शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

‘एसईबीसी’च्या समावेशासाठी अंगणवाडी भरती प्रक्रिया स्थगित, 'लोकमत'च्या वृत्ताची शासनाकडून दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 17:10 IST

‘लोकमत’मधील वृत्ताची दखल घेत राज्य शासनाने भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश दिले

तासगाव : मराठा समाजाचा ‘एसईबीसी’मध्ये समावेश झाल्यानंतरही, जुन्याच आदेशाप्रमाणे अंगणवाडी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे मराठा समाजातील महिला अर्जदारांवर अन्याय होत होता. याबाबत ‘अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेमध्ये मराठ्यांच्या लाडक्या बहिणींवर अन्याय’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मधून विशेष वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत राज्य शासनाने अंगणवाडी भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ‘एसईबीसी’चा समावेश हाेऊन नव्याने प्रक्रिया हाेणार आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला आहे.यापूर्वी मराठा अर्जदारांना ‘ईडब्ल्यूएस’मधून आरक्षणाचा लाभ मिळत होता. मात्र, १८ जून २०२४ च्या शासन निर्णयानुसार मराठा समाजाला ‘एसईबीसी’मधून आरक्षणाचा लाभ मिळत आहे. अंगणवाडी भरती प्रक्रियेत प्रवर्गनिहाय अतिरिक्त गुणांकनाचा लाभ दिला जातो. ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातून यापूर्वी मराठा समाजातील उमेदवारांना अतिरिक्त पाच गुणांचा लाभ मिळतो. ‘एसईबीसी’चा समावेश नसल्याने मराठा समाजातील उमेदवार अतिरिक्त गुणांच्या लाभापासून वंचित राहणार होते.

'लोकमत'च्या वृत्ताची शासनाकडून दखलयाबाबत ‘लोकमत’मधून आवाज उठवण्यात आला होता. त्यानंतर सकल मराठा समाज आणि आमदार सुमनताई पाटील यांनी शासनदरबारी ‘एसईबीसी’चा समावेश करण्याची मागणी केली होती. ‘एसईबीसी’करिता गुणांकन व अन्य बाबी समाविष्ट करून शासन निर्णय सुधारित करण्याबाबत आयुक्तांनी प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावावर अंतिम निर्णय होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीMaratha Reservationमराठा आरक्षण