शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Chandoli Dam: चांदोली धरणात गतवर्षीपेक्षा दीड टीएमसी पाणीसाठा कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 18:31 IST

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही साहजिकच वाढत आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत सध्या धरणात दीड टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

गंगाराम पाटील

वारणावती : उन्हाळी आवर्तन सुरू असल्याने चांदोली धरणातून वाकुर्डे व म्हैसाळ योजनेसाठी सध्या पाणी सोडले जात आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही साहजिकच वाढत आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत सध्या धरणात दीड टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

सांगली, कोल्हापूर, सातारा व रत्नागिरी या चार जिल्ह्यांतील पाणलोट क्षेत्रातून पावसाळ्यात धरणात पाणी येते. राज्यातील मातीचे दोन नंबरचे धरण असून ३४.४० टीएमसी पाणीसाठवण होते. चांदोली धरणात सध्या १८.५१ टीएमसी पाणीसाठा असून यातील उपयुक्त पाणीसाठा ११.६३ टीएमसी इतका आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा १.५० टीएमसीने कमी आहे. गतवर्षी आजच्या तारखेचा उपयुक्त पाणीसाठा १२.७२ टीएमसी इतका होता.

गेल्या तीन महिन्यांतील पाण्याचा वापर लक्षात घेता १६ जानेवारी ते आजअखेर तीन महिन्यांत ११ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. म्हणजे प्रत्येक महिन्याला साधारण सरासरी पावणेचार टीएमसी पाणी वापरले गेले आहे. १६ मार्चला धरणात उपयुक्त पाणीसाठा १६.५७ टीएमसी होता. तर आज एका महिन्यानंतर धरणातील उपयुक्त पाणीसाठा ११.६३ टीएमसी आहे. म्हणजेच गेल्या महिनाभरात ४.९४ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे.

सध्या धरणातून वाकुर्डे व म्हैसाळ योजनेसाठी पाणी सोडले जात आहे. त्यामुळे सध्या महिन्याला ५ टीएमसी वापर होताना आता किमान अर्धा ते एक टीएमसी पाणी जास्त सोडावे लागणार आहे. म्हणजेच महिन्याला किमान सहा टीएमसी पाणी लागणार आहे.

परिणामी, पुढील दोन महिन्यात म्हणजेच १६ जूनपर्यंत धरणातून किमान १२ ते १३ टीएमसी पाणी संपणार आहे. म्हणजेच थोडक्यात सध्याच्या वापराप्रमाणे पाणी वापर राहिला, तर १६ जून रोजी धरणातील उपयुक्त पाणीसाठी संपणार आहे.

सध्या धरणात पाण्याची पातळी ६०८.३० मीटर असून पाणीसाठा १८.५१ टीएमसी (५३.८० टक्के) उपयुक्त पाणीसाठा ११.६३ टीएमसी (४२.२६ टक्के) इतका असून १२१८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

गेल्या तीन महिन्यांतील पाणी वापर

१६ जानेवारी ते १६ फेब्रुवारी २.५६ टी.एम.सी.

१६ फेब्रुवारी ते १६ मार्च - ३.४८ टी.एम.सी.

१६ मार्च ते १६ एप्रिल - ४.९४ टी.एम.सी.

१६ जानेवारी ते आजअखेर तीन महिन्यांत एकूण १०.९८ टी.एम.सी. पाणी वापर

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणी