंड विद्यार्थ्यांना सोसावा लागला.

न्यायालयीन आदेशाचा भंगसर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्यानुसार सर्व विषयांची फोटोकॉपी माहिती अधिकार कायद्याखाली २ रुपये प्रति पान यानुसार मागविता येते. तरीही विद्यापीठद्वारे एवढी फी आकारणी का केली जात आहे. विद्यापीठाच्या परीक्षा फीपेक्षाही जास्त खर्च फोटोकॉपी आणि फेरतपासणीसाठी होत आहे. यातून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली जात आहे, अशी टीका वेटम यांनी केली आहे.

कारभाराच्या चौकशीची मागणीउत्तरपत्रिका तपासणीतील दोषप्रकरणाची सखोल चौकशी व कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे वेटम व सुनील क्यातन यांनी राज्यपाल, मुख्य सचिव, मुख्यमंत्री, यूजीसी, बीसीआय यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठexamपरीक्षा