शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठ महामार्गातून नृसिंहवाडी, आदमापूर, पन्हाळा, सांगलीसाठी उपमार्ग

By संतोष भिसे | Updated: February 24, 2024 18:21 IST

भूसंपादनामुळे शेतकऱ्यांत अस्वस्थता

संतोष भिसेसांगली : नागपूर ते गोवा या महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीच्या शक्तिपीठ महामार्गाद्वारे अनेक धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. यामध्ये नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील दत्त देवस्थानाचाही समावेश आहे. त्याच्यासाठी मुख्य महामार्गातून उपमार्ग काढण्यात येणार आहे. महामार्गाच्या अंतिम आराखड्याला शासनाने मान्यता दिल्यानंतर त्याचे रेखांकन जाहीर झाले आहे.पवनार (जि. वर्धा) येथून सुरू होणाऱ्या या महामार्गाद्वारे माहूरगड, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, सोलापुरातील सिद्धरामेश्वर, तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूरची अंबाबाई, पत्रादेवी ही देवस्थाने प्रामुख्याने जोडली जाणार आहेत. अर्थात, ती महामार्गावरच असल्याने स्वतंत्र उपमार्गांची आवश्यकता नाही. नृसिंहवाडीचे दत्त देवस्थान, आदमापूरचे संत बाळूमामा देवस्थान, ऐतिहासिक पन्हाळा यांच्यासाठी मात्र उपमार्ग काढले जाणार आहेत. सांगली, गारगोटी, पट्टणकोडोली, कोल्हापूर बायपास यांच्यासाठीही उपमार्गांचे नियोजन आहे.

हा महामार्ग राज्यातील १२ जिल्ह्यांतून जाणार आहे. तेथील धार्मिक स्थळांना जोडण्यासाठी या उपमार्गांची आखणी करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात या महामार्गाची लांबी ५७ किलोमीटर, तर कोल्हापूर जिल्ह्यात १२३ किलोमीटर असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३९ किलोमीटर असणार आहे. सांगलीनजीकच्या कर्नाळ, पद्माळे, बुधगाव, कवलापूर, सांगलीवाडी या गावांमधून महामार्ग जाईल. तेथून सांगली शहरासाठी उपमार्ग निघेल.सांगली जिल्ह्यात बाणुरगड (ता. खानापूर) येथे तो प्रवेश करेल. तेथून तिसंगी (ता. कवठेमहांकाळ), डोंगरसोनी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, मणेराजुरी, मतकुणकी(ता. तासगाव) असा प्रवेश करेल. मतकुणकीमधून मिरज तालुक्यात प्रवेश करेल. कवलापूर, बुधगाव, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी असा जाईल. यातील काही गावांत महामार्गासाठी चिन्हांकनाची कामे सुरू झाली आहेत.

२०२७ चे उद्दिष्टहा महामार्ग २०२७ मध्ये पूर्ण करण्याचे महामार्ग विकास महामंडळाचे उद्दिष्ट आहे. सहा पदरी महामार्गावर अनेक ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग, रेल्वे उड्डाणपूल आदींचा समावेश आहे. ठिकठिकाणी पथकर नाकेदेखील असतील. सुमारे ८०५ किलोमीटर लांबीचा हा महामार्गा समृद्धीपेक्षाही लांब अंतराचा आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा असेल.

भूसंपादनामुळे शेतकऱ्यांत अस्वस्थतामहामार्गाच्या प्रस्तावित आराखड्यानुसार सांगली जिल्ह्यातील बहुतांश बागायती क्षेत्रातून तो जाणार आहे. शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षांच्या कष्टाने फुलविलेल्या बागायती महामार्गासाठी घेतल्या जाणार आहेत. मात्र, भूसंपादनाच्या भरपाईविषयी अनिश्चितता असल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता आहे. नव्या कायदेशीर तरतुदीनुसार मूल्यांकनाचे दर शासनाने कमी केले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसे पैसे मिळण्याची चिन्हे नाहीत.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरhighwayमहामार्ग