शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
4
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
5
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
6
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
7
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
8
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
9
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
10
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
11
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
12
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
13
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
14
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
15
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
16
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
17
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
18
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
19
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
20
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम

राजकीय पटलावर आटपाडी तालुका अखेर दखलपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 15:35 IST

१९९४ मध्ये विधानसभा निवडणुकीत जसा राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या पाठीशी ठामपणे आटपाडी तालुका उभा राहिला, अगदी तसाच प्रतिसाद या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना तालुक्याने दिला. ही निवडणूक आटपाडीची अस्मिता जागृत करणारी ठरली. आता यापुढे तरी राजकीयदृष्ट्या आटपाडीला अदखलपात्र समजण्याची घोडचूक जिल्ह्यातील नेत्यांनी करू नये, असा इशाराच यानिमित्ताने मिळाला आहे.

ठळक मुद्देराजकीय पटलावर आटपाडी तालुका अखेर दखलपात्र सत्तेत संधी मिळत नसल्याने तालुका विकासापासून वंचित

अविनाश बाडआटपाडी : १९९४ मध्ये विधानसभा निवडणुकीत जसा राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या पाठीशी ठामपणे आटपाडी तालुका उभा राहिला, अगदी तसाच प्रतिसाद या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना तालुक्याने दिला. ही निवडणूक आटपाडीची अस्मिता जागृत करणारी ठरली. आता यापुढे तरी राजकीयदृष्ट्या आटपाडीला अदखलपात्र समजण्याची घोडचूक जिल्ह्यातील नेत्यांनी करू नये, असा इशाराच यानिमित्ताने मिळाला आहे.राजेंद्रअण्णा देशमुख आणि अण्णासाहेब लेंगरे वगळता आजपर्यंत तालुक्यातून विधानसभेवर कोणीच गेलेले नाही. ५७ वर्षांत अमरसिंह देशमुख यांनी एकदा अल्पकाळासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. हे अपवाद वगळता तालुक्यातील नेतृत्वाला सत्तेत संधी मिळत नसल्याने तालुका विकासापासून वंचित राहिला.आटपाडी तालुका यापूर्वी लोकसभेच्या पंढरपूर मतदारसंघाला जोडला होता, तेव्हा खासदार दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी परिस्थिती होती. खासदार रामदास आठवले यांच्या कालावधित तालुक्यात अधुनमधून दौरे व्हायचे. त्यानंतर सांगली लोकसभा मतदारसंघात आटपाडीचा समावेश झाला. प्रतीक पाटील आणि संजयकाका पाटील यांना संधी मिळाली.

पण आटपाडीतील कोणत्याच नेत्याने लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करून जिल्ह्याचे लक्ष यापूर्वी कधीच वेधून घेतलेले नाही. यावेळी मात्र वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत भलतीच चुरस निर्माण झाली. आधी भाजपला एकतर्फी वाटणारी निवडणूक नंतर नंतर कमळाला डेंजर झोनकडे घेऊन गेली.निवडणुकीचा निकाल काय लागायचा तो लागेल. पण त्याबाबत सध्या तरी ठामपणे, छातीठोकपणे सांगणाऱ्या राजकीय निरीक्षकांची वानवाच आहे. जिल्हा ढवळून काढणाऱ्या या निवडणुकीने आटपाडीचे राजकीय महत्त्व अधोरेखित केले. पडळकरांच्या उमेदवारीमुळे भाजपसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची जिल्ह्यातील नेत्यांना मनधरणी करावी लागली. त्यांचे राजकीय महत्त्व वाढले. या तापलेल्या राजकीय वातावरणाचा येत्या विधानसभा निवडणुकीत कोणावर परिणाम होणार, याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.वंचित आघाडीची मोट अशीच कायम राहिली, तर येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात अनेक मतदारसंघात त्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. वंचित आघाडीतून विधानसभा निवडणुकीत कोण निवडणूक लढविणार, कोण जिंकणार, कोणामुळे मतांचे विभाजन होऊन प्रस्थापित उमेदवाराला धूळ चारणार, याबद्दल तर्कवितर्क लढविले जात आहेत.

विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीची सूत्रे प्रथमच काही प्रमाणात का असेनात, पण आटपाडी तालुक्यातून हलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. असे झाले तर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात आटपाडी तालुक्याचे वेगळे स्थान निर्माण होईल यात शंका नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणSangliसांगली