शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

आटपाडीचा तलाव उपशामुळे चार दिवसात कोरडा पडणार- आरक्षित पाण्यावर काहींचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 23:53 IST

आटपाडी : पिण्याच्या पाण्यासाठी आटपाडी तलावात आरक्षित केलेल्या पाणी साठ्यावर काहींनी डल्ला मारला आहे. पाणीसाठा संपत आला असून, प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर येत्या चार

अविनाश बाड ।आटपाडी : पिण्याच्या पाण्यासाठी आटपाडी तलावात आरक्षित केलेल्या पाणी साठ्यावर काहींनी डल्ला मारला आहे. पाणीसाठा संपत आला असून, प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर येत्या चार दिवसात तलाव कोरडा पडून आटपाडीसह आठ गावात भीषण पाणीटंचाई भासण्याची भीती आहे.

आटपाडीसह मापटेमळा ग्रामपंचायत आणि माडगुळे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून ७ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आटपाडी तलावातून केला जातो. या तलावाची पाणी साठवण क्षमता ३०७ दशलक्ष घनफूट आहे.

मात्र यंदा पाऊस कमी झाल्याने फक्त १७८ दशलक्ष घनफूट एवढाच पाणीसाठा झाला. तलावातून सध्या ५ ते १५ अश्वशक्ती क्षमतेच्या ७० मोटारी अहोरात्र पाणीउपसा करीत आहेत. आॅगस्ट २०१८ अखेर वार्षिक १०५ दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण ठेवण्याचा आदेश महसूल प्रशासनाने पाटबंधारे विभागाला दिला आहे. त्यानुसार सध्या तलावात किमान ५९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात ४८ दशलक्ष घनफूट पाणी असून यापैकी २७ दशलक्ष घनफूट पाणी गाळात आहे. पिण्यासाठी त्याचा वापर करता येणार नाही; म्हणजेच सध्या फक्त २१ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. या पाण्याचाही सध्या अहोरात्र उपसा सुरू आहे. त्यामुळे २०१३ च्या भीषण दुष्काळी परिस्थितीत जसा तलाव कोरडा पडला होता, तसा आता होण्याची भीती आहे.जरा इकडे लक्ष द्या!सध्या आटपाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. पण तलावातील पाण्याकडे दुर्लक्ष केल्यास, निवडणुकीत कुणीही जिंकले तरी लागलेला गुलाल धुवायलाही पाणी मिळणार नाही. सध्या टेंभूचे पाणी सांगोला, कवठेमहांकाळला कालव्याने आटपाडी तालुक्यातूनच जात आहे. आधी ४० हजार रुपये दशलक्ष घनफूट असलेली पाणीपट्टी आता फक्त १४ हजार ७६१ रुपये झाली आहे. पाणी उपसा करणाऱ्या शेतकºयांकडून रक्कम काढून लगेच पाणी घेतले, तर त्यांची पिकेही वाचतील व पाणीटंचाईही भासणार नाही. ३१ मेपर्यंत टेंभूचे पाणी सुरू राहणार आहे. 

ग्रामपंचायती पाण्याचे पैसेच भरत नाहीतग्रामपंचायतींना पाण्याचा दर १० हजार लिटरला दीड रुपया आहे. तरीही गेल्या दोन वर्षात एकाही ग्रामपंचायतीने पाण्याचे पैसे भरलेले नाहीत. आटपाडी ग्रामपंचायतीकडे ५ लाख ३५ हजार ८६५ रुपये, मापटेमळा ३६,१६० रुपये, तर माडगुळे प्रादेशिक योजनेच्या ७ गावांकडे १ लाख ४९ हजार ५३९ रुपये एवढी थकबाकी आहे. त्यामुळे पाणीपट्टी वसूल नेमका जातो कुठे, असा प्रश्न आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSangliसांगली