शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

दहा दिवसांत अचानक वाढल्या बीएएमएसच्या तब्बल ९२० जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 08:37 IST

आयुर्वेदिक महाविद्यालयांमधील प्रवेशात शासनाचे ‘बैल गेला अन् झोपा केला’

- अविनाश कोळीसांगली : महाराष्ट्र सी.ई.टी. सेलमार्फत आयुष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली असतानाच १० नोव्हेंबर रोजी अचानक ८ नवीन आयुर्वेदिक महाविद्यालयांमधून ५६० जागा भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांत १२ महाविद्यालयांमध्ये एकूण ९२० जागा अचानक वाढल्यामुळे इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संताप व्यक्त करत आहेत. गतवर्षीपेक्षा यावर्षी नीट परीक्षेसाठी ५० हजारांहून अधिक विद्यार्थी पात्र झाल्याने यावर्षी एम.बी.बी.एस. आणि  इतर अभ्यासक्रमांचा कट-ऑफ वाढला आहे. 

अनेक विद्यार्थ्यी गेले दुसरीकडे एम.बी.बी.एस.नंतर विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा बी.ए.एम.एस.कडे असतो. कट-ऑफ वाढल्यामुळे आयुर्वेदिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार नाही म्हणून कमी गुण असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी दंतवैद्यकीय, होमिओपॅथी तसेच इतर अभ्यासक्रमांना नाइलाजाने प्रवेश घेतला.

जागा वाढलेली आयुर्वेद महाविद्यालये 

प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना ३१ ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथील सुमतीबाई ठाकरे आयुर्वेद कॉलेज, अहमदनगरचे रत्नदीप आयुर्वेद कॉलेज, आयुर्वेद कॉलेज अहमदनगर या तीन नवीन कॉलेजेसमधून तिसऱ्या फेरीत २६० जागांसाठी नव्याने परवानगी देण्यात आली. ६ नोव्हेंबर रोजी चौथ्या फेरीत प्रदीप पाटील आयुर्वेद कॉलेज शाहुवाडी या कॉलेजमधून १०० नवीन जागांसाठी नव्याने परवानगी देण्यात आली. आणि आता १० नोव्हेंबर रोजी अचानकपणे तब्बल ८ नवीन आयुर्वेद कॉलेजमधून ५६० जागा भरण्यास पाचव्या फेरीत परवानगी देण्यात आली आहे. इतर अभ्यासक्रमांना याआधी प्रवेश घेतलेला आहे, त्यांना मात्र वाढलेल्या कॉलेजेसमध्ये प्रवेश घेता येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये अन्यायाची भावना आहे.

प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात आयुर्वेद महाविद्यालयांना इतक्या मोठ्या संख्येने परवानगी देणे योग्य नाही. प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच वैद्यकीय महाविद्यालयांच्या मान्यतेचा घोळ मिटवला पाहिजे. राज्यात आता २२ सरकारी आणि ८२ खासगी आयुर्वेद महाविद्यालये आहेत. नवीन महाविद्यालये वाढविण्यापेक्षा आहे त्या महाविद्यालयांचा दर्जा आणखी सुधारणे आवश्यक आहे.    - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्र