शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

..अन्यथा तुमची कार्यालये पेटवू, रघुनाथदादा पाटील यांचा बँकांना इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 13:43 IST

कर्जमाफी इशाऱ्यासाठी २ एप्रिलला मोर्चा

सांगली : भाजपप्रणीत सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफीचा शब्द दिला होता. म्हणूनच शेतकऱ्यांनी त्यांना सत्तेत बसविले असल्यामुळे त्यांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल महिन्यात येणार आहे. तोपर्यंत जिल्हा बँकेसह सर्वच बँका, सोसायट्या, पतसंस्थांनी कर्ज वसुली थांबवावी. जबरदस्ती केल्यास बँकांची कार्यालये पेटवून देऊ, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिला.पाटील म्हणाले, शेतकरी संघटनेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीपासून १९ मार्च २०२५ महाराष्ट्रातील सरकारच्या धोरणाचे पहिले बळी ठरलेले साहेबराव करपे यांच्या स्मृती दिवसापर्यंत कर्जमुक्ती जनजागरण अभियानाचा महाराष्ट्रभर प्रचार झाला. समारोप सभा कृषी आयुक्त, सहकार आयुक्त यांच्या दारात सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे झाले. १९ मार्चच्या धरणे आंदोलनानंतर लगेच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्यासंदर्भात दि. २१ मार्च रोजी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. कर्जमुक्तीसाठी संघटनेने केलेल्या आंदोलनाचे हे फलित आहे. एकीकडे समिती स्थापन केलेली असताना शेतकऱ्यांवर कर्जवसुलीसाठी जप्तीच्या कारवाई होत आहे. शासनाच्या कर्जमाफीचा निर्णय होईपर्यंत बँका, पतसंस्था आणि सोसायट्यांनी कर्ज वसुली थांबवावी. एवढे करूनही बँका, पतसंस्था, सोसायट्यांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावल्यास शेतकरी संघटनेच्या वतीने सोसायट्यांची कार्यालये पेटवून देऊ, बँकांना टाळे ठोकू, असा इशाराही त्यांनी दिला.

कर्जमाफी इशाऱ्यासाठी २ एप्रिलला मोर्चाशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सक्तीच्या वसुली, बँक खाती सील, जप्ती, पोलिस बळ आणि जमीनदारांना त्रास देणे सुरू आहे, ते थांबविण्याच्या मागणीसाठी दि. २ एप्रिलला शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन रघुनाथदादा पाटील यांनी केले.

शेतीमाल निर्यातीवरील निर्बंध उठवाकेंद्र आणि राज्य सरकारने शेतीमालावर कोणतेच निर्बंध लादू नयेत, शेतकरी तुम्हाला कर्जमाफी मागायलाही येणार नाही. पण, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतीमालाचे दर कमी होत आहेत. म्हणूनच शेतकरी कर्जबाजारी होत असल्यामुळेच १०० टक्के कर्जमाफी झाली पाहिजे, अशी आमची सरकारकडे मागणी आहे, असेही रघुनाथदादा म्हणाले. तसेच दोन साखर कारखान्यांतील अंतराची अटही रद्द करण्याची त्यांनी मागणी केली.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीbankबँक