शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

Chandoli Dam: चांदोली धरणात गतवर्षीपेक्षा दीड टीएमसी पाणीसाठा कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 18:31 IST

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही साहजिकच वाढत आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत सध्या धरणात दीड टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

गंगाराम पाटील

वारणावती : उन्हाळी आवर्तन सुरू असल्याने चांदोली धरणातून वाकुर्डे व म्हैसाळ योजनेसाठी सध्या पाणी सोडले जात आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही साहजिकच वाढत आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत सध्या धरणात दीड टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

सांगली, कोल्हापूर, सातारा व रत्नागिरी या चार जिल्ह्यांतील पाणलोट क्षेत्रातून पावसाळ्यात धरणात पाणी येते. राज्यातील मातीचे दोन नंबरचे धरण असून ३४.४० टीएमसी पाणीसाठवण होते. चांदोली धरणात सध्या १८.५१ टीएमसी पाणीसाठा असून यातील उपयुक्त पाणीसाठा ११.६३ टीएमसी इतका आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा १.५० टीएमसीने कमी आहे. गतवर्षी आजच्या तारखेचा उपयुक्त पाणीसाठा १२.७२ टीएमसी इतका होता.

गेल्या तीन महिन्यांतील पाण्याचा वापर लक्षात घेता १६ जानेवारी ते आजअखेर तीन महिन्यांत ११ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. म्हणजे प्रत्येक महिन्याला साधारण सरासरी पावणेचार टीएमसी पाणी वापरले गेले आहे. १६ मार्चला धरणात उपयुक्त पाणीसाठा १६.५७ टीएमसी होता. तर आज एका महिन्यानंतर धरणातील उपयुक्त पाणीसाठा ११.६३ टीएमसी आहे. म्हणजेच गेल्या महिनाभरात ४.९४ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे.

सध्या धरणातून वाकुर्डे व म्हैसाळ योजनेसाठी पाणी सोडले जात आहे. त्यामुळे सध्या महिन्याला ५ टीएमसी वापर होताना आता किमान अर्धा ते एक टीएमसी पाणी जास्त सोडावे लागणार आहे. म्हणजेच महिन्याला किमान सहा टीएमसी पाणी लागणार आहे.

परिणामी, पुढील दोन महिन्यात म्हणजेच १६ जूनपर्यंत धरणातून किमान १२ ते १३ टीएमसी पाणी संपणार आहे. म्हणजेच थोडक्यात सध्याच्या वापराप्रमाणे पाणी वापर राहिला, तर १६ जून रोजी धरणातील उपयुक्त पाणीसाठी संपणार आहे.

सध्या धरणात पाण्याची पातळी ६०८.३० मीटर असून पाणीसाठा १८.५१ टीएमसी (५३.८० टक्के) उपयुक्त पाणीसाठा ११.६३ टीएमसी (४२.२६ टक्के) इतका असून १२१८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

गेल्या तीन महिन्यांतील पाणी वापर

१६ जानेवारी ते १६ फेब्रुवारी २.५६ टी.एम.सी.

१६ फेब्रुवारी ते १६ मार्च - ३.४८ टी.एम.सी.

१६ मार्च ते १६ एप्रिल - ४.९४ टी.एम.सी.

१६ जानेवारी ते आजअखेर तीन महिन्यांत एकूण १०.९८ टी.एम.सी. पाणी वापर

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणी