शहरं
Join us  
Trending Stories
1
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
2
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
3
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
4
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
5
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
6
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
7
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
8
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
9
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
10
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
11
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
12
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
13
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
14
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
15
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
16
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
17
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
18
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
19
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
20
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी संख ते मुंबई पायी दिंडीचे सांगलीत आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 15:29 IST

म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून जत पुर्व भागातील वंचित शेतक-यांना पाणी देण्यात यावे व इतर या मागणीसाठी संख (ता. जत) ते मुंबई पायी दिंडीचे सोमवारी सांगलीत आगमन झाले. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर दिंडी आल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांची भेट घेत आपले निवेदन सादर केले. त्यांनतर पुन्हा शेतकऱ्यांनी मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले.

ठळक मुद्देसंख ते मुंबई पायी दिंडीचे सांगलीत आगमनम्हैसाळच्या पाण्यासाठी दिंडी ; जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

सांगली : म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून जत पुर्व भागातील वंचित शेतक-यांना पाणी देण्यात यावे व इतर या मागणीसाठी संख (ता. जत) ते मुंबई पायी दिंडीचे सोमवारी सांगलीत आगमन झाले. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर दिंडी आल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांची भेट घेत आपले निवेदन सादर केले. त्यांनतर पुन्हा शेतकऱ्यांनी मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले.शुक्रवार दि ७ जूनपासून संख येथून तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी निघाली आहे आहे. सोमवारी सकाळी सांगलीत या दिंडीचे दिंडीचे आगमन झाले.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिंडी आल्यानंतर शेतकऱ्यांनी तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेतली व आपले निवेदन सादर केले.

या निवेदनात म्हटले आहे, मायथळ कॅनल पासून फक्त दोन कि.मी. अंतरावर असणा-या व्हस्पेठ तलावात कॅनलद्वारे पाणी सोडल्यास माडग्याळ, सोन्याळ, कुलाळवाडी, राजबावाडी, अंकलगी, उटगी, कारंडेवाडी, निगडी बु., लमाणतांडा, उमदी या सर्व गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने पाणी सोडण्यात यावे, व्हसपेठ तलाव ते गुड्डापूर तलाव फक्त अडीच कि.मी. कॅनलचे काम केल्यास गुड्डापूर तलावातील पाण्याचा उपयोग आसंगी (जत), गोंधळेवाडी, संख, भिवर्गी, बेळोंगी, करजगी, बोरगी, हळ्ळी, बालगांव पर्यंत ओढा पात्रातून पाणी जाऊन यासर्व गावांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.

देवनाळ मेंड़ीगेरी ओढापात्रातून पाणी सोडल्यास ते पाच्छापूर (सालीगेरी) शेड्याळ ओढा पात्रापर्यंत येईल व शेड्याळ ओढा पात्रातून दरीकरोनूर, दरीबडची तलावात पाणी पोहोचेल या पाण्याचा उपयोग लमाणतांडा, पांडरेवाडी, खंडनाळ पर्यंत ओढा पात्रातून पाणी जाऊन यासर्व गावांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल तरी त्याची कार्यवाही व्हावी.कर्नाटकातील कनमडी तलावातून सिद्धनाथ तलावापर्यंत कॅनलद्वारे पाणी आल्यास तुर्कअसंगी, मोठेवाडी, कागनरी, पांडोझरी, पारधी तांडा, करेवाडी, तिकडी, या गावांनाही ओढा पात्रातून पाणी जाऊ शकते.

जर ही विशेष बाब म्हणून तरतूद करून निधी उपलब्ध करून फक्त दहा कि.मी. अंतराच्या टप्याचे काम केल्यास वरील सर्व गावांना याचा लाभ मिळेल, जत मधून म्हैसाळ योजनेचे आलेले पाणी जर सांगोल व मंगळवेढा या तालुक्यात म्हैसाळ योजनेचे पाणी जाऊ शकते तर आम्हा जत पुर्व भागात हे पाणी का मिळत नाही. तरी आमच्या मागण्यांचा विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी विक्रम ढोणे, लक्ष्मण जबगोंड, कामाणा बंडगर जेटलिंग कोरे, लिंबाजी माळी आमाना पाटील, बसप्पा माळी, दशरथ सुतार, अमृत पाटील, संजय धुमाळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSangliसांगली