शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
5
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
6
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
7
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
8
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
9
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
10
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
11
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
12
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
13
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
14
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
15
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
16
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
17
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
18
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
20
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...

भाजप, काँग्रेसमध्ये निवडणूकपूर्व गोंधळ... सांगली लोकसभा मतदारसंघ : कार्यकर्ते संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:13 IST

एकीकडे काँग्रेसमध्ये निर्माण झालेला उमेदवारीचा गोंधळ, तर पक्षांतर्गत गटबाजीने त्रासलेला भारतीय जनता पक्ष, यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये निवडणूकपूर्व संभ्रमावस्था दिसत आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून हे दोन्ही पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत समोर येत असताना, या दोन्ही पक्षांमधील गोंधळाची स्थिती जवळपास सारखीच दिसत आहे.

ठळक मुद्देदोन्ही पक्षातील नेत्यांसमोर गटबाजीची डोकेदुखीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतरही पक्षाचे कार्यकर्ते अद्याप शांतच दिसत आहेत.

अविनाश कोळी ।सांगली : एकीकडे काँग्रेसमध्ये निर्माण झालेला उमेदवारीचा गोंधळ, तर पक्षांतर्गत गटबाजीने त्रासलेला भारतीय जनता पक्ष, यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये निवडणूकपूर्व संभ्रमावस्था दिसत आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून हे दोन्ही पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत समोर येत असताना, या दोन्ही पक्षांमधील गोंधळाची स्थिती जवळपास सारखीच दिसत आहे.सांगली लोकसभा मतदारसंघातील आघाडीची जागा काँग्रेसकडे असून, युती झाली असली तरी, ही जागा भाजपकडे आली आहे. त्यामुळे आघाडीतील राष्टवादी आणि युतीमधील शिवसेना हे पक्ष मित्रपक्षांच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांना यासाठी फार मेहनत घ्यावी लागणार नाही. काँग्रेस व भाजपच्या राज्यातील नेत्यांनी सांगली लोकसभेसंदर्भात मुंबईत बैठका घेऊन तयारीला लागण्याचे आदेशही दिले आहेत. मात्र आदेशाप्रमाणे हालचाली होण्याऐवजी पक्षांतर्गत गोंधळ वाढत आहे.काँग्रेसमधील उमेदवारीचा गोंधळ कायम आहे.

माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील आणि पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे दोनच इच्छुक उमेदवार उमेदवारीसाठी धडपडत आहेत. दुसरीकडे पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीतील सदस्यांकडून आ. विश्वजित कदम, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्याकडेही उमेदवारीबद्दल विचारणा केली जात आहे. गटबाजीत विभागलेल्या काँग्रेससमोर उमेदवारीचा पेचप्रसंग उभा राहिला आहे. कोणालाही उमेदवारी दिली तरी, पक्षांतर्गत गटबाजीचा फटका बसण्याची चिंता वरिष्ठ नेत्यांना वाटत असल्याने, ते याबाबत सावधगिरीच्या भूमिकेत आहेत. काँग्रेसमधील उमेदवारीचा हा गोंधळ कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहे. उमेदवारी निश्चित नसताना निवडणुकीची तयारी करायची तरी कशी?, असा सवाल कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत.

भाजपमध्ये खासदार संजयकाका पाटील यांची दावेदारी सर्वात मजबूत मानली जात असल्याने, त्यांच्यात उमेदवारीवरून कोणताही गोंधळ नाही. मात्र गटबाजीने पक्ष त्रस्त आहे. भाजपचे खासदार आणि काही आमदार एकमेकांशी संघर्ष करताना दिसून येत आहेत. खासदार-आमदारांमधील हा वाद पक्षासाठी सर्वात चिंतेचा विषय आहे. सभा, कार्यक्रमांमधूनही गटबाजीची झलक लोकांना पाहायला मिळत आहे. एकमेकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतरही पक्षाचे कार्यकर्ते अद्याप शांतच दिसत आहेत. दोन्ही पक्ष वेगवेगळ्या कारणांनी त्रस्त दिसत आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची चिन्हे असताना दोन्ही पक्षात शांतता आहे.वरिष्ठांची हतबलताकाँग्रेस आणि भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीतील वरिष्ठ नेतेही पक्षांतर्गत वादावर तोडगा काढण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांची हतबलता या संघर्षाला अधिक बळ देताना दिसत आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाSangliसांगली