शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: ‘स्वाभिमानी’च्या दणक्याने उपसाबंदी आदेश मागे, उद्यापासून कृष्णा नदीतून पाणी उपसा  

By अशोक डोंबाळे | Updated: June 24, 2023 17:30 IST

सांगलीत पाटबंधारे कार्यालयासमोर शंखध्वनी आंदोलन

सांगली : कोयना धरणात १० टक्के पाणीसाठा असल्यामुळे पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सोमवार दि. २६ जूनपर्यंत उपसा बंदी आदेश दिला होता. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची पिके वाळू लागल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी सांगलीत पाटबंधारे मंडळाच्या कार्यालयासमोर शंखध्वनी आंदोलन केले. तसेच अधिकाऱ्यांना यापुढे असा मनमानी कारभार खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कृष्णा नदीतीलपाणी उपसा बंदी आदेश रविवार दि. २५ जूनपासून मागे घेतला आहे.सांगली येथील पाटबंधारे कार्यालयासमोर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी शनिवारी शंखध्वनी आंदोलन केले. कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या मारला होता. अधिकारी आणि सरकारच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. उपसाबंदी मागे घेतली नाही तर पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली.शेवटी राजू शेट्टी यांनी जलसंपदाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांच्याशी मोबाइलवरून चर्चा करून तोडगा काढला. यावेळी उपविभागीय अभयिंता मोहन गळंगे उपस्थित होते. त्यानंतर कार्यकारी अभियंत्या ज्योती देवकर यांनी उपसाबंदी आदेश मागे घेत असल्याचे पत्र आंदोलकांना दिले. कृष्णा नदीतून रविवार दि. २५ जूनपासून पाणी उपसा चालू होणार आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही कृष्णा नदीकाठच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेशही देवकर यांनी दिले आहेत. या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.आंदोलनात महेश खराडे, भागवत जाधव, पोपट मोरे, संदीप राजोबा, प्रकाश देसाई, तानाजी साठे, प्रभाकर पाटील, प्रकाश माळी, शिवाजी पाटील, शंकर पाटील, उत्तम पाटील, योगेश पाटील, यशवंत गायकवाड, दिगंबर देसाई, अशोक काकडे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

साताऱ्यात पाणी उपसा, सांगलीतच बंदी का? : राजू शेट्टीपाण्याची टंचाई आहे, याची जाणीव आम्हाला आहे. मात्र, सांगली जिल्ह्यात उपसाबंदी आणि सातारा जिल्ह्यात उपसा सुरू आहे, हा दुजाभाव नको, सरसकट सर्वांना एकच नियम लागू करण्याची गरज आहे. सांगली जिल्ह्याला एक न्याय आणि सातारा जिल्ह्याला एक न्याय हे खपवून घेणार नाही. प्रशासनाने भेदभावाचे धोरण राबविल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीriverनदीWaterपाणीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना