शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

गळके छत, चिखलमय आवारात शिक्षण; सांगलीतील महापालिका शाळांची दुरवस्था 

By अविनाश कोळी | Updated: July 22, 2023 19:27 IST

बजेट ८५० कोटींचे, शिक्षणाला ५० लाख

सांगली : आलिशान कार्यालयांचा थाट अनुभवत महागड्या गाड्यांमधून फिरणाऱ्या महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, अधिकाऱ्यांना शाळांच्या दारिद्र्याशी काही देणे-घेणे नाही. त्यामुळेच दरवर्षी अंदाजपत्रकात सर्वांत कमी तरतूद शाळांसाठी केली जाते. चालू आर्थिक वर्षात प्रत्येक विद्यार्थ्यासाठी केवळ २.४९ रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे चिखलांत रुतलेला आवार, सेवासुविधांचा अभाव अशा समस्यांना तोंड देत महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे.कोट्यवधी रुपयांचे घोटाळे, खाबुगिरी, एकाच कामांवर अनेकदा पैसे खर्ची टाकून पाण्यासारखा वाहणारा पैसा असे चित्र एका बाजूला दिसत असताना महापालिकेच्या शाळांची दुरवस्था कोणालाही दिसत नाही. एकीकडे महापालिका श्रीमंतीचा थाट दाखवित असताना दुसरीकडे शिक्षणाचे प्रचंड दारिद्र्य हेच लोक मिरविताना दिसताहेत.

बजेट ८५० कोटींचे, शिक्षणाला ५० लाखमहापालिकेने २०२३-२४ साठी ८७८.५५ कोटींचे अंदाजपत्रक तयार केले. त्यात शाळांसाठी केवळ ५० लाख म्हणजे ०.०५ टक्के तरतूद केली गेली. शाळांचा एकूण पट पाहता प्रतिदिन प्रतिविद्यार्थी केवळ २.४९ तर प्रतिमाह ७४.७ रुपये खर्चाची तरतूद आहे.

५० शाळांत ५५०० विद्यार्थीसांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या एकूण ५० प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी ३८ शाळा या मराठी माध्यम, १० शाळा या उर्दू माध्यम व दोन शाळा या कन्नड माध्यमाच्या आहेत. त्यांचा एकूण पट ५५०० इतका आहे.

मदनभाऊ युवा मंचने केली पाहणीमदनभाऊ युवा मंचने नुकत्याच केलेल्या शाळांच्या पाहणीत पायाभूत सुविधांची कमतरता स्पष्टपणे दिसून आली. शाळांमध्ये वॉटर फिल्टर नसल्याने मुले प्लास्टिक अथवा सिमेंटच्या टाकीमधील पाणी पितात. टाकीमधील पाणी अशुद्ध होण्याची दाट शक्यता असते. अशुद्ध पाण्यामुळे अतिसार, कावीळ, पोटदुखी यासारखे हे आजार विद्यार्थ्यांमध्ये आढळून आले आहेत.

या गैरसोयी दूर कोण करणार

अनेक शाळांचे छत गळतात. पावसाळ्यात शाळेच्या आवारात पाणी साचते. याठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसवण्यासाठीही तरतूद कोणी करीत नाही.

महापालिका शाळेत आर्थिक दुर्बल घटकातील मुले शिक्षण घेतात. त्यांच्यासाठी मूलभूत सुविधा पुरविणे हे महापालिकेचे नैतिक व आद्य कर्तव्य आहे. शाळेमध्ये वॉटर फिल्टर, पेव्हिंग ब्लॉक, खेळणी, रंगरंगोटी इत्यादी मूलभूत गोष्टींवर खर्च करुन शाळा अद्ययावत कराव्यात. - आनंद लेंगरे, जिल्हाध्यक्ष, मदनभाऊ पाटील युवा मंच

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळा