शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीचा तलाव उपशामुळे चार दिवसात कोरडा पडणार- आरक्षित पाण्यावर काहींचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 23:53 IST

आटपाडी : पिण्याच्या पाण्यासाठी आटपाडी तलावात आरक्षित केलेल्या पाणी साठ्यावर काहींनी डल्ला मारला आहे. पाणीसाठा संपत आला असून, प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर येत्या चार

अविनाश बाड ।आटपाडी : पिण्याच्या पाण्यासाठी आटपाडी तलावात आरक्षित केलेल्या पाणी साठ्यावर काहींनी डल्ला मारला आहे. पाणीसाठा संपत आला असून, प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर येत्या चार दिवसात तलाव कोरडा पडून आटपाडीसह आठ गावात भीषण पाणीटंचाई भासण्याची भीती आहे.

आटपाडीसह मापटेमळा ग्रामपंचायत आणि माडगुळे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून ७ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आटपाडी तलावातून केला जातो. या तलावाची पाणी साठवण क्षमता ३०७ दशलक्ष घनफूट आहे.

मात्र यंदा पाऊस कमी झाल्याने फक्त १७८ दशलक्ष घनफूट एवढाच पाणीसाठा झाला. तलावातून सध्या ५ ते १५ अश्वशक्ती क्षमतेच्या ७० मोटारी अहोरात्र पाणीउपसा करीत आहेत. आॅगस्ट २०१८ अखेर वार्षिक १०५ दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण ठेवण्याचा आदेश महसूल प्रशासनाने पाटबंधारे विभागाला दिला आहे. त्यानुसार सध्या तलावात किमान ५९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात ४८ दशलक्ष घनफूट पाणी असून यापैकी २७ दशलक्ष घनफूट पाणी गाळात आहे. पिण्यासाठी त्याचा वापर करता येणार नाही; म्हणजेच सध्या फक्त २१ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. या पाण्याचाही सध्या अहोरात्र उपसा सुरू आहे. त्यामुळे २०१३ च्या भीषण दुष्काळी परिस्थितीत जसा तलाव कोरडा पडला होता, तसा आता होण्याची भीती आहे.जरा इकडे लक्ष द्या!सध्या आटपाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. पण तलावातील पाण्याकडे दुर्लक्ष केल्यास, निवडणुकीत कुणीही जिंकले तरी लागलेला गुलाल धुवायलाही पाणी मिळणार नाही. सध्या टेंभूचे पाणी सांगोला, कवठेमहांकाळला कालव्याने आटपाडी तालुक्यातूनच जात आहे. आधी ४० हजार रुपये दशलक्ष घनफूट असलेली पाणीपट्टी आता फक्त १४ हजार ७६१ रुपये झाली आहे. पाणी उपसा करणाऱ्या शेतकºयांकडून रक्कम काढून लगेच पाणी घेतले, तर त्यांची पिकेही वाचतील व पाणीटंचाईही भासणार नाही. ३१ मेपर्यंत टेंभूचे पाणी सुरू राहणार आहे. 

ग्रामपंचायती पाण्याचे पैसेच भरत नाहीतग्रामपंचायतींना पाण्याचा दर १० हजार लिटरला दीड रुपया आहे. तरीही गेल्या दोन वर्षात एकाही ग्रामपंचायतीने पाण्याचे पैसे भरलेले नाहीत. आटपाडी ग्रामपंचायतीकडे ५ लाख ३५ हजार ८६५ रुपये, मापटेमळा ३६,१६० रुपये, तर माडगुळे प्रादेशिक योजनेच्या ७ गावांकडे १ लाख ४९ हजार ५३९ रुपये एवढी थकबाकी आहे. त्यामुळे पाणीपट्टी वसूल नेमका जातो कुठे, असा प्रश्न आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSangliसांगली