शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

‘एसईबीसी’च्या समावेशासाठी अंगणवाडी भरती प्रक्रिया स्थगित, 'लोकमत'च्या वृत्ताची शासनाकडून दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 17:10 IST

‘लोकमत’मधील वृत्ताची दखल घेत राज्य शासनाने भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश दिले

तासगाव : मराठा समाजाचा ‘एसईबीसी’मध्ये समावेश झाल्यानंतरही, जुन्याच आदेशाप्रमाणे अंगणवाडी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे मराठा समाजातील महिला अर्जदारांवर अन्याय होत होता. याबाबत ‘अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेमध्ये मराठ्यांच्या लाडक्या बहिणींवर अन्याय’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मधून विशेष वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत राज्य शासनाने अंगणवाडी भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ‘एसईबीसी’चा समावेश हाेऊन नव्याने प्रक्रिया हाेणार आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला आहे.यापूर्वी मराठा अर्जदारांना ‘ईडब्ल्यूएस’मधून आरक्षणाचा लाभ मिळत होता. मात्र, १८ जून २०२४ च्या शासन निर्णयानुसार मराठा समाजाला ‘एसईबीसी’मधून आरक्षणाचा लाभ मिळत आहे. अंगणवाडी भरती प्रक्रियेत प्रवर्गनिहाय अतिरिक्त गुणांकनाचा लाभ दिला जातो. ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातून यापूर्वी मराठा समाजातील उमेदवारांना अतिरिक्त पाच गुणांचा लाभ मिळतो. ‘एसईबीसी’चा समावेश नसल्याने मराठा समाजातील उमेदवार अतिरिक्त गुणांच्या लाभापासून वंचित राहणार होते.

'लोकमत'च्या वृत्ताची शासनाकडून दखलयाबाबत ‘लोकमत’मधून आवाज उठवण्यात आला होता. त्यानंतर सकल मराठा समाज आणि आमदार सुमनताई पाटील यांनी शासनदरबारी ‘एसईबीसी’चा समावेश करण्याची मागणी केली होती. ‘एसईबीसी’करिता गुणांकन व अन्य बाबी समाविष्ट करून शासन निर्णय सुधारित करण्याबाबत आयुक्तांनी प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावावर अंतिम निर्णय होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीMaratha Reservationमराठा आरक्षण