शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

दहा दिवसांत अचानक वाढल्या बीएएमएसच्या तब्बल ९२० जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 08:37 IST

आयुर्वेदिक महाविद्यालयांमधील प्रवेशात शासनाचे ‘बैल गेला अन् झोपा केला’

- अविनाश कोळीसांगली : महाराष्ट्र सी.ई.टी. सेलमार्फत आयुष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली असतानाच १० नोव्हेंबर रोजी अचानक ८ नवीन आयुर्वेदिक महाविद्यालयांमधून ५६० जागा भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांत १२ महाविद्यालयांमध्ये एकूण ९२० जागा अचानक वाढल्यामुळे इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संताप व्यक्त करत आहेत. गतवर्षीपेक्षा यावर्षी नीट परीक्षेसाठी ५० हजारांहून अधिक विद्यार्थी पात्र झाल्याने यावर्षी एम.बी.बी.एस. आणि  इतर अभ्यासक्रमांचा कट-ऑफ वाढला आहे. 

अनेक विद्यार्थ्यी गेले दुसरीकडे एम.बी.बी.एस.नंतर विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा बी.ए.एम.एस.कडे असतो. कट-ऑफ वाढल्यामुळे आयुर्वेदिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार नाही म्हणून कमी गुण असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी दंतवैद्यकीय, होमिओपॅथी तसेच इतर अभ्यासक्रमांना नाइलाजाने प्रवेश घेतला.

जागा वाढलेली आयुर्वेद महाविद्यालये 

प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना ३१ ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथील सुमतीबाई ठाकरे आयुर्वेद कॉलेज, अहमदनगरचे रत्नदीप आयुर्वेद कॉलेज, आयुर्वेद कॉलेज अहमदनगर या तीन नवीन कॉलेजेसमधून तिसऱ्या फेरीत २६० जागांसाठी नव्याने परवानगी देण्यात आली. ६ नोव्हेंबर रोजी चौथ्या फेरीत प्रदीप पाटील आयुर्वेद कॉलेज शाहुवाडी या कॉलेजमधून १०० नवीन जागांसाठी नव्याने परवानगी देण्यात आली. आणि आता १० नोव्हेंबर रोजी अचानकपणे तब्बल ८ नवीन आयुर्वेद कॉलेजमधून ५६० जागा भरण्यास पाचव्या फेरीत परवानगी देण्यात आली आहे. इतर अभ्यासक्रमांना याआधी प्रवेश घेतलेला आहे, त्यांना मात्र वाढलेल्या कॉलेजेसमध्ये प्रवेश घेता येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये अन्यायाची भावना आहे.

प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात आयुर्वेद महाविद्यालयांना इतक्या मोठ्या संख्येने परवानगी देणे योग्य नाही. प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच वैद्यकीय महाविद्यालयांच्या मान्यतेचा घोळ मिटवला पाहिजे. राज्यात आता २२ सरकारी आणि ८२ खासगी आयुर्वेद महाविद्यालये आहेत. नवीन महाविद्यालये वाढविण्यापेक्षा आहे त्या महाविद्यालयांचा दर्जा आणखी सुधारणे आवश्यक आहे.    - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्र