शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

मत्स्यशेती योजनेत जुन्या शेतकऱ्यांना डावलल्याने कोट्यवधींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 2:57 PM

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana Sangli : मत्स्यशेती योजनेसाठी प्रतिक्षा यादीतील शेतकऱ्यांना डावलून प्रशासनाने नव्याने अर्ज मागवले आहेत, त्यामुळे यादीतील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे. नवी निवड प्रक्रिया रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ठळक मुद्देमत्स्यशेती योजनेत जुन्या शेतकऱ्यांना डावललेप्रतिक्षा यादीतील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

सांगली : मत्स्यशेती योजनेसाठी प्रतिक्षा यादीतील शेतकऱ्यांना डावलून प्रशासनाने नव्याने अर्ज मागवले आहेत, त्यामुळे यादीतील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे. नवी निवड प्रक्रिया रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड गेल्या बुधवारी (दि.९) पुण्यात लकी ड्रॉ पद्धतीने झाली. यासाठीची संपूर्ण प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. गेल्यावर्षी लकी ड्रॉमधून राहिलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्षा यादीत ठेवले गेले.

पुढील वर्षी प्राधान्यक्रमाने संधी मिळेल असे सांगितले होते. पण यावर्षी प्रतिक्षा यादीतील शेतकऱ्यांना संधी मिळालीच नाही. त्यांना डावलून प्रशासनाने पुन्हा नव्याने अर्ज मागवले. त्यामुळे जुन्या यादीतील शेकडो शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होण्याची भिती आहे.प्रधानमंत्री योजनेअंतर्गत विविध तलाव मत्स्यशेतीसाठी ठेक्याने दिले जातात. तेथे पिंजरा पद्धतीने मासेमारीसाठी शासन अनुदान देते. महिला शेतकऱ्यांना ६० टक्के, तर पुरुषांना ४० टक्के अनुदान मिळते. प्रकल्पानुसार महिलांना २१ लाख ६० हजार, तर पुरुषांना ११ लाख ५५ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. गेल्यावर्षी प्रतिक्षा यादीतील शेतकऱ्यांनी पुढील वर्षी संधी मिळेल म्हणून पैसे गुंतवले. लाखो रुपयांचे प्रकल्प उभारले. मात्र यंदा लकी ड्रॉमध्ये डावलल्याने ते कर्जात बुडाले आहेत.नव्या शेतकऱ्यांना संधी देण्यापूर्वी जुन्यांचाही विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, पुणे आदी जिल्ह्यांत शेकडो शेतकरी प्रतिक्षा यादीत आहेत. विशेषत: सातारा, पुणे व अहमदनगरमध्ये संख्या मोठी आहे.पिंजरा पद्धत मत्स्य संवर्धन शेतकरी संघटनेने शासनाकडे दाद मागिली आहे. विजय कणसे, अविनाश जाधव, हेमलता घाडगे, सुजाता जाधव, मुश्ताक मलबारी, मधुरा जाधव, सुरेखा चव्हाण, गणेश निकम आदींनी लकी ड्रॉ रद्द करण्याची मागणी केली आहे. योजनेत जुन्या शेतकऱ्यांना डावलल्याने कोट्यवधंचा फटकामहसुल देऊनही डावललेमत्स्यशेतीच्या ठेक्यासाठी हे शेतकरी शासनाला दरवर्षी महसुल जमा करतात, तरीही त्यांना डावलण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी प्रतिक्षायादीचा प्राधान्यक्रम डावलून मनमानी केल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारSangliसांगली