शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

जातीवरून हिणवणे ही हिंसाच- नागराज मंजुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 4:30 AM

आपण सर्व जात संपवण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु ती संपत नाही. जातीवरून हिणवणे ही हिंसाच आहे.

वाटेगाव (जि.सांगली) : आपण सर्व जात संपवण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु ती संपत नाही. जातीवरून हिणवणे ही हिंसाच आहे. देशात जोपर्यंत जातिवाद संपत नाही, तोपर्यंत अण्णाभाऊ साठेंना अभिप्रेत असलेला समाज निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सोमवारी केले.वाटेगाव (ता. वाळवा) येथे सत्यशोधक साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भरवलेल्या ३१ व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ. विठ्ठल वाघ, नागराज मंजुळे, डॉ. बाबूराव गुरव, प्रा. चंद्रकुमार नलगे, डॉ. माया पंडित-नारकर, दिग्दर्शक विवेक वाघ, कार्याध्यक्ष रवींद्र बर्डे, स्वागताध्यक्ष मच्छिंद्र सकटे, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ. विजय चोरमारे यांच्याहस्ते झाले. नागराज मंजुळे म्हणाले, शहरांपासून दूर वाटेगावसारख्या गावात साहित्य संमेलन भरवले जाते, हे फार महत्त्वाचे आहे. अशी साहित्य संमेलने गावागावात व्हावीत. इंटरनेट, मोबाईलच्या जमान्यात वाचन बंद झाले आहे. यामुळे वाचन संस्कृतीस या संमेलनातून बळ मिळेल.कविता हाच मला नेहमी माज्या दु:खावरचा रामबाण उपाय वाटला आहे. तिच्यामुळेच एक आउटलेट मिळतो आणि म्हणून जगण्या मरण्याला कवितेशिवाय अन्य पर्याय नसतो, असं मला वाटतं.जातीवरून हिणवणे ही हिंसाच आहे. देशात जोपर्यंत जातिवाद संपत नाही, कवी विठ्ठल वाघ म्हणाले की, मी शाहू, फुले, आंबेडकर व अण्णा भाऊ यांचे लेकरू आहे. माझी वाणी अण्णा भाऊंची आहे. ते जाती, धर्माच्या पलीकडचा माणूस होते.माया पंडित म्हणाल्या , धर्माच्या नावाखाली हिंचाचार करणाऱ्या लोकांशी आपली बांधिलकी नसून, ती अण्णा भाऊंच्या साहित्याशी व विचारांशी आहे.

टॅग्स :Nagraj Manjuleनागराज मंजुळे