शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

कर्जमाफी योजनेतील बोगस लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 1:59 PM

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ज्यांच्या नावावर कोणतीही शेतजमीन नाही अथवा १० गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची माहिती तपासणीचे आदेश दिले होते. यात जिल्ह्यातील एकूण १४१ व्यक्तींनी कर्जमुक्ती योजनेचा गैरलाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे लाभ घेऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्या व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

ठळक मुद्देकर्जमाफी योजनेतील बोगस, लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल होणारजिल्हाधिकाऱ्यांची कारवाई; १४१ जण बोगस लाभार्थी; ९२ लाखांची रक्कम

सांगली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ज्यांच्या नावावर कोणतीही शेतजमीन नाही अथवा १० गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची माहिती तपासणीचे आदेश दिले होते. यात जिल्ह्यातील एकूण १४१ व्यक्तींनी कर्जमुक्ती योजनेचा गैरलाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे लाभ घेऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्या व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथे सात-बारा नसताना कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतल्याने १२ व्यक्तींवर यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अशाच पध्दतीने जिल्ह्यात इतर ठिकाणी देखील या योजनेचा गैरलाभ घेण्यात आल्याची शक्यता असल्याने बँकांनी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केलेल्या शेतकऱ्यांपैकी १० गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकºयांची माहिती तलाठ्यांकडून घेऊन शासकीय लेखापरीक्षकांमार्फत तपासणी करण्याचे आदेश दिले होते.

या तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील एकूण १४१ व्यक्तींनी योजनेचा गैरलाभ घेतला असल्याचे निदर्शनास आलेले आहे. अशी एकूण १४१ प्रकरणे असून यातील अपात्र ११० कर्ज खात्यांवर सुमारे ९२ लाख ४२ हजार ८३३ रूपयांची गैरलाभाची रक्कम वर्ग झाली आहे.

या शेतकऱ्यांनी घेतलेली लाभाची रक्कम पुन्हा शासनजमा करण्याची सूचना करण्यात आली आहे. याशिवाय बॅँकांनीही ही रक्क म कर्जखात्यावर वर्ग न करता ती शासनजमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा उपनिबंधकांना या लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.तपासणी अहवालातून १४१ पैकी एकूण ११० अपात्र कर्ज खात्यांवर ९२ लाख ४२ हजार ८३३ रुपये गैरलाभाची रक्कम वर्ग झाली आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली