शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

Sangli: ‘टेंभू’चे पाणी पेटले, शेतकऱ्यांनी विट्यात अधिकाऱ्यांना कोंडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 13:53 IST

ढवळेश्वरचे शेतकरी आक्रमक : पोलिसांची मध्यस्थीनंतर अधिकाऱ्यांनी पाणी सोडले

विटा : टेंभू योजनेच्या बंदिस्त पाइपलाइनचे सोडलेले पाणी तासाभरातच बंद केले. त्यामुळे संतप्त झालेल्या ढवळेश्वर (ता. खानापूर) येथील शेतकऱ्यांनी बुधवारी विटा येथील टेंभू योजनेच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. राजकीय दबावापोटी पाणी बंद केल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी टेंभूच्या अधिकाऱ्यांना सुमारे दोन तास कार्यालयात कोंडून ठेवले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अखेर टेंभूच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी सहा वाजता टेंभूचे पाणी सोडले.ढवळेश्वर येथील जलसिंचनाच्या टाकीमधून बंदिस्त जलवाहिनीतून परिसरातील नऊ लहान तलाव भरून घेतले जातात. बुधवारी दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास या टाकीमध्ये पाणी सोडण्यात आले. हा संदेश राहुल मंडले यांनी सोशल मीडियातून शेतकऱ्यांना दिला. मात्र, या संदेशानंतर अवघ्या तासाभरातच सोडलेले पाणी अधिकाऱ्यांनी बंद केले. त्यानंतर संतप्त झालेले शेतकरी थेट विट्यात येऊन टेंभू योजनेच्या शाखा कार्यालयासमोर आले. त्यावेळी पाणी बंद का केले? असा सवाल शेतकऱ्यांनी कालवा निरीक्षकांना विचारला. शाखा अभियंता अमितकुमार साठे यांनी तोंडी आदेश दिल्याने पाणी बंद केल्याचे निरीक्षकांनी सांगितले.त्यानंतर शेतकऱ्यांनी आपला मोर्चा शाखा अभियंता साठे यांच्याकडे वळविला. त्यावेळी साठे यांनी वरिष्ठांचा दबाव असल्याचे कारण दिले. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले. शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत कार्यालयाला टाळे ठोकून अधिकाऱ्यांना दोन तास डांबून ठेवले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी ढवळेश्वरसाठी पाणी सोडले जाईल, असे आश्वासन दिले. शिवाय अधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेत सायंकाळी सहा वाजता टेंभू योजनेचे पाणी सोडले.यावेळी भाजपचे पंकज दबडे, संदीप ठोंबरे, नीलेश पाटील, दाजी पवार, प्रमोद भारते, ढवळेश्वरचे राहुल मंडले, सामजाई तुंबगी, हणमंत किर्दत, अजित कीर्दत, गुरुनाथ किर्दत, बाळासो पवार, अमोल कांबळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी..आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामुळे टेंभूचे पाणी सोडले म्हणून काही स्थानिक राजकीय मंडळी शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. दुसरीकडे राजकीय नेत्यांची मर्जी सांभाळण्यासाठी अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांवर अन्याय करणे सुरू केले आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या घरात पाणी भरणाऱ्या अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीWaterपाणी