शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अनिकेत कोथळे हत्या प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी पोलीस दलातील वर्दीतील गुंडांची साफसफाई करावी - राजू शेट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 15:05 IST

पोलीस कोठडीत हत्या झालेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. तसेच यापुढे पुन्हा अनिकेत कोथळे होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शनिवारी दिला.

सांगली : पोलीस कोठडीत हत्या झालेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. तसेच यापुढे पुन्हा अनिकेत कोथळे होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शनिवारी दिला. मुख्यमंत्र्यांनी पोलीस दलातील वर्दीतील गुंडांची साफकरावी करावी, असे आवाहनही शेट्टी यांनी केले. 

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणात पोलीस उप-अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करावे, हा तपास सीबीआयकडे द्यावा, विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी शेट्टी बोलत होते. विश्रामबाग चौकातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चास प्रारंभ झाला. राजू शेट्टी, माकपचे नेते अजित अभ्यंकर व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी समशेरखान पठाण यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले, अनिकेतच्या हत्येमुळे पोलिसांचा समाजातील आदरभाव संपला आहे. मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते आहे. ते आज सांगलीत जिल्ह्यात असल्याने मोर्चा काढला आहे. मोर्चाद्वारे आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असतील. अनिकेत कोथळे हत्या प्रकरण केवळ उंटावरच्या पाठीवरची शेवटची काडी आहे. अशी अनेक प्रकरणे घडली आहेत. ती पोलिसांनी दाबून टाकली आहेत. घनवट कामटेसारखे अनेक पोलीस अधिकारी आजही  मोठ्या पदावर कार्यरत आहेत. इस्लामपूरच्या कुलकर्णी दाम्पत्याचा हत्येचाही तपासही गुंडाळून. मी गेली पंधरा वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून निवडूण येत आहे. पण कधीही पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला नाही. पण सामान्यांवर न्याय होत असेल तर कधीच गप्प बसत नाही. 

पुढे शेट्टी असेही म्हणाले, पोलीस दलातील भ्रष्ट अधिका-यांना बाजूला केले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी साफसफाई करावी. खरं तर या सर्वपक्षीय मोर्चात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी झाडून सहभागी व्हायला पाहिजे होते. पण ते आले नाहीत. कारण पोलिस अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्या करण्यासाठी ते ‘सुपारी’ घेतात. त्यांचे हातही भ्रष्टाचाराने बरबटले आहेत. दर तीन वर्षांनी हे लोकप्रतिनिधी मर्जीतील जिल्हा व पोलीस ठाणे देण्यासाठी अधिका-यांकडून खंडण्या घेतात. या लोकप्रतिनिधींचाही बंदोबस्त करायला हवा. जोपर्यंत अनिकेतच्या कुटुंबास न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. तसेच पुन्हा अनिकेत कोथळे होऊ देणार नाही.या मोर्चात पृथ्वीराज पवार, गौतम पवार, कॉ. उमेश देशमुख, अफीब बावा, आश्रफ वांकर, नितीन चव्हाण, महेश खराडे, महेश पाटील, आनंद देसाई, आशीष कोरी, सतीश साखळकर आदी सहभागी झाले होते.

सीआयडीवर विश्वास नाही : पठाणसेवानिवृत्त पोलीस अधिकारी समशेरखान पठाण म्हणाले, अनिकेत कोथळे प्रकरणात सांगलीकरांनी लढा दिल्याने पोलीस प्रमुख व उपअधीक्षकांची बदली झाली. अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर कामटेने वरिष्ठ पोलीस अधिका-यांशी संपर्क साधला असण्याची शक्यता आहे. कामटेचे ‘कॉल डिटेल्स’ काढून या अधिका-यांचा शोध घ्यावा. त्यांनाही सीआयडीने आरोपी करावे. सीआयडी विभागातील अधिकारी हे पोलिस दलातीलच असतात. शिक्षा म्हणून त्यांची सीआयडीत बदली केली जाते. त्यामुळे सीआयडीच्या तपासावर विश्वास नाही. हा तपास सीबीआयकडे द्यावा. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी.

सुपारी घेऊन खून : अभ्यंकरमाकपाचे नेते अजित अभ्यंकर म्हणाले, अनिकेत कोथळे प्रकरणामुळे गुंडाराज व पोलीस राज यामधील फरक आता मिटला आहे. दोन हजाराच्या चोरीसाठी अनिकेतचा जीव घेतला. त्याचा मृतदेह जाळला. यावरुन पोलिसांमध्ये किती गुंडाराज शिरला आहे, याची प्रचिती येते. पोलीस गुंड व दरोडेखोर झाले आहेत. ‘सुपारी’ घेऊन ते संशयित आरोपींचा खून करीत आहेत. तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे व उपअधीक्षक दीपाली काळे यांनी कामटेला मदत केली असेल तर त्यांनाही सहआरोपी केल पाहिजे. कोथळे कुटुंबास न्याय देण्यासाठी प्रसंगी राज्यभरात लढा उभा केला जाईल. अनिकेत कोथळेचे संपूर्ण कुटुंबही मोर्चात सहभागी झाले होते. अनिकेतची पत्नी संध्या हिच्या काखेत तिची तीन वर्षाची मुलगी प्रांजल होती. खा. शेट्टी यांनी प्रांजला स्वत:च्या कडेवर घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा येईपर्यंत प्रांजल शेट्टी यांच्या कडेवर होती.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाPoliceपोलिसSangliसांगली