शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

Sangli: ‘टेंभू’चे पाणी पेटले, शेतकऱ्यांनी विट्यात अधिकाऱ्यांना कोंडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 13:53 IST

ढवळेश्वरचे शेतकरी आक्रमक : पोलिसांची मध्यस्थीनंतर अधिकाऱ्यांनी पाणी सोडले

विटा : टेंभू योजनेच्या बंदिस्त पाइपलाइनचे सोडलेले पाणी तासाभरातच बंद केले. त्यामुळे संतप्त झालेल्या ढवळेश्वर (ता. खानापूर) येथील शेतकऱ्यांनी बुधवारी विटा येथील टेंभू योजनेच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. राजकीय दबावापोटी पाणी बंद केल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी टेंभूच्या अधिकाऱ्यांना सुमारे दोन तास कार्यालयात कोंडून ठेवले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अखेर टेंभूच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी सहा वाजता टेंभूचे पाणी सोडले.ढवळेश्वर येथील जलसिंचनाच्या टाकीमधून बंदिस्त जलवाहिनीतून परिसरातील नऊ लहान तलाव भरून घेतले जातात. बुधवारी दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास या टाकीमध्ये पाणी सोडण्यात आले. हा संदेश राहुल मंडले यांनी सोशल मीडियातून शेतकऱ्यांना दिला. मात्र, या संदेशानंतर अवघ्या तासाभरातच सोडलेले पाणी अधिकाऱ्यांनी बंद केले. त्यानंतर संतप्त झालेले शेतकरी थेट विट्यात येऊन टेंभू योजनेच्या शाखा कार्यालयासमोर आले. त्यावेळी पाणी बंद का केले? असा सवाल शेतकऱ्यांनी कालवा निरीक्षकांना विचारला. शाखा अभियंता अमितकुमार साठे यांनी तोंडी आदेश दिल्याने पाणी बंद केल्याचे निरीक्षकांनी सांगितले.त्यानंतर शेतकऱ्यांनी आपला मोर्चा शाखा अभियंता साठे यांच्याकडे वळविला. त्यावेळी साठे यांनी वरिष्ठांचा दबाव असल्याचे कारण दिले. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले. शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत कार्यालयाला टाळे ठोकून अधिकाऱ्यांना दोन तास डांबून ठेवले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी ढवळेश्वरसाठी पाणी सोडले जाईल, असे आश्वासन दिले. शिवाय अधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेत सायंकाळी सहा वाजता टेंभू योजनेचे पाणी सोडले.यावेळी भाजपचे पंकज दबडे, संदीप ठोंबरे, नीलेश पाटील, दाजी पवार, प्रमोद भारते, ढवळेश्वरचे राहुल मंडले, सामजाई तुंबगी, हणमंत किर्दत, अजित कीर्दत, गुरुनाथ किर्दत, बाळासो पवार, अमोल कांबळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी..आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामुळे टेंभूचे पाणी सोडले म्हणून काही स्थानिक राजकीय मंडळी शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. दुसरीकडे राजकीय नेत्यांची मर्जी सांभाळण्यासाठी अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांवर अन्याय करणे सुरू केले आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या घरात पाणी भरणाऱ्या अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीWaterपाणी