शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

आटपाडीचा तलाव उपशामुळे चार दिवसात कोरडा पडणार- आरक्षित पाण्यावर काहींचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 23:53 IST

आटपाडी : पिण्याच्या पाण्यासाठी आटपाडी तलावात आरक्षित केलेल्या पाणी साठ्यावर काहींनी डल्ला मारला आहे. पाणीसाठा संपत आला असून, प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर येत्या चार

अविनाश बाड ।आटपाडी : पिण्याच्या पाण्यासाठी आटपाडी तलावात आरक्षित केलेल्या पाणी साठ्यावर काहींनी डल्ला मारला आहे. पाणीसाठा संपत आला असून, प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर येत्या चार दिवसात तलाव कोरडा पडून आटपाडीसह आठ गावात भीषण पाणीटंचाई भासण्याची भीती आहे.

आटपाडीसह मापटेमळा ग्रामपंचायत आणि माडगुळे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून ७ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आटपाडी तलावातून केला जातो. या तलावाची पाणी साठवण क्षमता ३०७ दशलक्ष घनफूट आहे.

मात्र यंदा पाऊस कमी झाल्याने फक्त १७८ दशलक्ष घनफूट एवढाच पाणीसाठा झाला. तलावातून सध्या ५ ते १५ अश्वशक्ती क्षमतेच्या ७० मोटारी अहोरात्र पाणीउपसा करीत आहेत. आॅगस्ट २०१८ अखेर वार्षिक १०५ दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण ठेवण्याचा आदेश महसूल प्रशासनाने पाटबंधारे विभागाला दिला आहे. त्यानुसार सध्या तलावात किमान ५९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात ४८ दशलक्ष घनफूट पाणी असून यापैकी २७ दशलक्ष घनफूट पाणी गाळात आहे. पिण्यासाठी त्याचा वापर करता येणार नाही; म्हणजेच सध्या फक्त २१ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. या पाण्याचाही सध्या अहोरात्र उपसा सुरू आहे. त्यामुळे २०१३ च्या भीषण दुष्काळी परिस्थितीत जसा तलाव कोरडा पडला होता, तसा आता होण्याची भीती आहे.जरा इकडे लक्ष द्या!सध्या आटपाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. पण तलावातील पाण्याकडे दुर्लक्ष केल्यास, निवडणुकीत कुणीही जिंकले तरी लागलेला गुलाल धुवायलाही पाणी मिळणार नाही. सध्या टेंभूचे पाणी सांगोला, कवठेमहांकाळला कालव्याने आटपाडी तालुक्यातूनच जात आहे. आधी ४० हजार रुपये दशलक्ष घनफूट असलेली पाणीपट्टी आता फक्त १४ हजार ७६१ रुपये झाली आहे. पाणी उपसा करणाऱ्या शेतकºयांकडून रक्कम काढून लगेच पाणी घेतले, तर त्यांची पिकेही वाचतील व पाणीटंचाईही भासणार नाही. ३१ मेपर्यंत टेंभूचे पाणी सुरू राहणार आहे. 

ग्रामपंचायती पाण्याचे पैसेच भरत नाहीतग्रामपंचायतींना पाण्याचा दर १० हजार लिटरला दीड रुपया आहे. तरीही गेल्या दोन वर्षात एकाही ग्रामपंचायतीने पाण्याचे पैसे भरलेले नाहीत. आटपाडी ग्रामपंचायतीकडे ५ लाख ३५ हजार ८६५ रुपये, मापटेमळा ३६,१६० रुपये, तर माडगुळे प्रादेशिक योजनेच्या ७ गावांकडे १ लाख ४९ हजार ५३९ रुपये एवढी थकबाकी आहे. त्यामुळे पाणीपट्टी वसूल नेमका जातो कुठे, असा प्रश्न आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSangliसांगली