शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

Sangli News: डाळिंबावर बिब्या रोगाचा प्रादुर्भाव; ढगाळ वातावरण, रिमझिम पावसाचा परिणाम

By श्रीनिवास नागे | Updated: July 25, 2023 16:06 IST

दरीबडची (जि. सांगली ) : ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस, प्रतिकूल हवामान यामुळे जत तालुक्यातील डाळिंबांवर बिब्या, फळकुज रोगांचा प्रादुर्भाव ...

दरीबडची (जि. सांगली) : ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस, प्रतिकूल हवामान यामुळे जत तालुक्यातील डाळिंबांवर बिब्या, फळकुज रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करीत शेततलाव व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन डाळिंबाच्या बागा उभ्या केल्या आहेत. डाळिंबाचे क्षेत्र १५ हजार ३४४.५९ एकर आहे. केशर वाणाच्या बागा अधिक आहेत. संख, दरीबडची, उमदी, सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी, सिध्दनाथ, आसंगी (जत) दरीकोणूर, वाळेखिंडी, काशीलिंगवाडी या परिसरात डाळिंब क्षेत्र अधिक आहे. शेतकऱ्यांनी टँकरने पाणी देऊन बागा वाचविल्या आहेत.आता मान्सून पाऊस, ढगाळ व प्रतिकूल वातावरणाचा फटका बसला आहे. फळावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. रोगाने फळे फुटली आहेत. तेल्या रोगग्रस्त फळे तोडून टाकली आहेत. बागेजवळ फळाचे ढीग लागले आहेत. उत्पादनात घट होणार आहे.बागा वाचवण्याची धडपड सुरु आहे. प्रादुर्भाव टाळण्यासाठी महागड्या औषधांचा मारा करत आहेत. मात्र कशाचाही उपयोग होत नाही हे लक्षात आल्याने अनेक शेतकऱ्यांनी बागा सोडून दिल्या जात आहेत. लाखो रुपयांचा फटका बसला आहे.विकास सोसायट्या संकटाततालुक्यातील विकास सोसायट्यांनी बागांवर कोट्यवधीच्या कर्जाचे वाटप केले आहे. बागा अडचणीत आल्याने लाखो रुपयांची येणेबाकी असल्याने विकास सोसयट्या अडचणीत येणार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीweatherहवामान