शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुर-मुंबई 'वंदे भारत एक्स्प्रेस' सुरू होणार, प्रवाशांचा वेळ वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 15:57 IST

मिरज, सांगलीतील प्रवाशांचीही सोय होणार

मिरज : मुंबई ते कोल्हापूर या दोन शहरांदरम्यान राज्यातील पाचवी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत ही वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मध्य रेल्वेची तयारी सुरू आहे.छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई ते कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस दरम्यान ५१८ किलाेमीटर अंतर जलद पार करण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. ही वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते कोल्हापूर दरम्यान दादर, ठाणे, कल्याण, पुणे, सातारा व मिरज जंक्शन स्थानकात थांबेल. सध्या मुंबई व कोल्हापूर दरम्यान महालक्ष्मी व कोयना एक्स्प्रेस या दोन गाड्यांना हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ११ ते १२ तास लागतात. मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारतला केवळ सात तास लागणार असल्याने या दोन शहरात प्रवासाचा वेळ ४ ते ५ तासांनी कमी होणार आहे. पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम यावर्षी वेळेत पूर्ण झाले नसल्याने पुढील वर्षी मार्चपर्यत पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुहेरीकरण पूर्ण होईपर्यंत या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यास अडचण असल्याने ही एक्स्प्रेस अद्याप सुरू झालेली नाही. मात्र, आता दोन महिन्यांत वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची रेल्वेची तयारी सुरू आहे. यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. या एक्स्प्रेसमुळे मिरज, सांगलीतील प्रवाशांचीही सोय होणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसrailwayरेल्वे