शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

शक्तिपीठ महामार्गातून नृसिंहवाडी, आदमापूर, पन्हाळा, सांगलीसाठी उपमार्ग

By संतोष भिसे | Updated: February 24, 2024 18:21 IST

भूसंपादनामुळे शेतकऱ्यांत अस्वस्थता

संतोष भिसेसांगली : नागपूर ते गोवा या महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीच्या शक्तिपीठ महामार्गाद्वारे अनेक धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. यामध्ये नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील दत्त देवस्थानाचाही समावेश आहे. त्याच्यासाठी मुख्य महामार्गातून उपमार्ग काढण्यात येणार आहे. महामार्गाच्या अंतिम आराखड्याला शासनाने मान्यता दिल्यानंतर त्याचे रेखांकन जाहीर झाले आहे.पवनार (जि. वर्धा) येथून सुरू होणाऱ्या या महामार्गाद्वारे माहूरगड, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, सोलापुरातील सिद्धरामेश्वर, तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूरची अंबाबाई, पत्रादेवी ही देवस्थाने प्रामुख्याने जोडली जाणार आहेत. अर्थात, ती महामार्गावरच असल्याने स्वतंत्र उपमार्गांची आवश्यकता नाही. नृसिंहवाडीचे दत्त देवस्थान, आदमापूरचे संत बाळूमामा देवस्थान, ऐतिहासिक पन्हाळा यांच्यासाठी मात्र उपमार्ग काढले जाणार आहेत. सांगली, गारगोटी, पट्टणकोडोली, कोल्हापूर बायपास यांच्यासाठीही उपमार्गांचे नियोजन आहे.

हा महामार्ग राज्यातील १२ जिल्ह्यांतून जाणार आहे. तेथील धार्मिक स्थळांना जोडण्यासाठी या उपमार्गांची आखणी करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात या महामार्गाची लांबी ५७ किलोमीटर, तर कोल्हापूर जिल्ह्यात १२३ किलोमीटर असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३९ किलोमीटर असणार आहे. सांगलीनजीकच्या कर्नाळ, पद्माळे, बुधगाव, कवलापूर, सांगलीवाडी या गावांमधून महामार्ग जाईल. तेथून सांगली शहरासाठी उपमार्ग निघेल.सांगली जिल्ह्यात बाणुरगड (ता. खानापूर) येथे तो प्रवेश करेल. तेथून तिसंगी (ता. कवठेमहांकाळ), डोंगरसोनी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, मणेराजुरी, मतकुणकी(ता. तासगाव) असा प्रवेश करेल. मतकुणकीमधून मिरज तालुक्यात प्रवेश करेल. कवलापूर, बुधगाव, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी असा जाईल. यातील काही गावांत महामार्गासाठी चिन्हांकनाची कामे सुरू झाली आहेत.

२०२७ चे उद्दिष्टहा महामार्ग २०२७ मध्ये पूर्ण करण्याचे महामार्ग विकास महामंडळाचे उद्दिष्ट आहे. सहा पदरी महामार्गावर अनेक ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग, रेल्वे उड्डाणपूल आदींचा समावेश आहे. ठिकठिकाणी पथकर नाकेदेखील असतील. सुमारे ८०५ किलोमीटर लांबीचा हा महामार्गा समृद्धीपेक्षाही लांब अंतराचा आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा असेल.

भूसंपादनामुळे शेतकऱ्यांत अस्वस्थतामहामार्गाच्या प्रस्तावित आराखड्यानुसार सांगली जिल्ह्यातील बहुतांश बागायती क्षेत्रातून तो जाणार आहे. शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षांच्या कष्टाने फुलविलेल्या बागायती महामार्गासाठी घेतल्या जाणार आहेत. मात्र, भूसंपादनाच्या भरपाईविषयी अनिश्चितता असल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता आहे. नव्या कायदेशीर तरतुदीनुसार मूल्यांकनाचे दर शासनाने कमी केले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसे पैसे मिळण्याची चिन्हे नाहीत.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरhighwayमहामार्ग