शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

Sangli: ‘टेंभू’चे पाणी पेटले, शेतकऱ्यांनी विट्यात अधिकाऱ्यांना कोंडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 13:53 IST

ढवळेश्वरचे शेतकरी आक्रमक : पोलिसांची मध्यस्थीनंतर अधिकाऱ्यांनी पाणी सोडले

विटा : टेंभू योजनेच्या बंदिस्त पाइपलाइनचे सोडलेले पाणी तासाभरातच बंद केले. त्यामुळे संतप्त झालेल्या ढवळेश्वर (ता. खानापूर) येथील शेतकऱ्यांनी बुधवारी विटा येथील टेंभू योजनेच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. राजकीय दबावापोटी पाणी बंद केल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी टेंभूच्या अधिकाऱ्यांना सुमारे दोन तास कार्यालयात कोंडून ठेवले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अखेर टेंभूच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी सहा वाजता टेंभूचे पाणी सोडले.ढवळेश्वर येथील जलसिंचनाच्या टाकीमधून बंदिस्त जलवाहिनीतून परिसरातील नऊ लहान तलाव भरून घेतले जातात. बुधवारी दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास या टाकीमध्ये पाणी सोडण्यात आले. हा संदेश राहुल मंडले यांनी सोशल मीडियातून शेतकऱ्यांना दिला. मात्र, या संदेशानंतर अवघ्या तासाभरातच सोडलेले पाणी अधिकाऱ्यांनी बंद केले. त्यानंतर संतप्त झालेले शेतकरी थेट विट्यात येऊन टेंभू योजनेच्या शाखा कार्यालयासमोर आले. त्यावेळी पाणी बंद का केले? असा सवाल शेतकऱ्यांनी कालवा निरीक्षकांना विचारला. शाखा अभियंता अमितकुमार साठे यांनी तोंडी आदेश दिल्याने पाणी बंद केल्याचे निरीक्षकांनी सांगितले.त्यानंतर शेतकऱ्यांनी आपला मोर्चा शाखा अभियंता साठे यांच्याकडे वळविला. त्यावेळी साठे यांनी वरिष्ठांचा दबाव असल्याचे कारण दिले. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले. शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत कार्यालयाला टाळे ठोकून अधिकाऱ्यांना दोन तास डांबून ठेवले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी ढवळेश्वरसाठी पाणी सोडले जाईल, असे आश्वासन दिले. शिवाय अधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेत सायंकाळी सहा वाजता टेंभू योजनेचे पाणी सोडले.यावेळी भाजपचे पंकज दबडे, संदीप ठोंबरे, नीलेश पाटील, दाजी पवार, प्रमोद भारते, ढवळेश्वरचे राहुल मंडले, सामजाई तुंबगी, हणमंत किर्दत, अजित कीर्दत, गुरुनाथ किर्दत, बाळासो पवार, अमोल कांबळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी..आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामुळे टेंभूचे पाणी सोडले म्हणून काही स्थानिक राजकीय मंडळी शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. दुसरीकडे राजकीय नेत्यांची मर्जी सांभाळण्यासाठी अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांवर अन्याय करणे सुरू केले आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या घरात पाणी भरणाऱ्या अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीWaterपाणी