शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

चांदोली मत्सबीज प्रकल्प प्रशासनाकडून दुर्लक्षितच; सांगली, सातारा, कोल्हापूरला पुरेल इतके मत्स्यबीज निर्मितीची क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 18:46 IST

विकास शहा शिराळा : तालुक्याचे वैभव असणाऱ्या चांदोली धरणाच्या पायथ्याला सुमारे पाच कोटी रुपये खर्चून बांधलेला मत्स्यबीज प्रकल्प गेली ...

विकास शहाशिराळा : तालुक्याचे वैभव असणाऱ्या चांदोली धरणाच्या पायथ्याला सुमारे पाच कोटी रुपये खर्चून बांधलेला मत्स्यबीज प्रकल्प गेली दोन-तीन वर्षे झाली वापराविना पडून आहे. यामध्ये एकाही माशाचे बीजोत्पादन झालेले नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. चांदोली धरण, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या प्रमुख पर्यटन स्थळांबरोबरच चांदोलीचा मत्स्यबीज प्रकल्प पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. याकडे मत्स्य विभाग, जिल्हा प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जात आहे.माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी तत्कालीन मंत्री रामराजे निंबाळकर यांच्यामार्फत हा दहा एकरमधील तीन जिल्ह्यांना फायदेशीर ठरणारा प्रकल्प मंजूर केला. जिल्हा वार्षिक नियोजन योजनेंतर्गत सुचवलेल्या या प्रकल्पाची उभारणी पूर्ण झाली आहे. यातून चांदोलीच्या पर्यटनाला गती मिळणार असून, चांदोलीच्या वैभवात आणखीनच भर पडणार आहे. शिवाय स्थानिकांना रोजगार मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

प्रकल्पाची उभारणी करताना मत्स्यबीज प्रकल्पातील तळ्याच्या बांधकामाचा भराव ठिकठिकाणी वाहून गेला होता. भरावाला भेगादेखील पडल्या होत्या. सांगलीच्या सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी प्रस्थापित केलेल्या ४ कोटी ८८ लाख ८६ हजार खर्च करून बांधला आहे.या मत्सबीज प्रकल्पात ८०० चौरस मीटरची तेरा तळी बांधली आहेत. प्रत्येक तळ्यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे. सूर्यकिरणांमुळे मत्सबीज नष्ट होऊ नये म्हणून कलर कोटेड शेड उभारली जाणार आहेत. उपकरणे व इतर साहित्यासाठी स्वतंत्र इमारत उभी केली जाणार आहे.या प्रकल्पांतर्गत मत्स्यबीजाची पैदास करणे, त्यांचे पालनपोषण करणे तसेच मोठ्या माशांची निर्मिती करून त्यांची देखभाल करणे, मत्स्य पिलांची साठवण करणे असे नियोजन या प्रकल्पात केले जाणार आहे. धरणाच्या पायथ्याला हा प्रकल्प उभारण्यात येत असल्यामुळे चांदोली धरणातील पाण्याचा वापर करून मत्स्य बिजापासून मोठ्या माशांचे उत्पादन घेणे शक्य होणार आहे. नदीतील येणारे पाणी तळ्यांमध्ये साठवण्यासाठी फिल्टर चेंबर बांधण्यात येणार आहेत. तळ्यातील पाण्याचा निचरा होण्यासाठी तसेच सांडपाणी व्यवस्था मोरी बांधकाम करण्यात येणार आहे.जवळच असणाऱ्या वारणा कालव्यातील पाणी सायफन पद्धतीने तलावात सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीनंतर स्थानिकांना रोजगार मिळणार आहे.अधिकाऱ्यांची उदासिनता तीन जिह्यांसाठी उपयोगी ठरणारा तसेच स्थानिकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प मंजूर केला. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच या विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार लेखी, तोंडी सांगितले आहे. मात्र, हा प्रकल्प सुरू करण्याबाबत उदासिनता दिसून येते.

पर्यटन, रोजगार वाढेल तसेच येथील मत्स्य व्यावसायिकांना उपयोग होईल, यासाठी हा प्रकल्प सुरू होणे आवश्यक आहे. - शिवाजीराव नाईक माजी राज्यमंत्री

टॅग्स :SangliसांगलीDamधरण