शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
6
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
7
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
8
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
9
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
10
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
11
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
12
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
13
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
14
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
15
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
16
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
17
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
18
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
19
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
20
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पटलावर आटपाडी तालुका अखेर दखलपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 15:35 IST

१९९४ मध्ये विधानसभा निवडणुकीत जसा राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या पाठीशी ठामपणे आटपाडी तालुका उभा राहिला, अगदी तसाच प्रतिसाद या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना तालुक्याने दिला. ही निवडणूक आटपाडीची अस्मिता जागृत करणारी ठरली. आता यापुढे तरी राजकीयदृष्ट्या आटपाडीला अदखलपात्र समजण्याची घोडचूक जिल्ह्यातील नेत्यांनी करू नये, असा इशाराच यानिमित्ताने मिळाला आहे.

ठळक मुद्देराजकीय पटलावर आटपाडी तालुका अखेर दखलपात्र सत्तेत संधी मिळत नसल्याने तालुका विकासापासून वंचित

अविनाश बाडआटपाडी : १९९४ मध्ये विधानसभा निवडणुकीत जसा राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या पाठीशी ठामपणे आटपाडी तालुका उभा राहिला, अगदी तसाच प्रतिसाद या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना तालुक्याने दिला. ही निवडणूक आटपाडीची अस्मिता जागृत करणारी ठरली. आता यापुढे तरी राजकीयदृष्ट्या आटपाडीला अदखलपात्र समजण्याची घोडचूक जिल्ह्यातील नेत्यांनी करू नये, असा इशाराच यानिमित्ताने मिळाला आहे.राजेंद्रअण्णा देशमुख आणि अण्णासाहेब लेंगरे वगळता आजपर्यंत तालुक्यातून विधानसभेवर कोणीच गेलेले नाही. ५७ वर्षांत अमरसिंह देशमुख यांनी एकदा अल्पकाळासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. हे अपवाद वगळता तालुक्यातील नेतृत्वाला सत्तेत संधी मिळत नसल्याने तालुका विकासापासून वंचित राहिला.आटपाडी तालुका यापूर्वी लोकसभेच्या पंढरपूर मतदारसंघाला जोडला होता, तेव्हा खासदार दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी परिस्थिती होती. खासदार रामदास आठवले यांच्या कालावधित तालुक्यात अधुनमधून दौरे व्हायचे. त्यानंतर सांगली लोकसभा मतदारसंघात आटपाडीचा समावेश झाला. प्रतीक पाटील आणि संजयकाका पाटील यांना संधी मिळाली.

पण आटपाडीतील कोणत्याच नेत्याने लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करून जिल्ह्याचे लक्ष यापूर्वी कधीच वेधून घेतलेले नाही. यावेळी मात्र वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत भलतीच चुरस निर्माण झाली. आधी भाजपला एकतर्फी वाटणारी निवडणूक नंतर नंतर कमळाला डेंजर झोनकडे घेऊन गेली.निवडणुकीचा निकाल काय लागायचा तो लागेल. पण त्याबाबत सध्या तरी ठामपणे, छातीठोकपणे सांगणाऱ्या राजकीय निरीक्षकांची वानवाच आहे. जिल्हा ढवळून काढणाऱ्या या निवडणुकीने आटपाडीचे राजकीय महत्त्व अधोरेखित केले. पडळकरांच्या उमेदवारीमुळे भाजपसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची जिल्ह्यातील नेत्यांना मनधरणी करावी लागली. त्यांचे राजकीय महत्त्व वाढले. या तापलेल्या राजकीय वातावरणाचा येत्या विधानसभा निवडणुकीत कोणावर परिणाम होणार, याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.वंचित आघाडीची मोट अशीच कायम राहिली, तर येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात अनेक मतदारसंघात त्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. वंचित आघाडीतून विधानसभा निवडणुकीत कोण निवडणूक लढविणार, कोण जिंकणार, कोणामुळे मतांचे विभाजन होऊन प्रस्थापित उमेदवाराला धूळ चारणार, याबद्दल तर्कवितर्क लढविले जात आहेत.

विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीची सूत्रे प्रथमच काही प्रमाणात का असेनात, पण आटपाडी तालुक्यातून हलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. असे झाले तर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात आटपाडी तालुक्याचे वेगळे स्थान निर्माण होईल यात शंका नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणSangliसांगली