शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

भाजप सरकारला शेतकरी, कामगारांना अ‍ॅलर्जी : विश्वजीत कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 18:13 IST

Congress, sangli, vishwjit kadam, bjp देशातील भाजपच्या सरकारला शेतकरी व कामगारांची अ‍ॅलर्जी असल्याने त्यांनी दोन विधेयक आणून त्याद्वारे या घटकांना उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू केले आहे, अशी टीका सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी शनिवारी केली.

ठळक मुद्देभाजप सरकारला शेतकरी, कामगारांना अ‍ॅलर्जी : विश्वजीत कदमसांगलीत काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

सांगली : देशातील भाजपच्या सरकारला शेतकरी व कामगारांची अ‍ॅलर्जी असल्याने त्यांनी दोन विधेयक आणून त्याद्वारे या घटकांना उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू केले आहे, अशी टीका सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी शनिवारी केली.सांगली शहर व जिल्हा काँग्रेसच्यावतीनेकाँग्रेस भवनासमोर शनिवारी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी व कामगारविषयक विधेयकास विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, शैलजाभाभी पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नामदेवराव मोहिते आदी उपस्थित होते.गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है, नही चलेगी, नही चलेगी तानाशाही नही चलेगी, शेतकरी, कामगारविरोधी कायदे करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, अशा घोषणा आंदोलकांनी यावेळी दिल्या. कदम यावेळी म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारने जी दोन विधेयके मंजूर केली त्यातून शेतकरी व कामगार वर्ग अडचणीत आला आहे.

या सरकारने वेळोवेळी आपल्या धोरणातून या घटकांविषयीचा द्वेष दाखवून दिला आहे. हे सरकार मोजक्या उद्योगपतींसाठी काम करते. त्यांना केवळ उद्योजकांचे भले करायचे आहे. त्यामुळे त्यांना अन्य घटकांशी काही देणेघेणे नाही.काँग्रेस सरकार शेतकऱ्यांना अन्नदाता मानते. शेतकरी आणि कामगारांनी या देशाला घडविण्याचे काम केले आहे. त्यामुळे या वर्गासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. महात्मा गांधींच्या विचाराने आम्ही हे सत्याग्रह आंदोलन करीत आहोत. पृथ्वीराज पाटील यांनी आंदोलनाची भूमिका यावेळी स्पष्ट केली. विशाल पाटील, डॉ. नामदेव कस्तुरे यांची भाषणे झाली.विरोधकांनी त्यांचे काम करावेमहाराष्ट्र हा कोणत्या पक्षाचा नसून तो सामान्य माणसांचा आहे. त्यामुळे याचे भान ठेवून विरोधकांनी येथील नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांसाठी केंद्र शासनाकडून मदत आणावी. आम्ही आमचे काम केले आहे, त्यांनी आता त्यांचे काम करावे, असा टोला कदम यांनी भाजप नेत्यांना लगावला.

टॅग्स :congressकाँग्रेसSangliसांगलीBJPभाजपाVishwajeet Kadamविश्वजीत कदम