शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

पाण्यासाठी संख ते मुंबई पायी दिंडीचे सांगलीत आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 15:29 IST

म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून जत पुर्व भागातील वंचित शेतक-यांना पाणी देण्यात यावे व इतर या मागणीसाठी संख (ता. जत) ते मुंबई पायी दिंडीचे सोमवारी सांगलीत आगमन झाले. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर दिंडी आल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांची भेट घेत आपले निवेदन सादर केले. त्यांनतर पुन्हा शेतकऱ्यांनी मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले.

ठळक मुद्देसंख ते मुंबई पायी दिंडीचे सांगलीत आगमनम्हैसाळच्या पाण्यासाठी दिंडी ; जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

सांगली : म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून जत पुर्व भागातील वंचित शेतक-यांना पाणी देण्यात यावे व इतर या मागणीसाठी संख (ता. जत) ते मुंबई पायी दिंडीचे सोमवारी सांगलीत आगमन झाले. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर दिंडी आल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांची भेट घेत आपले निवेदन सादर केले. त्यांनतर पुन्हा शेतकऱ्यांनी मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले.शुक्रवार दि ७ जूनपासून संख येथून तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी निघाली आहे आहे. सोमवारी सकाळी सांगलीत या दिंडीचे दिंडीचे आगमन झाले.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिंडी आल्यानंतर शेतकऱ्यांनी तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेतली व आपले निवेदन सादर केले.

या निवेदनात म्हटले आहे, मायथळ कॅनल पासून फक्त दोन कि.मी. अंतरावर असणा-या व्हस्पेठ तलावात कॅनलद्वारे पाणी सोडल्यास माडग्याळ, सोन्याळ, कुलाळवाडी, राजबावाडी, अंकलगी, उटगी, कारंडेवाडी, निगडी बु., लमाणतांडा, उमदी या सर्व गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने पाणी सोडण्यात यावे, व्हसपेठ तलाव ते गुड्डापूर तलाव फक्त अडीच कि.मी. कॅनलचे काम केल्यास गुड्डापूर तलावातील पाण्याचा उपयोग आसंगी (जत), गोंधळेवाडी, संख, भिवर्गी, बेळोंगी, करजगी, बोरगी, हळ्ळी, बालगांव पर्यंत ओढा पात्रातून पाणी जाऊन यासर्व गावांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.

देवनाळ मेंड़ीगेरी ओढापात्रातून पाणी सोडल्यास ते पाच्छापूर (सालीगेरी) शेड्याळ ओढा पात्रापर्यंत येईल व शेड्याळ ओढा पात्रातून दरीकरोनूर, दरीबडची तलावात पाणी पोहोचेल या पाण्याचा उपयोग लमाणतांडा, पांडरेवाडी, खंडनाळ पर्यंत ओढा पात्रातून पाणी जाऊन यासर्व गावांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल तरी त्याची कार्यवाही व्हावी.कर्नाटकातील कनमडी तलावातून सिद्धनाथ तलावापर्यंत कॅनलद्वारे पाणी आल्यास तुर्कअसंगी, मोठेवाडी, कागनरी, पांडोझरी, पारधी तांडा, करेवाडी, तिकडी, या गावांनाही ओढा पात्रातून पाणी जाऊ शकते.

जर ही विशेष बाब म्हणून तरतूद करून निधी उपलब्ध करून फक्त दहा कि.मी. अंतराच्या टप्याचे काम केल्यास वरील सर्व गावांना याचा लाभ मिळेल, जत मधून म्हैसाळ योजनेचे आलेले पाणी जर सांगोल व मंगळवेढा या तालुक्यात म्हैसाळ योजनेचे पाणी जाऊ शकते तर आम्हा जत पुर्व भागात हे पाणी का मिळत नाही. तरी आमच्या मागण्यांचा विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी विक्रम ढोणे, लक्ष्मण जबगोंड, कामाणा बंडगर जेटलिंग कोरे, लिंबाजी माळी आमाना पाटील, बसप्पा माळी, दशरथ सुतार, अमृत पाटील, संजय धुमाळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSangliसांगली