शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

Sangli Politics: वाळवा-शिराळ्यात भाजप नेत्यांची मांदीयाळी, जयंत पाटील यांच्या विरोधात बोलण्यास मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 18:23 IST

तरीही त्या रस्त्याला जाणार नाही

अशोक पाटीलइस्लामपूर : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघात कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपच्या दिग्ग्ज नेत्यांची वर्दळ वाढली आहे. मात्र, आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात या नेत्यांनी बाळगलेले मौन राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. दोन्ही मतदारसंघातील राजकीय हालचालीतून नेमके कशाचे संकेत मिळत आहेत, यावरुन तर्कवितर्क लढविले जात आहेत.विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात इस्लामपूर मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एंट्रीने जयंत पाटील यांच्यापुढे आव्हान उभे केले होते. तरीसुद्धा जयंत पाटील विजयी झाले. परंतु, मतांचा टक्का चांगलाच घसरला. याऊलट शिराळा मतदारसंघात भाजपने सत्यजित देशमुख यांच्या रूपाने बाजी मारली. मानसिंगराव यांचा पराजय जयंत पाटील यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. मतदारसंघात भाजपने आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.शिराळा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील ४८ गावे येतात. याठिकाणी जयंत पाटील यांचेच वर्चस्व आहे. त्यांना धक्का देण्यासाठी नुकतेच निवडून आलेले सत्यजित देशमुख यांच्यासह आमदार सदाभाऊ खोत, राहुल महाडिक, सम्राट महाडिक आणि जयराज पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का देत भाजप मजबूत करण्यासाठी सभासद नोंदणी जोमाने सुरू केली आहे. बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, गोपीचंद पडळकर यांना आमंत्रित केले होते. परंतु, या नेत्यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात ‘ब्र’ शब्दही काढला नाही.

तरीही त्या रस्त्याला जाणार नाहीगेल्या आठवडाभरात आमदार जयंत पाटील यांच्या भूमिकेविषयी सोशल मीडियावर विविध चर्चा होऊ लागली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील यांची गळाभेट झाली असली तरीही आपण त्या रस्त्याला नाहीच अशीच भूमिका जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर घेतली आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणislampur-acइस्लामपूरJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपा