शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

भाजप, काँग्रेसमध्ये निवडणूकपूर्व गोंधळ... सांगली लोकसभा मतदारसंघ : कार्यकर्ते संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:13 IST

एकीकडे काँग्रेसमध्ये निर्माण झालेला उमेदवारीचा गोंधळ, तर पक्षांतर्गत गटबाजीने त्रासलेला भारतीय जनता पक्ष, यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये निवडणूकपूर्व संभ्रमावस्था दिसत आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून हे दोन्ही पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत समोर येत असताना, या दोन्ही पक्षांमधील गोंधळाची स्थिती जवळपास सारखीच दिसत आहे.

ठळक मुद्देदोन्ही पक्षातील नेत्यांसमोर गटबाजीची डोकेदुखीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतरही पक्षाचे कार्यकर्ते अद्याप शांतच दिसत आहेत.

अविनाश कोळी ।सांगली : एकीकडे काँग्रेसमध्ये निर्माण झालेला उमेदवारीचा गोंधळ, तर पक्षांतर्गत गटबाजीने त्रासलेला भारतीय जनता पक्ष, यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये निवडणूकपूर्व संभ्रमावस्था दिसत आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून हे दोन्ही पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत समोर येत असताना, या दोन्ही पक्षांमधील गोंधळाची स्थिती जवळपास सारखीच दिसत आहे.सांगली लोकसभा मतदारसंघातील आघाडीची जागा काँग्रेसकडे असून, युती झाली असली तरी, ही जागा भाजपकडे आली आहे. त्यामुळे आघाडीतील राष्टवादी आणि युतीमधील शिवसेना हे पक्ष मित्रपक्षांच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांना यासाठी फार मेहनत घ्यावी लागणार नाही. काँग्रेस व भाजपच्या राज्यातील नेत्यांनी सांगली लोकसभेसंदर्भात मुंबईत बैठका घेऊन तयारीला लागण्याचे आदेशही दिले आहेत. मात्र आदेशाप्रमाणे हालचाली होण्याऐवजी पक्षांतर्गत गोंधळ वाढत आहे.काँग्रेसमधील उमेदवारीचा गोंधळ कायम आहे.

माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील आणि पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे दोनच इच्छुक उमेदवार उमेदवारीसाठी धडपडत आहेत. दुसरीकडे पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीतील सदस्यांकडून आ. विश्वजित कदम, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्याकडेही उमेदवारीबद्दल विचारणा केली जात आहे. गटबाजीत विभागलेल्या काँग्रेससमोर उमेदवारीचा पेचप्रसंग उभा राहिला आहे. कोणालाही उमेदवारी दिली तरी, पक्षांतर्गत गटबाजीचा फटका बसण्याची चिंता वरिष्ठ नेत्यांना वाटत असल्याने, ते याबाबत सावधगिरीच्या भूमिकेत आहेत. काँग्रेसमधील उमेदवारीचा हा गोंधळ कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहे. उमेदवारी निश्चित नसताना निवडणुकीची तयारी करायची तरी कशी?, असा सवाल कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत.

भाजपमध्ये खासदार संजयकाका पाटील यांची दावेदारी सर्वात मजबूत मानली जात असल्याने, त्यांच्यात उमेदवारीवरून कोणताही गोंधळ नाही. मात्र गटबाजीने पक्ष त्रस्त आहे. भाजपचे खासदार आणि काही आमदार एकमेकांशी संघर्ष करताना दिसून येत आहेत. खासदार-आमदारांमधील हा वाद पक्षासाठी सर्वात चिंतेचा विषय आहे. सभा, कार्यक्रमांमधूनही गटबाजीची झलक लोकांना पाहायला मिळत आहे. एकमेकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतरही पक्षाचे कार्यकर्ते अद्याप शांतच दिसत आहेत. दोन्ही पक्ष वेगवेगळ्या कारणांनी त्रस्त दिसत आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची चिन्हे असताना दोन्ही पक्षात शांतता आहे.वरिष्ठांची हतबलताकाँग्रेस आणि भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीतील वरिष्ठ नेतेही पक्षांतर्गत वादावर तोडगा काढण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांची हतबलता या संघर्षाला अधिक बळ देताना दिसत आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाSangliसांगली