शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

भाजप सरकारला शेतकरी, कामगारांना अ‍ॅलर्जी : विश्वजीत कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 18:13 IST

Congress, sangli, vishwjit kadam, bjp देशातील भाजपच्या सरकारला शेतकरी व कामगारांची अ‍ॅलर्जी असल्याने त्यांनी दोन विधेयक आणून त्याद्वारे या घटकांना उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू केले आहे, अशी टीका सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी शनिवारी केली.

ठळक मुद्देभाजप सरकारला शेतकरी, कामगारांना अ‍ॅलर्जी : विश्वजीत कदमसांगलीत काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

सांगली : देशातील भाजपच्या सरकारला शेतकरी व कामगारांची अ‍ॅलर्जी असल्याने त्यांनी दोन विधेयक आणून त्याद्वारे या घटकांना उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू केले आहे, अशी टीका सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी शनिवारी केली.सांगली शहर व जिल्हा काँग्रेसच्यावतीनेकाँग्रेस भवनासमोर शनिवारी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी व कामगारविषयक विधेयकास विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, शैलजाभाभी पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नामदेवराव मोहिते आदी उपस्थित होते.गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है, नही चलेगी, नही चलेगी तानाशाही नही चलेगी, शेतकरी, कामगारविरोधी कायदे करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, अशा घोषणा आंदोलकांनी यावेळी दिल्या. कदम यावेळी म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारने जी दोन विधेयके मंजूर केली त्यातून शेतकरी व कामगार वर्ग अडचणीत आला आहे.

या सरकारने वेळोवेळी आपल्या धोरणातून या घटकांविषयीचा द्वेष दाखवून दिला आहे. हे सरकार मोजक्या उद्योगपतींसाठी काम करते. त्यांना केवळ उद्योजकांचे भले करायचे आहे. त्यामुळे त्यांना अन्य घटकांशी काही देणेघेणे नाही.काँग्रेस सरकार शेतकऱ्यांना अन्नदाता मानते. शेतकरी आणि कामगारांनी या देशाला घडविण्याचे काम केले आहे. त्यामुळे या वर्गासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. महात्मा गांधींच्या विचाराने आम्ही हे सत्याग्रह आंदोलन करीत आहोत. पृथ्वीराज पाटील यांनी आंदोलनाची भूमिका यावेळी स्पष्ट केली. विशाल पाटील, डॉ. नामदेव कस्तुरे यांची भाषणे झाली.विरोधकांनी त्यांचे काम करावेमहाराष्ट्र हा कोणत्या पक्षाचा नसून तो सामान्य माणसांचा आहे. त्यामुळे याचे भान ठेवून विरोधकांनी येथील नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांसाठी केंद्र शासनाकडून मदत आणावी. आम्ही आमचे काम केले आहे, त्यांनी आता त्यांचे काम करावे, असा टोला कदम यांनी भाजप नेत्यांना लगावला.

टॅग्स :congressकाँग्रेसSangliसांगलीBJPभाजपाVishwajeet Kadamविश्वजीत कदम